शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सज्जनगड कड्याला कधी होणार ‘रेलिंग’?

By admin | Updated: June 17, 2014 00:45 IST

आतापर्यंत आठ बळी : दोन्ही संस्थांनी लक्ष घालण्याची भाविकांची मागणी

परळी : राज्यभरात तीर्थक्षेत्र म्हणून सज्जनगड प्रसिद्ध आहे. विविध भागांतून भाविक, तसेच पर्यटक वर्षभर समर्थ रामदास स्वामींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. मात्र, गडाच्या चारही बाजूंना कंपाउंड नसल्यामुळे धोका निर्माण झाला असून आतापर्यंत विविध कारणांनी आठ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तर काहीजण पाय घसरून पडल्याने त्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कड्याला रेलिंग कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सज्जनगडावर भाविक, पर्यटकांसाठी समर्थ रामदास स्वामी संस्थान व समर्थ सेवा मंडळ यांच्या माध्यमातून महाप्रसाद, राहण्याची, नाष्ट्याची सोय व इतर सुविधा दिल्या जातात. परंतु गडाच्या चारही बाजूस कंपाउंड घालण्यात आले नाही. सज्जनगडला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून त्याच्या विकासासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ही वेळ ओढवली असल्याचे बोलले जात आहे. गडाच्या मागील बाजूस ढाब्याचा मारुतीचे मंदिर आहे. त्याचा काही दिवसांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तोही वैयक्तिक करण्यात आला आहे. शासन व दोन्ही संस्थांनी त्याला मदत केली नाही. या मंदिराशेजारील बाजूनेच आतापर्यंत चार आत्महत्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सातारा येथील चिमणपुरातील तरुणाचा पाय घसरून तो पडला. त्यावेळी बांबूचे कंपाउंड केले होते; पण तात्पुरते. पावसाळ्यात येथे धोका निर्माण होऊ शकतो.मंदिर परिसरातून ठोसेघरच्या डोंगररांगा, उरमोडी धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी येथे गर्दी होते. त्यावेळी संकट ओढवू शकते. (वार्ताहर)