शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

सज्जनगड कड्याला कधी होणार ‘रेलिंग’?

By admin | Updated: June 17, 2014 00:45 IST

आतापर्यंत आठ बळी : दोन्ही संस्थांनी लक्ष घालण्याची भाविकांची मागणी

परळी : राज्यभरात तीर्थक्षेत्र म्हणून सज्जनगड प्रसिद्ध आहे. विविध भागांतून भाविक, तसेच पर्यटक वर्षभर समर्थ रामदास स्वामींच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. मात्र, गडाच्या चारही बाजूंना कंपाउंड नसल्यामुळे धोका निर्माण झाला असून आतापर्यंत विविध कारणांनी आठ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तर काहीजण पाय घसरून पडल्याने त्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कड्याला रेलिंग कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सज्जनगडावर भाविक, पर्यटकांसाठी समर्थ रामदास स्वामी संस्थान व समर्थ सेवा मंडळ यांच्या माध्यमातून महाप्रसाद, राहण्याची, नाष्ट्याची सोय व इतर सुविधा दिल्या जातात. परंतु गडाच्या चारही बाजूस कंपाउंड घालण्यात आले नाही. सज्जनगडला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून त्याच्या विकासासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ही वेळ ओढवली असल्याचे बोलले जात आहे. गडाच्या मागील बाजूस ढाब्याचा मारुतीचे मंदिर आहे. त्याचा काही दिवसांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तोही वैयक्तिक करण्यात आला आहे. शासन व दोन्ही संस्थांनी त्याला मदत केली नाही. या मंदिराशेजारील बाजूनेच आतापर्यंत चार आत्महत्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सातारा येथील चिमणपुरातील तरुणाचा पाय घसरून तो पडला. त्यावेळी बांबूचे कंपाउंड केले होते; पण तात्पुरते. पावसाळ्यात येथे धोका निर्माण होऊ शकतो.मंदिर परिसरातून ठोसेघरच्या डोंगररांगा, उरमोडी धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी येथे गर्दी होते. त्यावेळी संकट ओढवू शकते. (वार्ताहर)