शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऐन उन्हाळ्यात हातपंपच ठरतोय लोकांना तारणहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 19:43 IST

दशरथ ननावरे । लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : उन्हाळा जसा वाढत चालला आहे तशी उन्हाळ्याची तीव्रता आणखी वाढत जात ...

दशरथ ननावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : उन्हाळा जसा वाढत चालला आहे तशी उन्हाळ्याची तीव्रता आणखी वाढत जात आहे. खंडाळा तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाण्याच्या टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. ऐन उन्हाळ्यात गावोगावी तलावात खडखडाट तर विहिरींनी तळ गाठला असताना अडगळीत पडलेले हातपंप लोकांसाठी तारणहार ठरत आहेत.पूर्वीच्या काळी गावांना नदी किंवा विहिरीद्वारे पाणी पुरवठा होत असे. अशा वेळी वाडीवस्तीवर किंवा टंचाई भासणाऱ्या गावातून हातपंपांची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या होत्या. नंतरच्या काळात प्रत्येक गावातून पाणी पुरवठा योजना राबविल्या गेल्या. नळाद्वारे घराघरात पाणी पोहोचविले गेले. तर अनेकांनी कूपनलिका घेऊन पाणी उपलब्ध करून घेतले. त्यामुळे हे हातपंप अडगळीत पडले होते. प्रशासनाचेही त्याकडे दुर्लक्ष झाले होते.यावर्षी सर्वत्रच दुष्काळाने तोंड वर काढले आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीटंचाईची भीषण समस्या उभी राहिली आहे. गावोगावी बांधलेल्या पाझर तलावात पाण्याचा खडखडाट झाला आहे. तर विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत आहे. अशा परिस्थितीत जुन्या हातपंपाकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे. पाणीटंचाईच्या काळात आता हातपंपावर लोकांची गर्दी जमू लागली आहे. इतर वापरासाठी या पाण्याचा उपयोग होतोय तर काही गावांतून ते पिण्यासाठी योग्य आहे का? यासाठी तपासणीसाठी पाठवले जात आहे. त्यामुळे लोकांची तहान भागविण्यासाठी हेच पंप तारणहार ठरत आहेत. जलतज्ज्ञांच्या मते एका पावसाळ्यात प्रत्येक कुटुंबाने घरावरील छताचे पाणी एकत्र करून जमिनीत पुनर्भरण केल्यास पुढील दोन वर्षे हा पाणीसाठा कुटुंबाच्या उपयोगी पडेल.पाणी ही पृथ्वीतलावरील सर्वात मोठी संपत्ती आहे. गावोगावचे पाण्याचे स्त्रोत पुढील काळात जिवंत राहण्यासाठी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे गरजेचे आहे. प्रत्येक गावातून घरोघरी पन्हाळीचे पाणी पाईपद्वारे एकत्रित करून ते गावच्या पाणवठ्याच्या ठिकाणी, हातपंपाच्या शेजारी खड्डे घेऊन जमिनीत मुरवले पाहिजे.त्यामुळे एकतर पावसाचे पाणी वाहून वाया जाणार नाही, शिवाय त्याच पाण्यातून जमिनीत भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे.दुरुस्ती आवश्यकजिल्ह्यातील प्रत्येक गावातून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून हातपंप उभारले आहेत. गावांच्या विस्तारानुसार त्यांची संख्या कमी अधिक आहे. काळाच्या ओघात हे पाणी पुरवठ्याचे स्रोत अडगळीत पडले आहेत; पण सध्याच्या परिस्थितीत पाणीटंचाईची समस्या पुढे आल्यावर हीच साधने लक्षवेधी ठरली आहेत. ज्या गावांमधून पाण्याची कमतरता भासू लागली आहे त्या प्रत्येक गावातून जुन्या हातपंपांच्या दुरुस्तीची मोहिम जिल्हा परिषदेने हाती घ्यायला हवी . टंचाईच्या काळात त्यासाठी विशेष निधीची तरतूद करणे गरजेचे आहे . त्यामुळे पाण्याची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे .