शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

हक्काच्या पेन्शनसाठी ५० वर्षांपासून सैनिकाचा लढा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:56 IST

अजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : ‘नटसम्राट’मधील ‘कुणी घर देता का घर..’ हा नटसम्राट गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर यांचा प्रसिद्ध संवाद आजही ऐकला तरी अंगावर काटे उभे राहतात. त्यातील प्रत्येक शब्दन्शब्द चटका देऊन जातो; पण हाच संवाद तंतोतंत लागू होतोय एका माजी सैनिकासाठी. मरळीतील या वयोवृद्ध माजी सैनिकावर ‘कुणी पेन्शन ...

अजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : ‘नटसम्राट’मधील ‘कुणी घर देता का घर..’ हा नटसम्राट गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर यांचा प्रसिद्ध संवाद आजही ऐकला तरी अंगावर काटे उभे राहतात. त्यातील प्रत्येक शब्दन्शब्द चटका देऊन जातो; पण हाच संवाद तंतोतंत लागू होतोय एका माजी सैनिकासाठी. मरळीतील या वयोवृद्ध माजी सैनिकावर ‘कुणी पेन्शन मंजूर करून देता का रे पेन्शन..,’अशी म्हणण्याची वेळ आली आहे. तीही गेल्या पन्नास वर्षांपासून.भारत-पाक युद्धात एक बोट गमावलेला हा सैनिक आता थकलाय. ते ही म्हणतायत, ‘तुफान आता थकून गेलंय, झाडाझुडपात, डोंगरदºयात अर्ध अधिक तुटून गेलंय, समुद्राच्या लाटांवरती, वनव्याच्या जाळावरती, झुंज, झेप घेऊन-घेऊन तुफान आता थकलंय. जळके-तुटके पंख पालवीत, खुरडत-खुरडत उडत आहे. खरं सांगतो बाबांनो तुफानाला तुफानपणच नडतंय रे.’े संवाद आहेत. वार्धक्याकडे झुकलेल्या हणमंतराव श्रीपती पाटील या माजी सैनिकाचे.कºहाड तालुक्यातील मरळी गावचे हे सुपुत्र. १९६२ मध्ये भारतीय सैन्यदलाच्या आटलरी तोफखाना विभागात ते भरती झाले. १९६५ मध्ये भारत-पाक युद्धात ते सीमेवर होते. या लढाई काळात अपघाताने त्यांच्या हाताच्या बोटाला जखम झाली. जखम चिघळत गेली आणि बोट काढावे लागले. या नंतर ते सक्तीने सैन्यदलातून घरी आले आणि यानंतर गेली ५० वर्षांपासून त्यांचा पेन्शन मिळविण्याबाबतचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे.पेन्शन मिळण्याबाबत त्यांनी या ५० वर्षांच्या काळात शेकडो पत्रे, पुराव्यांच्या कागदपत्रांच्यासह विविध ठिकाणी पाठविली आहेत. त्यांनी ही पत्रे पंतप्रधान, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, सैन्यदलाचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी, नाशिकचे रेकॉर्ड रुमचे अधिकारी, सोल्जर बोर्ड यांना लिहिली आहेत. मागणी अर्ज केले आहेत. या सर्वांच्या पोहोचही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. यातील अनेकांनी त्यांना माघारी पाठवलेली पत्रेही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.लालफितीच्याकारभाराबद्दल खंत...माजी सैनिक हणमंतराव पाटील सांगतात की, मला कोणीही पेन्शन नाकारली नाही. पण गेली पन्नास वर्षे प्रत्येक जण आपल्यावरील जबाबदारी झटकून दुसºया विभागाकडे बोट दाखवित आहे. या लालफितीच्या कारभारात मी भरडतोय. आयुष्याच्या संध्याकाळी हे पाटील दाम्पत्य पोटाची दोन वेळची खळगी भरण्यासाठी धडपडत आहे. जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. माझी दोन्ही मुले रोजी-रोटीसाठी परगावी गेली आहेत.