शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री ऊस नव्हे तर माणसे गाळतो : उंडाळकर

By admin | Updated: October 30, 2016 01:04 IST

उत्तरेत सक्षम नेतृत्त्व नाही : किवळ येथील कार्यक्रमात बाळासाहेब पाटलांवर कडाडून टीका

मसूर : ‘एकाच घरात सत्तेचा घरोबा करून जनतेचे शोषण करणे हे लोकशाहीला घातक आहे. आमदारकी व सह्याद्रीची सत्ता हे कायम भोगत सामान्य कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करण्याचे राजकारण करीत सर्व सत्ताचे केंद्रीकरण करून यशवंतराव चव्हाण यांचा सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या विचाराला उत्तरेतील कर्तृत्वहीन नेतृत्व तिलांजली देत आहे. यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांचे दिवस संपले आहेत. सह्याद्री ऊस नव्हे तर माणसे गाळतो. उत्तरेत सक्षम नेतृत्व नाही.’ अशी टीका करून मसूर पूर्व भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेले माजी मुख्यमंत्री आणि उत्तरेतील लोकप्रतिनिधींचा पराभव असल्याचा आरोप माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केला.किवळ, ता. कऱ्हाड येथे मुंबई महानंदाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल वसंतराव जगदाळे यांचा व रयत कारखान्याच्या चेअरमनपदी उदयसिंह पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी कस्टम अधिकारी मोहनराव साळुंखे होते. यावेळी कोयना दूध संघाचे अध्यक्ष डॉ. नाना यादव, उपाध्यक्ष बाबूराव धोकटे, कृष्णा कामगार संघटनेचे अध्यक्ष पै. आनंदराव मोहिते, आत्माराम जाधव, कोयना दूध संघाचे माजी अध्यक्ष संपतराव इंगवले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पतंगराव माने, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष अनिल मोहिते, संचालक रामकृष्ण वेताळ, धनाजी यांची प्रमुख उपस्थिती होती.पाटील म्हणाले, ‘सत्ता हे समाजसेवेच माध्यम आहे. तथापि उत्तरेतील लोकप्रतिनीधी आमदारकी व सह्याद्रीची सत्ता कायम भोगत आहेत. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला सत्तेत संधी दिल्या; मात्र इथल्या नेतृत्वाने सक्षम कार्यकर्त्यांना मोडीत काढून सत्तेच घराभोवती कोंडाळ केले. ही सामाजिक विषमता लोकशाहीला घातक आहे. सह्याद्रीचे अध्यक्ष आयत्या पिठावरचे असून, त्यांनी जनतेचे शोषण करून किती प्रापर्टी जमवल्या? याचे उत्तर त्यांच्याकडे नसून त्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. यावेळी पै. आनंदराव मोहिते, बबनराव साळुंखे यांची भाषणे झाली. सुरुवातीला गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. युवराज पवार यांनी सूत्रसंचालन केले. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर).. लोकप्रतिनिधींचा पराभवच‘उत्तरेत यशवंतराव चव्हाण यांचा विचार शोधण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. विकासाचे धोरण व इच्छाशक्ती नसल्यानेच उत्तरेतील जनतेला पाणी नाही हा इथल्या लोकप्रतिनिधींचा पराभव आहे. रयत चालवायला दिला. स्लिपिंग पार्टनर म्हणणे हा बौद्धिक बालिशपणा असून, अशा कर्तृत्वहीन नेतृत्वाला बाजूला सारून नव्या नेतृत्वाला संधी द्या. उत्तर-दक्षिणेतील एकाधिकारशाहीची राजवट सुज्ञ मतदारांनी उलथून टाकून परिवर्तनासाठी रयत सहकारच्या पाठीशी राहा,’ असे आवाहन विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केले.वारसा हक्काने आयत्या सत्ता मिळाल्या : जगदाळेवसंतराव जगदाळे म्हणाले, ‘दिवगंत यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला तिलांजली देऊन सत्तेचे केंद्रीकरण करणाऱ्या उत्तरेतील नेतृत्वाला वारसा हक्काने आयत्या सत्ता मिळाल्या. त्यांनी फ्लॅट व जमिनी खरेदी करण्याचा सपाटा सुरू केला आहे. मसूर भागात कोणता शाश्वत विकास केला नाही. पूर्व भागाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप केले. विलासराव पाटील यांनी तीन डोंगर फोडून पाणी आणले; पण इथल्या नेतृत्वाला धनगरवाडी-हणबरवाडी पाणी योजना झाली नाही. सह्याद्री हे राजकारणाचे व्यासपीठ करून ठेवले आहे.’ तर तालुका दुष्काळाच्या खाईत जाईल : मानेपतंगराव माने म्हणाले, ‘गेली ५० वर्षे एकाच घरात सत्ता असतानाही भिकूनाना किवळकर, बाबासाहेब चोरेकरांच्या भागाचे वाळवण का केले? सत्तेवर अजूनही उपरे नेतृत्व ठेवले तर तालुका दुष्काळाच्या खाईत जाईल. सह्याद्रीला काकांनीच वाचवले, अन्यथा तुम्ही सत्तेवर दिसला नसता. राष्ट्रवादीने लाचारी पत्करू नये. काँग्रेसच्या नेतृत्वाने उत्तरेतील काँग्रेस मातीमोल केली. धैर्यशील कदमांचा बळी दिला. स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी रयत सहकारमध्ये सामील व्हावे, भविष्यात पंचायत समिती ही काकांच्या विचाराची असेल, असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.