शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

सहकाराला संस्काराची जोड आवश्यक : शेखर चरेगावकर

By admin | Updated: April 22, 2017 17:19 IST

लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त खटाव ते मुंबई सहकार रथयात्रेचा प्रारंभ

आॅनलाईन लोकमत

खटाव (जि. सातारा), दि. २१ : सहकार क्षेत्रामध्ये नवनवीन बदल व कडक कायदे करण्यात आले आहेत. परंतु या सहकार क्षेत्राचे प्रणेते तसेच दिवंगत लक्ष्मणराव इनामदार यांना अभिप्रेत असणारी विना संस्कार नही सहकार ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षात आणली आहे. सहकार क्षेत्रात वाढलेला स्वाहाकार थोपवण्यासाटी सर्व सहकार कायद्यावर संस्कार करण्याचे काम त्यांनी केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले. खटाव येथे सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश व गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु व सहकार भारतीचे संस्थापक आणि खटाव गावाचे सुपुत्र लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त खटाव ते मुंबई सहकार रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या रथ यात्रेचा शुभारंभ करताना चरेगावकर बोलत होते. ही रथ यात्रा दि. २३ रोजी मुंबई येथे होणाऱ्या १0 व्या सहकार भारतीच्या प्रदेश अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. या रथयात्रेच्या शुभारंभप्रसंगी प्रदेश संघटक प्रवीण देशपांडे, सातारा जिल्हा संघटक सुरेश जोशी, भाजपचे जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, युवा मोचार्चे राज्य सरचिटणीस अतुल भोसले, कार्याध्यक्ष महेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते, मधुकर पाटोळे, अशोक कुदळे, रमणलाल शहा, सहकार भारतीचे जिल्हा संघटक सुरेश जोशी, सहकार भारतीचे राष्ट्रीय सचिव विनायक खटावकर, मधुकर इनामदार, सुहास जोशी, सुजाता खटावकर, सनी शहा, दिलीप जोशी, डॉ. दर्भे, संजय टकले, रणधीर जाधव, सतीश फडतरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. (वार्ताहर) तरच भ्रष्टाचाराला आळा... माजी आमदार डॉ. येळगावकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यावर नेहमीप्रमाणे टिकास्त्र सोडले. शेतकऱ्यांचे कैवारी बनून संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. कर्जमाफी करावयाला आमचा विरोध नाही. परंतु सर्वसामान्य शेतकरी हा कर्ज वेळेत भरत आहे आणि टगी मंडळी मात्र कर्ज माफीच्या आशेवर कर्ज फेडत नाहीत. आमची शासनाला व सहकार खाात्याला विनंती आहे की ज्यांनी वेळेत कर्ज फेडली आहेत त्यांचे निम्मे कर्ज शासनाने माफ करावे आणि ज्यांनी कर्जच फेडले नाही त्यांच्याकडून ते सरसकट वसूल करुन घ्यावे. यामुळे सहकार क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार व हुकुमशाहीला लगाम बसेल असे त्यांनी सांगितले.