शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

सहकाराला संस्काराची जोड आवश्यक : शेखर चरेगावकर

By admin | Updated: April 22, 2017 17:19 IST

लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त खटाव ते मुंबई सहकार रथयात्रेचा प्रारंभ

आॅनलाईन लोकमत

खटाव (जि. सातारा), दि. २१ : सहकार क्षेत्रामध्ये नवनवीन बदल व कडक कायदे करण्यात आले आहेत. परंतु या सहकार क्षेत्राचे प्रणेते तसेच दिवंगत लक्ष्मणराव इनामदार यांना अभिप्रेत असणारी विना संस्कार नही सहकार ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षात आणली आहे. सहकार क्षेत्रात वाढलेला स्वाहाकार थोपवण्यासाटी सर्व सहकार कायद्यावर संस्कार करण्याचे काम त्यांनी केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले. खटाव येथे सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश व गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु व सहकार भारतीचे संस्थापक आणि खटाव गावाचे सुपुत्र लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त खटाव ते मुंबई सहकार रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या रथ यात्रेचा शुभारंभ करताना चरेगावकर बोलत होते. ही रथ यात्रा दि. २३ रोजी मुंबई येथे होणाऱ्या १0 व्या सहकार भारतीच्या प्रदेश अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. या रथयात्रेच्या शुभारंभप्रसंगी प्रदेश संघटक प्रवीण देशपांडे, सातारा जिल्हा संघटक सुरेश जोशी, भाजपचे जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, युवा मोचार्चे राज्य सरचिटणीस अतुल भोसले, कार्याध्यक्ष महेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते, मधुकर पाटोळे, अशोक कुदळे, रमणलाल शहा, सहकार भारतीचे जिल्हा संघटक सुरेश जोशी, सहकार भारतीचे राष्ट्रीय सचिव विनायक खटावकर, मधुकर इनामदार, सुहास जोशी, सुजाता खटावकर, सनी शहा, दिलीप जोशी, डॉ. दर्भे, संजय टकले, रणधीर जाधव, सतीश फडतरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. (वार्ताहर) तरच भ्रष्टाचाराला आळा... माजी आमदार डॉ. येळगावकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यावर नेहमीप्रमाणे टिकास्त्र सोडले. शेतकऱ्यांचे कैवारी बनून संघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. कर्जमाफी करावयाला आमचा विरोध नाही. परंतु सर्वसामान्य शेतकरी हा कर्ज वेळेत भरत आहे आणि टगी मंडळी मात्र कर्ज माफीच्या आशेवर कर्ज फेडत नाहीत. आमची शासनाला व सहकार खाात्याला विनंती आहे की ज्यांनी वेळेत कर्ज फेडली आहेत त्यांचे निम्मे कर्ज शासनाने माफ करावे आणि ज्यांनी कर्जच फेडले नाही त्यांच्याकडून ते सरसकट वसूल करुन घ्यावे. यामुळे सहकार क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार व हुकुमशाहीला लगाम बसेल असे त्यांनी सांगितले.