शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

‘एस’ वळण ठरतोय प्रवाशांसाठी कर्दनकाळ..! प्रवाशांची सुटका होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 23:28 IST

‘एस’ वळण काढून रस्ता सरळ करून जुन्या टोलनाक्यापर्यंत जोडण्यास प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणची जमीन नव्याने संपादित करणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जमीन संपादनासाठी सहकार्य करावे, अशी साद शेतकऱ्यांना घातली.

ठळक मुद्देपाच वर्षांत १२९ लहान-मोठे अपघात; १०२ प्रवासी मृत्यू, २८२ जणांना कायमचे अपंगत्व

खंडाळा : पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर खंबाटकी बोगद्यानजीक असणारे तीव्र उताराचे अतिधोकादायक ‘एस’ वळण वाहनचालक व प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. मानवी जीवाचा कर्दनकाळ ठरलेले हे वळण कायमस्वरुपी काढण्यासाठी जनतेतून अनेकदा उठाव झाला होता. शेकडो प्रवाशांचे प्राण गेल्यानंतर प्रशासनाने अखेर ‘एस’ वळण काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यावर गेल्या दोन वर्षांत कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे धोकादायक वळणाच्या विळख्यातून प्रवाशांची सुटका कधी होणार? हा प्रश्न अधांतरीच आहे.

‘एस’ वळण काढून रस्ता सरळ करून जुन्या टोलनाक्यापर्यंत जोडण्यास प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणची जमीन नव्याने संपादित करणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जमीन संपादनासाठी सहकार्य करावे, अशी साद शेतकऱ्यांना घातली. दरम्यान, खंडाळा येथील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यामुळे हे वळण काढण्यासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. ‘एस’ वळण काढण्यासाठी ३९ खातेदारांचे सुमारे सव्वाचार एकर क्षेत्र नव्याने भूसंपादित करण्यात आले आहे.

खंडाळा तालुक्यातून जाणारा पुणे-बेंगलोर आशियाई महामार्ग तालुक्याच्या विकासाला दिशादर्शक ठरत असला तरी वाहनधारकांना व प्रवाशांना मृत्यूचा सापळाच ठरला आहे. याच महामार्गावरील चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेल्या ‘एस’ आकाराच्या वळणावर गत पाच वर्षांत १२९ लहान-मोठे अपघात झाले असून, यामध्ये १०२ प्रवासी मयत तर सुमारे २८२ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. महामार्गावरील पंढरपूर फाटा, केसुर्डी फाटा, पारगाव उड्डाणपूल, खंबाटकीचा घाट व बोगदा ओलांडून पुढे आल्यानंतरचे ‘एस’ वळण ही अपघाताची प्रमुख ठिकाणे आहेत. या अपघाताच्या ठिकाणी कोणत्याही कायमस्वरुपी सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अपघातांची मालिका अखंडितपणे सुरूच आहे.

यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आंदोलनाचे हत्यार वेळोवेळी उपसले; परंतु त्यांच्या मागण्यांना केराची टोपली संबंधित विभागाकडून दाखवण्यात आली. खंबाटकी बोगदा ओलंडल्यानंतर असलेल्या ‘एस’ वळणावर लोकांच्या जीविताशी खेळण्याचा खेळ सुरू असून, वळण काढले जात नाही आणि उपाययोजनाही केल्या जात नाहीत, त्यामुळे तालुकावासीय, वाहनधारक व प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याला अनुसरूनच तहसील कार्यालय खंडाळा येथे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली ‘एस’ कॉर्नर काढण्याबाबत व नवीन रस्त्याच्या जमीन संपादनासाठी शेतकरी यांची बैठकही घेण्यात आली होती.

अपघाताची मालिका सुरूच ...खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असणाऱ्या ‘एस’ वळणाचा धोका अद्यापही कमी झाला नाही. बोगद्याच्या पुढे आल्यावर तीव्र उतारामुळे वाहनांची गती वाढत जाते, हे बºयाचदा चालकांच्या लक्षात येत नाही. पुढे अचानक ‘एस’ आकाराचे वळण असल्याने येथे नेहमी अपघात होत असतात. दोनच दिवसांपूर्वी या ठिकाणी सात वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये पोलीस कर्मचाºयास एक पाय गमवावा लागला होता. या वळणावर प्रवाशांचा मृत्यूचा आकडा शंभरीवर पोहोचला आहे. मात्र या वळणावर अद्याप उपाययोजना झाली नाही, त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे नवीन बोगदा केव्हा होणार आणि या वळणाचे काष्ट शुक्ल कधी सुटणार? याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

खंबाटकी बोगदा आणि ‘एस’ वळणावर वारंवार अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार यावर नेहमीच तात्पुरती मलमपट्टी करीत असतात. कायमस्वरुपी उपाययोजना मार्गी लागली नसल्याने अद्यापही अपघात घडतात. तरीही याकडे डोळेझाकपणा केला जातोय. याबाबत नवीन बोगद्याचा मार्ग तारणहार ठरणार आहे; पण तो तातडीने व्हायला हवा.- अजित यादव, उपजिल्हाप्रमुख शिवसेना

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागSatara areaसातारा परिसर