शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
3
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
4
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
5
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
6
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
7
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
9
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
10
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
11
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
12
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
13
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
14
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
15
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
16
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
17
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
18
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
19
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
20
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
Daily Top 2Weekly Top 5

‘एस’ वळण ठरतोय प्रवाशांसाठी कर्दनकाळ..! प्रवाशांची सुटका होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 23:28 IST

‘एस’ वळण काढून रस्ता सरळ करून जुन्या टोलनाक्यापर्यंत जोडण्यास प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणची जमीन नव्याने संपादित करणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जमीन संपादनासाठी सहकार्य करावे, अशी साद शेतकऱ्यांना घातली.

ठळक मुद्देपाच वर्षांत १२९ लहान-मोठे अपघात; १०२ प्रवासी मृत्यू, २८२ जणांना कायमचे अपंगत्व

खंडाळा : पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर खंबाटकी बोगद्यानजीक असणारे तीव्र उताराचे अतिधोकादायक ‘एस’ वळण वाहनचालक व प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. मानवी जीवाचा कर्दनकाळ ठरलेले हे वळण कायमस्वरुपी काढण्यासाठी जनतेतून अनेकदा उठाव झाला होता. शेकडो प्रवाशांचे प्राण गेल्यानंतर प्रशासनाने अखेर ‘एस’ वळण काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यावर गेल्या दोन वर्षांत कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे धोकादायक वळणाच्या विळख्यातून प्रवाशांची सुटका कधी होणार? हा प्रश्न अधांतरीच आहे.

‘एस’ वळण काढून रस्ता सरळ करून जुन्या टोलनाक्यापर्यंत जोडण्यास प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणची जमीन नव्याने संपादित करणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जमीन संपादनासाठी सहकार्य करावे, अशी साद शेतकऱ्यांना घातली. दरम्यान, खंडाळा येथील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यामुळे हे वळण काढण्यासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. ‘एस’ वळण काढण्यासाठी ३९ खातेदारांचे सुमारे सव्वाचार एकर क्षेत्र नव्याने भूसंपादित करण्यात आले आहे.

खंडाळा तालुक्यातून जाणारा पुणे-बेंगलोर आशियाई महामार्ग तालुक्याच्या विकासाला दिशादर्शक ठरत असला तरी वाहनधारकांना व प्रवाशांना मृत्यूचा सापळाच ठरला आहे. याच महामार्गावरील चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेल्या ‘एस’ आकाराच्या वळणावर गत पाच वर्षांत १२९ लहान-मोठे अपघात झाले असून, यामध्ये १०२ प्रवासी मयत तर सुमारे २८२ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. महामार्गावरील पंढरपूर फाटा, केसुर्डी फाटा, पारगाव उड्डाणपूल, खंबाटकीचा घाट व बोगदा ओलांडून पुढे आल्यानंतरचे ‘एस’ वळण ही अपघाताची प्रमुख ठिकाणे आहेत. या अपघाताच्या ठिकाणी कोणत्याही कायमस्वरुपी सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अपघातांची मालिका अखंडितपणे सुरूच आहे.

यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आंदोलनाचे हत्यार वेळोवेळी उपसले; परंतु त्यांच्या मागण्यांना केराची टोपली संबंधित विभागाकडून दाखवण्यात आली. खंबाटकी बोगदा ओलंडल्यानंतर असलेल्या ‘एस’ वळणावर लोकांच्या जीविताशी खेळण्याचा खेळ सुरू असून, वळण काढले जात नाही आणि उपाययोजनाही केल्या जात नाहीत, त्यामुळे तालुकावासीय, वाहनधारक व प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याला अनुसरूनच तहसील कार्यालय खंडाळा येथे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली ‘एस’ कॉर्नर काढण्याबाबत व नवीन रस्त्याच्या जमीन संपादनासाठी शेतकरी यांची बैठकही घेण्यात आली होती.

अपघाताची मालिका सुरूच ...खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असणाऱ्या ‘एस’ वळणाचा धोका अद्यापही कमी झाला नाही. बोगद्याच्या पुढे आल्यावर तीव्र उतारामुळे वाहनांची गती वाढत जाते, हे बºयाचदा चालकांच्या लक्षात येत नाही. पुढे अचानक ‘एस’ आकाराचे वळण असल्याने येथे नेहमी अपघात होत असतात. दोनच दिवसांपूर्वी या ठिकाणी सात वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये पोलीस कर्मचाºयास एक पाय गमवावा लागला होता. या वळणावर प्रवाशांचा मृत्यूचा आकडा शंभरीवर पोहोचला आहे. मात्र या वळणावर अद्याप उपाययोजना झाली नाही, त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे नवीन बोगदा केव्हा होणार आणि या वळणाचे काष्ट शुक्ल कधी सुटणार? याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

खंबाटकी बोगदा आणि ‘एस’ वळणावर वारंवार अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार यावर नेहमीच तात्पुरती मलमपट्टी करीत असतात. कायमस्वरुपी उपाययोजना मार्गी लागली नसल्याने अद्यापही अपघात घडतात. तरीही याकडे डोळेझाकपणा केला जातोय. याबाबत नवीन बोगद्याचा मार्ग तारणहार ठरणार आहे; पण तो तातडीने व्हायला हवा.- अजित यादव, उपजिल्हाप्रमुख शिवसेना

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागSatara areaसातारा परिसर