शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
2
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
3
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
4
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
5
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
6
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
7
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
8
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
9
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
10
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
11
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
12
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
13
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
14
नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...
15
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...
16
IND vs WI: यशस्वी जयस्वालवर चेंडू फेकणं जेडेन सील्सला महागात पडलं; आयसीसीनं ठोठावला 'इतका' दंड!
17
चाबहार बंदर, वाघा बॉर्डर आणि..; भारत-अफगाणिस्तानात 'या' मुद्द्यांवर चर्चा, मुत्ताकी यांची माहिती
18
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
19
संतापजनक! बहिणीला भेटायला चाललेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर रस्त्यातच सामूहिक बलात्कार
20
AI नाही, भारतीयांच्या टॅलेंटची कमाल! या तरुणाच्या क्रिएटिव्हिटीने लावले सर्वांना वेड; व्हिडीओ एकदा बघा

‘एस’ वळण ठरतोय प्रवाशांसाठी कर्दनकाळ..! प्रवाशांची सुटका होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 23:28 IST

‘एस’ वळण काढून रस्ता सरळ करून जुन्या टोलनाक्यापर्यंत जोडण्यास प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणची जमीन नव्याने संपादित करणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जमीन संपादनासाठी सहकार्य करावे, अशी साद शेतकऱ्यांना घातली.

ठळक मुद्देपाच वर्षांत १२९ लहान-मोठे अपघात; १०२ प्रवासी मृत्यू, २८२ जणांना कायमचे अपंगत्व

खंडाळा : पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावर खंबाटकी बोगद्यानजीक असणारे तीव्र उताराचे अतिधोकादायक ‘एस’ वळण वाहनचालक व प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. मानवी जीवाचा कर्दनकाळ ठरलेले हे वळण कायमस्वरुपी काढण्यासाठी जनतेतून अनेकदा उठाव झाला होता. शेकडो प्रवाशांचे प्राण गेल्यानंतर प्रशासनाने अखेर ‘एस’ वळण काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यावर गेल्या दोन वर्षांत कोणतीही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे धोकादायक वळणाच्या विळख्यातून प्रवाशांची सुटका कधी होणार? हा प्रश्न अधांतरीच आहे.

‘एस’ वळण काढून रस्ता सरळ करून जुन्या टोलनाक्यापर्यंत जोडण्यास प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणची जमीन नव्याने संपादित करणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जमीन संपादनासाठी सहकार्य करावे, अशी साद शेतकऱ्यांना घातली. दरम्यान, खंडाळा येथील शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यामुळे हे वळण काढण्यासाठी प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आहेत. ‘एस’ वळण काढण्यासाठी ३९ खातेदारांचे सुमारे सव्वाचार एकर क्षेत्र नव्याने भूसंपादित करण्यात आले आहे.

खंडाळा तालुक्यातून जाणारा पुणे-बेंगलोर आशियाई महामार्ग तालुक्याच्या विकासाला दिशादर्शक ठरत असला तरी वाहनधारकांना व प्रवाशांना मृत्यूचा सापळाच ठरला आहे. याच महामार्गावरील चुकीच्या पद्धतीने निर्माण केलेल्या ‘एस’ आकाराच्या वळणावर गत पाच वर्षांत १२९ लहान-मोठे अपघात झाले असून, यामध्ये १०२ प्रवासी मयत तर सुमारे २८२ जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. महामार्गावरील पंढरपूर फाटा, केसुर्डी फाटा, पारगाव उड्डाणपूल, खंबाटकीचा घाट व बोगदा ओलांडून पुढे आल्यानंतरचे ‘एस’ वळण ही अपघाताची प्रमुख ठिकाणे आहेत. या अपघाताच्या ठिकाणी कोणत्याही कायमस्वरुपी सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अपघातांची मालिका अखंडितपणे सुरूच आहे.

यासाठी तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आंदोलनाचे हत्यार वेळोवेळी उपसले; परंतु त्यांच्या मागण्यांना केराची टोपली संबंधित विभागाकडून दाखवण्यात आली. खंबाटकी बोगदा ओलंडल्यानंतर असलेल्या ‘एस’ वळणावर लोकांच्या जीविताशी खेळण्याचा खेळ सुरू असून, वळण काढले जात नाही आणि उपाययोजनाही केल्या जात नाहीत, त्यामुळे तालुकावासीय, वाहनधारक व प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याला अनुसरूनच तहसील कार्यालय खंडाळा येथे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली ‘एस’ कॉर्नर काढण्याबाबत व नवीन रस्त्याच्या जमीन संपादनासाठी शेतकरी यांची बैठकही घेण्यात आली होती.

अपघाताची मालिका सुरूच ...खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असणाऱ्या ‘एस’ वळणाचा धोका अद्यापही कमी झाला नाही. बोगद्याच्या पुढे आल्यावर तीव्र उतारामुळे वाहनांची गती वाढत जाते, हे बºयाचदा चालकांच्या लक्षात येत नाही. पुढे अचानक ‘एस’ आकाराचे वळण असल्याने येथे नेहमी अपघात होत असतात. दोनच दिवसांपूर्वी या ठिकाणी सात वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये पोलीस कर्मचाºयास एक पाय गमवावा लागला होता. या वळणावर प्रवाशांचा मृत्यूचा आकडा शंभरीवर पोहोचला आहे. मात्र या वळणावर अद्याप उपाययोजना झाली नाही, त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे नवीन बोगदा केव्हा होणार आणि या वळणाचे काष्ट शुक्ल कधी सुटणार? याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

खंबाटकी बोगदा आणि ‘एस’ वळणावर वारंवार अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार यावर नेहमीच तात्पुरती मलमपट्टी करीत असतात. कायमस्वरुपी उपाययोजना मार्गी लागली नसल्याने अद्यापही अपघात घडतात. तरीही याकडे डोळेझाकपणा केला जातोय. याबाबत नवीन बोगद्याचा मार्ग तारणहार ठरणार आहे; पण तो तातडीने व्हायला हवा.- अजित यादव, उपजिल्हाप्रमुख शिवसेना

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागSatara areaसातारा परिसर