शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

‘वावर तेथे ठिबकची पॉवर’ चळवळ राबवा

By admin | Updated: July 2, 2015 00:27 IST

कृषी सप्ताहास प्रारंभ : जिल्हा परिषदेत कार्यक्रम; शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सातारा : ‘जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण, मृदसंधारण यांची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व कळण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘वावर तेथे ठिबकची पॉवर’ ही चळवळ जोरदारपणे राबवून टप्प्याटप्प्याने जिल्हा ठिबक सिंचनमय करावा,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी विभाग जिल्हा परिषद सातारा व कृषी विभाग राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी सभागृह येथे कृषी सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. सुदाम आडसूळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे, कृषी विकास अधिकारी दिगंबर बागल आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी मुदगल म्हणाले, ‘दिवंगत वसंतराव नाईक यांनी हरितक्रांतीची सुरुवात करून महाराष्ट्रामध्ये ४ कृषी विद्यापीठांची स्थापना केली. या विद्यापीठांमधून कृषीविषयक संशोधनाला चालना देण्यात आली. राज्यामध्ये सिंचन क्षेत्रामध्ये ८० टक्के कोरडवाहू भाग आहे. उसासारख्या पिकाला पाटाने पाणी देऊन खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अतिरिक्त पाण्यामुळे जमिनी क्षारपड बनत आहेत. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीची संवर्धन करणे सध्या महत्त्वाचे झाले आहे. दिवगंत नाईक यांच्या हरितक्रांतीचा आदर्श घेऊन दुसऱ्या हरितक्रांतीची सुरुवात नैसर्गिक साधनसंपत्ती टिकविण्याच्या माध्यमातून आणि शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊन करणे काळाची गरज आहे. सातारा जिल्ह्यामधील २१५ गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची, भूमिसंधारणाची कामे झाली आहेत. या अभियानातून केवळ पाणी उपलब्ध करून देणे हे पुरेसे नाही. त्याचा वापर योग्य पद्धतीने करणे आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत कळणे हे महत्त्वाचे आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे. ‘ज्याच्याकडे वावर त्याच्याकडे पॉवर,’ या म्हणीचा मी वेगळ्या पद्धतीने वापर करू इच्छितो ‘वावर तेथे ठिबकची पॉवर’ ही चळवळ नियोजनबद्ध कार्यक्रमाने जिल्ह्यात उभी केल्यास जिल्ह्यातील शेती टप्प्याटप्प्याने शंभर टक्के ठिबक सिंचनमय होईल.’यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कृषी विकास अधिकारी दिगंबर बागल यांनी प्रास्ताविक केले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)दि. ६ रोजी शेतकऱ्यांचा मेळावा...‘सेंद्रिय शेती संदर्भाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे, या हेतूने दि. ६ जुलै रोजी सेंद्रिय शेतकऱ्यांचा मेळावा या कृषी सप्ताहअंतर्गत घेण्यात येणार आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि नैसर्गिक साधनसंपत्ती टिकविण्यासाठी ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही,’ असे संचालक डॉ. आडसूळ म्हणाले. दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतीमध्ये मोठे योगदान दिले. त्यांनी दिलेल्या संदेशानुसार कृषीमध्ये बदल होणे आवश्यक आहे. राज्याची शेती ऊर्जितावस्थेला नेण्यासाठी त्यांची ध्येय धोरणे होती. हरित क्रांतीबरोबरच त्यांनी धवल क्रांतीची घोषणा केली होती. कृषी सप्ताहाच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांत जागृती करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान दिले पाहिजे.