शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगावचा राजमा दराअभावी पुन्हा धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:14 IST

संजय कदम।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : देशाच्या राजधानीत ‘राजमा’ या नावाने प्रसिद्ध असलेला कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील घेवडा यंदा दराअभावी पुन्हा अडचणीत सापडला आहे. यामुळे पुढच्यावर्षी राजमा पिकवायचा की नाही? असा प्रश्न घेवडा उत्पादक शेतकºयांना पडला आहे.कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत इथला शेतकरी कायम ...

संजय कदम।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : देशाच्या राजधानीत ‘राजमा’ या नावाने प्रसिद्ध असलेला कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील घेवडा यंदा दराअभावी पुन्हा अडचणीत सापडला आहे. यामुळे पुढच्यावर्षी राजमा पिकवायचा की नाही? असा प्रश्न घेवडा उत्पादक शेतकºयांना पडला आहे.कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत इथला शेतकरी कायम दुष्काळी संकटाचा सामना करत आला आहे. घेवडा पिकासाठी लागणारे पोषक वातावरण या भागात असल्याने हा भाग घेवडा उत्पादनात अग्रणी मानला जातो. तसेच या पिकावर या भागातील अनेक शेतकºयांचे वर्षाचे अर्थचक्र अवलंबून आहे. मात्र, या पिकाचा समावेश पीक विम्यात नसल्याने तसेच या पिकास कोणताही हमीभाव नसल्याने या पिकाची दिल्ली दरबारी कायम निराशा राहिली आहे.कोरेगावतील शेतकºयांची दिवाळी राजम्याच्या दर आणि उत्पादनावर अवलंबून असते. मात्र, यंदाचा घेवड्याचा दर पाहिला तर कापूस, कांदा उत्पादन करणाºया शेतकºयांची अवस्था झाली आहे. यापेक्षा बिकट अवस्था घेवडा उत्पादन करणाºया शेतकºयांची झाली आहे.कोरेगावातला घेवडा ‘दिल्ली बाजारी राजमा’ नावाने विकला जात असला तरी परदेशातून केलेल्या आयातीच्या प्रमाणावर घेवड्याचा दर निश्चित होत असतो. गेल्या काही वर्षांत रुपयाचे जागतिक मूल्य कमी झाल्यामुळे आयातीवर प्रतिकूल परिणाम होऊन घेवड्याची आयात कमी झाली. परिणामी घेवड्याचा भाव वधारला होता. यंदा मात्र, पावसाने अगोदरच पाठ फिरविली आहे. पर्यायाने घेवड्याचं उत्पन्न कमी होऊन सुद्धा दर मात्र, गेल्यावर्षीपेक्षा फारच कमी आहेत.टिकाव लागणं अशक्य...शेतकºयांना थेट दिल्लीचा दर मिळावा, म्हणून देऊर येथील एका सामाजिक संस्थेने राजम्याचं पेटंट देखील मिळविलं होतं. पण, प्रचंड भांडवल आणि भांडवलदारांच्या स्पर्धेत कोणाचाच टिकाव लागणं शक्य नाही. त्यामुळे पर्यायाने शेतकरी हतबल होऊन व्यापारी घेईल त्याच दराने घेवडा विकताना दिसत आहे. अशा पद्धतीने संकटांचा सामना करणाºया कोरेगावच्या शेतकºयांपुढे पुढीलवर्षी राजमा करायचा की नाही, हाच एक प्रश्न उभा ठाकला आहे.