शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

खडकाळ माळरानाला लाभली स्ट्रॉबेरीची लाली!

By admin | Updated: December 26, 2014 23:54 IST

घोटेघरला अनोखा प्रयोग : रामदास महाडिकांच्या कष्टाचे चीज

कुडाळ : मुंबईची रोजची धावपळ, दगदग सहन करूनही प्रपंच भागत नव्हता. सूर्योदयापासून सुरू होणारा कष्टाचा प्रवास दिवसाच्या अस्तानंतरही फारसा समाधानकारक ठरत नव्हता. गावाकडे परतावे की मुंबईत राहावे, अशी द्विधा मन:स्थिती होती. अखेर मुंबईतले बिऱ्हाड गावाकडे हलविण्याचा निर्णय घेतला. अन् मेहनतीने खडकाळ रानावर स्ट्रॉबेरी रुजवली. ही कथा आहे, जावळी तालुक्यातील घोटेघर येथील रामदास महाडिक यांच्या कष्टाची. रामदास महाडिक यांचे शिक्षण पाचवीपर्यंतच झाले होते. वडिलोपार्जित शेती अगदीच कमी होती. तीन भावांचा निभाव लागणे कठीण होते. म्हणून त्यांनी उदरनिर्वाहसाठी थेट मध्यप्रदेश गाठले. तेथून मुंबईत आले. मुंबईत दिवसरात्र कष्ट उपसून काही रक्कम जमविली. भरतकामाच्या चार मशीन विकत घेतल्या. भांडूपमध्ये कारागिरांच्या मदतीने भरतकामात जम बसविण्यात सुरुवात केली. अशातच झालेली फसवणूक रोजीरोटीला धक्का आणि मनाला चटका देऊन गेली. तेथून महाडिक आणि पत्नी सुनीता यांच्या वाट्याला पुन्हा काबाडकष्ट आले; परंतु हाती मात्र फारसे लागत नव्हते. त्याची सल मनाला सारखी बोचत होती. मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न निर्माण झाला होता. यातूनच मुंबई सोडली. मेढा-पाचगणी रस्त्यावर काहीशा आतल्या बाजूची ५३ गुंठे खडकाळ जमीन विकत घेतली. तिथे झाडाझुडपांशिवाय काही नव्हते. हार न माणण्याचा स्वभावामुळे ते पुढे सरसावले. सर्व प्रथम ५३ गुंठ्यापैकी काही गुंठ्याचे सपाटीकरण केले. राष्ट्रीयकृत बँकेकडून एक लाख ऐंशी हजारांचे कर्ज घेतले. कूपनलिका घेतली; पण वीज नव्हती. जनरेटर खरेदी केले. ठिबक सिंचन केले आणि स्ट्रॉबेरी रुजविण्याचा संकल्प केला. स्ट्रॉबेरी रुजताना पाहून त्यांचे स्वप्नेही फुलू लागली. शेतासाठी संपूर्ण कुटुंबच एकवटले. स्ट्रॉबेरीला बहर आला. कष्टाचे चीज झाले. त्यांनी ५३ गुंठ्यातील आणखी उर्वरित क्षेत्राचे सपाटीकरण केले. त्यातही स्ट्रॉबेरी लागवडीस सुरुवात केली. शिल्लक क्षेत्रावरील दगडही आता त्यांनी दूर केले आहेत. ते वर्षाला दीड-दोन लाखांच्या भांडवलातून चार लाखांपर्यंत उत्पन्न मिळू लागले आहे. स्ट्रॉबेरीची तोडणीस पहाटेच सुरुवात करून सकाळी अकराच्या आत भिलार येथे पाठविली जातात. तिथे एक कंपनी स्ट्रॉबेरी खरेदी करते. सर्वोत्तम दर्जाच्या स्ट्रॉबेरीला १५० रुपये किलोचा भाव मिळत आहे. ‘विंटर’ आणि ‘कॅमारोजा’ जातींच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. (प्रतिनिधी)अस्वस्थतेतून गावाकडे आलो आणि स्ट्रॉबेरीबरोबर मनालाही मातीत रुजवून घेतले. संपूर्ण कुटुंबीय शेतीकडे वळालो असून मुलांना शिक्षण मिळाला लागले आहे.- रामदास महाडिक