शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

रबर लागवडीला जिल्ह्यात बंदी

By admin | Updated: September 6, 2015 20:54 IST

दीपक केसरकर : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कुडाळचा विकास करणार

कुडाळ : कुडाळचा विकास अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येईल. विकास करताना कोणताही प्रश्न आल्यास तो प्रश्न तातडीने सोडवून विकास साधला जाईल. तसेच जिल्ह्यात रबर लागवडीसाठी बंदी घालण्यात आली असून, प्रदूषणकारी रबरऐवजी फळझाडांची लागवड करावी, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली.कुडाळच्या विकासासंदर्भात पालकमंत्री केसरकर यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, माजी उपसभापती बबन बोभाटे, पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर, युवा सेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट, प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, गटविकास अधिकारी जयवंत उगले, शिवसैनिक व शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री केसरकर म्हणाले, कुडाळ शहर व तालुक्याचा विकास झपाट्याने होण्यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. येथील रस्ते, आरोग्य, पाणी इतर पायाभूत, मूलभूत सोयीसुविधा सहज उपलब्ध होण्यासाठी येत्या काही दिवसांत येथे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या विकासकामांना सुरुवात होणार आहे. कुडाळ नगरपंचायत झाली असून, नगरविकास आराखड्यावेळी अनेक विकासकामे मंजूर होतील. तसेच आताही प्रशासक असला, तरी येथील विकासकामे करण्यात येणारच आहेत. कुडाळ ही व्यापारी बाजारपेठ असून, तीही विकसित करण्यात येणार आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने कर्ली नदीकिनाऱ्यालगतच्या नेरूर, वालावल गावांमध्ये बॅक वॉटरची सुविधा लवकरच निर्माणकरण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या विकासासाठी २५ लाखांचा निधी तर ऐतिहासिक घोडेबंदराकरिताही निधी दिल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील शिवकालीन रांगणागड व शिवापूर-पाटगाव जोडणारा रस्ता होण्यासाठी सर्व्हे सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.जिल्ह्यात रबर लागवडीचे प्रमाण वाढत असून, रबर लागवडीकरिता मोठ्या प्रमाणात अन्य वृक्षांची तोड केली जात आहे. रबरच्या झाडाला फळेही लागत नाहीत किंवा त्याचा अन्य वापर होत नाही. तो प्रदूषणकारी आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापुढे रबर लागवडीवर बंदी घालण्यात आली असून, रबराऐवजी फळझाडांची लागवड करा, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले.यावेळी केसरकर यांनी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाला भेट देत ग्रामीण रुग्णालयातील सद्य:स्थितीचा आढावा घेतला. तसेच तापसरीच्या रुग्णांची विचारपूस केली व आवश्यक त्या सूचना आरोग्य विभागाला केल्या. यावेळी कुडाळातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या पालकमंत्र्यांकडे मांडल्या. (प्रतिनिधी)नदीपात्रात बंधारे बांधणारटाळंबा धरण अद्याप पूर्णत्वास नाही. मात्र, याठिकाणी पाण्याची पातळी चांगली राहण्यासाठी तालुक्यातील नदीपात्रामध्ये कमी खर्चात बंधारे बांधण्याचे नियोजन सुरू असून, यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातून एक समिती कोकण विद्यापीठाला गेली होती, असे पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.