शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

‘रोजी’ गेली शिवभोजन थाळी देणार ‘रोटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू करतानाच गोरगरिबांच्या उदरनिवार्हाचा प्रश्नही मार्गी लावला आहे. शासनाने दि. ३० ...

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू करतानाच गोरगरिबांच्या उदरनिवार्हाचा प्रश्नही मार्गी लावला आहे. शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील तब्बल अडीच हजार गोरगरीब या भोजनाचा लाभ घेत आहेत.

हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना पोटभर अन्न मिळावे यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी प्रत्येक जिल्ह्यात सुरू केली आहे. सातारा जिल्ह्यात शिवभोजन थाळी देणारी १० केंद्रे असून, पूर्वी दररोज साडेतीन हजार नागरिक या थाळीचा लाभ घेत होते. यासाठी दहा रुपये शुल्क आकारले जात होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत अनेकांची ‘रोजी’ बंद झाली आहे. अशा लोकांना शिवभोजन थाळीच्या माध्यमातून ‘रोटी’ देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे.

शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला असून, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही थाळी मोफत दिली जात आहे. सद्य:स्थितीला जिल्ह्यातील अडीच हजार गरीब शिवभोजन थाळीतून आपले पोट भरत आहेत. शिवभोजन थाळी सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील तब्बल ८ लाख २० हजार गोरगरिबांनी याचा लाभ घेतला आहे.

(कोट)

आमचं हातावर पोट आहे. काम मिळालं तरच घर चालतं. संचारबंदीमुळे आता रोजी पूर्णत: बंद आहे. मात्र, शासनाच्या शिवभोजन थाळीने रोटी देऊन आम्हाला मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयाचे कौतुक करावे लागेल.

- विशाल साखरे, सातारा

(कोट)

मी मोलमजुरी करतो. मिळेल ते काम करतो. मला शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळत आहे. संचारबंदीमुळे सर्वच कामे थांबल्याने पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र, शासनाने शिवभोजन थाळी मोफत देऊन हा प्रश्न मार्गी लावला.

- ज्ञानेश्वर पवार, सातारा

(कोट)

शिवभोजन थाळी गोरगरिबांचे पोट भरण्याचं काम करीत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मी शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहे. शासनाने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न मार्गी लावून संचारबंदीच्या काळात आम्हाला मोठा दिलासा दिला आहे.

- विठ्ठल कदम, सातारा

(पॉइंटर)

जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्रे - १०

लाभ घेणारे नागरिक - २५००

(डमी न्यूज)