शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मगर नदीत; पण खळबळ गावात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्करेठरे बुद्रुक : येथील कृष्णा नदीच्या पात्रात मासेमारी करणाºयांना मगरीचे दर्शन झाले. त्यांनी तातडीने तेथून गावात धूम ठोकली. माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीने दवंडी देऊन कोणीही पात्राकडे जाऊ नये, असे आवाहन केले.रेठरे बुद्रुक येथे नदीपात्रात मासेमारी करणाºयांची संख्या जास्त आहे. गावालगत असलेल्या खडकावर अनेक मच्छीमार दिवसभर मासे पकडण्यासाठी थांबतात. हौशी ...

लोकमत न्यूज नेटवर्करेठरे बुद्रुक : येथील कृष्णा नदीच्या पात्रात मासेमारी करणाºयांना मगरीचे दर्शन झाले. त्यांनी तातडीने तेथून गावात धूम ठोकली. माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीने दवंडी देऊन कोणीही पात्राकडे जाऊ नये, असे आवाहन केले.रेठरे बुद्रुक येथे नदीपात्रात मासेमारी करणाºयांची संख्या जास्त आहे. गावालगत असलेल्या खडकावर अनेक मच्छीमार दिवसभर मासे पकडण्यासाठी थांबतात. हौशी ग्रामस्थ गळ टाकून मासा पकडण्याचा प्रयत्न करतात. बुधवारी सकाळीही काही मच्छीमार मासे पकडण्यासाठी नदीपात्राकडे गेले होते.पात्रात जाळे टाकून ते बसलेले असताना अचानक दोन मगरींचे त्यांना दर्शन झाले. त्यामुळे साहित्य तेथेच टाकून त्या मच्छीमारांनी पात्राबाहेर पळ काढला. काही अंतरावर जाऊन पुन्हा त्यांनी खात्री करून घेतली. त्यावेळी त्या दोन्ही मगरीच असल्याचे त्यांना दिसले. संबंधित मासेमारी करणाºयांनी तातडीने याबाबतची माहिती ग्रामपंचायतीत दिली. काही वेळांतच ही बाब वाºयासारखी गावात पसरली. अनेकांनी मगर पाहण्यासाठी नदीकाठावर धाव घेतली.दरम्यान, खबरदारीची उपाययोजना म्हणून ग्रामपंचायतीने गुरुवारी सकाळीच गावात दवंडी दिली. नदीपात्रामध्ये मगर असल्यामुळे कोणीही पात्राकडे जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले. पात्रामध्ये असलेल्या खडकावर दररोज महिला धुणी धुण्यासाठी जातात. तसेच अनेक ग्रामस्थ आपली जनावरे धुण्यासाठीही त्या परिसरात जातात. मगरीमुळे जीवितहानी होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने गावातदवंडी दिली.