शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

"राष्ट्रवादीने शिवसेना पोखरली म्हणूनच उठाव..., आपला तो बाबा दुसऱ्याचं कारटं म्हणणं बंद करा" - शंभुराज देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 22:07 IST

Shambhuraj Desai: आम्ही बेईमानी केली, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणत असतील तर पहाटेचा केलेला शपथविधी ही बेईमानी नाही का?, असा सवाल करून ‘आपला तो बाबा दुसऱ्याचं ते कारटं’ असं म्हणण्याचा उद्योग अजित पवारांनी बंद करावा,’

- रवींद्र माने

 ढेबेवाडी - ‘अडीच वर्षांपासून शिवसेना पक्ष पोखरण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून चालू होते, ही बाब आम्हाला पटली नाही म्हणूनच आम्ही उठाव करून शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, या बाबीला आम्ही बेईमानी केली, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणत असतील तर पहाटेचा केलेला शपथविधी ही बेईमानी नाही का?, असा सवाल करून ‘आपला तो बाबा दुसऱ्याचं ते कारटं’ असं म्हणण्याचा उद्योग अजित पवारांनी बंद करावा,’ असा सल्ला पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. भोसगाव (ता. पाटण) येथे विभागातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, कारखान्याचे संचालक सर्जेराव जाधव, शिवाजीराव शेवाळे, विकासगिरी गोसावी, रणजित पाटील, ज्योतीराज काळे, तुषार देशमुख, मनोज मोहिते, शिवाजीराव जगदाळे, अंकुश महाडिक, नानासाहेब साबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री देसाई म्हणाले, ‘अडीच वर्षे महाविकास आघाडीमध्ये असताना आम्हाला आमचा पारंपरिक शत्रू काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून बसावे लागत होते. त्यावेळी खूपच त्रास होत होता, आमचे मुख्यमंत्री असतानाही आमचाच पक्ष पोखरण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने चालू होते. विकासकामांसाठी निधी देताना आमदारांबरोबर त्यांच्या पराभूत झालेल्या उमेदवारालाही तेवढाच निधी दिला जायचा, हा जाच आम्हाला सहन झाला नाही. याबाबत पक्ष प्रमुखांच्याकडे अनेक वेळेला तक्रारी करूनही त्यावर निर्णय झाला नाही. म्हणूनच ५५ आमदारांपैकी ४० आमदार, १२ खासदार यांनी मिळून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवण्यासाठी उठाव केला. युवा नेते मनोज मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पोपटराव देशमुख यांनी प्रास्ताविक केले. अजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

विरोधकांनी जनतेत संभ्रम निर्माण करू नये...विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमच्या या निर्णयाला आता बेईमानी म्हटले आहे, मग २०१९ मध्ये अजित पवार यांनी पहाटेच्या वेळी केलेला शपथविधी याला काय म्हणायचे?, असा प्रश्न करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. विरोधक करत असलेल्या टीका आणि बदनामी थांबवण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत आपले विचार पोहोचवावे, आम्ही गावागावांत आणि वाडी-वस्तीत विकास निधी पोहोचवण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईSatara areaसातारा परिसरShiv Senaशिवसेना