शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

"राष्ट्रवादीने शिवसेना पोखरली म्हणूनच उठाव..., आपला तो बाबा दुसऱ्याचं कारटं म्हणणं बंद करा" - शंभुराज देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 22:07 IST

Shambhuraj Desai: आम्ही बेईमानी केली, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणत असतील तर पहाटेचा केलेला शपथविधी ही बेईमानी नाही का?, असा सवाल करून ‘आपला तो बाबा दुसऱ्याचं ते कारटं’ असं म्हणण्याचा उद्योग अजित पवारांनी बंद करावा,’

- रवींद्र माने

 ढेबेवाडी - ‘अडीच वर्षांपासून शिवसेना पक्ष पोखरण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून चालू होते, ही बाब आम्हाला पटली नाही म्हणूनच आम्ही उठाव करून शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, या बाबीला आम्ही बेईमानी केली, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणत असतील तर पहाटेचा केलेला शपथविधी ही बेईमानी नाही का?, असा सवाल करून ‘आपला तो बाबा दुसऱ्याचं ते कारटं’ असं म्हणण्याचा उद्योग अजित पवारांनी बंद करावा,’ असा सल्ला पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. भोसगाव (ता. पाटण) येथे विभागातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, कारखान्याचे संचालक सर्जेराव जाधव, शिवाजीराव शेवाळे, विकासगिरी गोसावी, रणजित पाटील, ज्योतीराज काळे, तुषार देशमुख, मनोज मोहिते, शिवाजीराव जगदाळे, अंकुश महाडिक, नानासाहेब साबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री देसाई म्हणाले, ‘अडीच वर्षे महाविकास आघाडीमध्ये असताना आम्हाला आमचा पारंपरिक शत्रू काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून बसावे लागत होते. त्यावेळी खूपच त्रास होत होता, आमचे मुख्यमंत्री असतानाही आमचाच पक्ष पोखरण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने चालू होते. विकासकामांसाठी निधी देताना आमदारांबरोबर त्यांच्या पराभूत झालेल्या उमेदवारालाही तेवढाच निधी दिला जायचा, हा जाच आम्हाला सहन झाला नाही. याबाबत पक्ष प्रमुखांच्याकडे अनेक वेळेला तक्रारी करूनही त्यावर निर्णय झाला नाही. म्हणूनच ५५ आमदारांपैकी ४० आमदार, १२ खासदार यांनी मिळून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवण्यासाठी उठाव केला. युवा नेते मनोज मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पोपटराव देशमुख यांनी प्रास्ताविक केले. अजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

विरोधकांनी जनतेत संभ्रम निर्माण करू नये...विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमच्या या निर्णयाला आता बेईमानी म्हटले आहे, मग २०१९ मध्ये अजित पवार यांनी पहाटेच्या वेळी केलेला शपथविधी याला काय म्हणायचे?, असा प्रश्न करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. विरोधक करत असलेल्या टीका आणि बदनामी थांबवण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत आपले विचार पोहोचवावे, आम्ही गावागावांत आणि वाडी-वस्तीत विकास निधी पोहोचवण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईSatara areaसातारा परिसरShiv Senaशिवसेना