शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

"राष्ट्रवादीने शिवसेना पोखरली म्हणूनच उठाव..., आपला तो बाबा दुसऱ्याचं कारटं म्हणणं बंद करा" - शंभुराज देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2022 22:07 IST

Shambhuraj Desai: आम्ही बेईमानी केली, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणत असतील तर पहाटेचा केलेला शपथविधी ही बेईमानी नाही का?, असा सवाल करून ‘आपला तो बाबा दुसऱ्याचं ते कारटं’ असं म्हणण्याचा उद्योग अजित पवारांनी बंद करावा,’

- रवींद्र माने

 ढेबेवाडी - ‘अडीच वर्षांपासून शिवसेना पक्ष पोखरण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून चालू होते, ही बाब आम्हाला पटली नाही म्हणूनच आम्ही उठाव करून शिवसेना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, या बाबीला आम्ही बेईमानी केली, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणत असतील तर पहाटेचा केलेला शपथविधी ही बेईमानी नाही का?, असा सवाल करून ‘आपला तो बाबा दुसऱ्याचं ते कारटं’ असं म्हणण्याचा उद्योग अजित पवारांनी बंद करावा,’ असा सल्ला पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. भोसगाव (ता. पाटण) येथे विभागातील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, कारखान्याचे संचालक सर्जेराव जाधव, शिवाजीराव शेवाळे, विकासगिरी गोसावी, रणजित पाटील, ज्योतीराज काळे, तुषार देशमुख, मनोज मोहिते, शिवाजीराव जगदाळे, अंकुश महाडिक, नानासाहेब साबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री देसाई म्हणाले, ‘अडीच वर्षे महाविकास आघाडीमध्ये असताना आम्हाला आमचा पारंपरिक शत्रू काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मांडीला मांडी लावून बसावे लागत होते. त्यावेळी खूपच त्रास होत होता, आमचे मुख्यमंत्री असतानाही आमचाच पक्ष पोखरण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने चालू होते. विकासकामांसाठी निधी देताना आमदारांबरोबर त्यांच्या पराभूत झालेल्या उमेदवारालाही तेवढाच निधी दिला जायचा, हा जाच आम्हाला सहन झाला नाही. याबाबत पक्ष प्रमुखांच्याकडे अनेक वेळेला तक्रारी करूनही त्यावर निर्णय झाला नाही. म्हणूनच ५५ आमदारांपैकी ४० आमदार, १२ खासदार यांनी मिळून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवण्यासाठी उठाव केला. युवा नेते मनोज मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी पोपटराव देशमुख यांनी प्रास्ताविक केले. अजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

विरोधकांनी जनतेत संभ्रम निर्माण करू नये...विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमच्या या निर्णयाला आता बेईमानी म्हटले आहे, मग २०१९ मध्ये अजित पवार यांनी पहाटेच्या वेळी केलेला शपथविधी याला काय म्हणायचे?, असा प्रश्न करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये. विरोधक करत असलेल्या टीका आणि बदनामी थांबवण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत आपले विचार पोहोचवावे, आम्ही गावागावांत आणि वाडी-वस्तीत विकास निधी पोहोचवण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईSatara areaसातारा परिसरShiv Senaशिवसेना