शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

रेठरे खुर्द ग्रामपंचायत बरखास्तच!

By admin | Updated: March 22, 2017 22:36 IST

विभागीय आयुक्तांचा निकाल : सत्ताधाऱ्यांना चपराक; विरोधकांचा जल्लोष

कऱ्हाड : नियमबाह्य बांधकाम परवाना दिल्याचा ठपका ठेवून रेठरे खुर्द ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा निर्णय पुणे आयुक्तांनी जानेवारी महिन्यात घेतला होता. मात्र, आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात सरपंच व पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्रालयाकडे दाद मागितली होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना दिलासा मिळेल, असे वाटत होते. मात्र, ग्रामविकास मंत्रालयाने हे प्रकरण फेरचौकशीसाठी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे पाठविले. मात्र, विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांनी पहिला निर्णय कायम ठेवल्याने रेठरे खुर्द ग्रामपंचायत बरखास्तीवर शिक्कामोर्फब झाले आहे.अतिक्रमण हटविण्याबाबत गेल्या पंचवीस वर्षांपासून रेठरे खुर्द येथे काही ग्रामस्थ पाठपुरावा करीत होते. तक्रारदार संतोष जाधव व इतरांनी यासाठी पाठपुरावा केला. गावातील दिनकर जाधव यांच्याकडूून सार्वजनिक जागेत भिंत बांधून अतिक्रमण करण्यात आले होते. याविरोधात १९९१ पासून या गावातील ग्रामस्थ अतिक्रमण हटविण्याबाबत लढा देत आहेत. याबाबत २००६ मध्ये ग्रामपंचायतीच्या बाजूने पहिला निकाल लागला. तरीही अतिक्रमण हटविण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली. याबाबत गटविकास अधिकारी कऱ्हाड यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यांनी परिस्थितीचा अभ्यास करून अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या ग्रामपंचायत बॉडीच्या विरोधात कारवाई करावी, असा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा अहवाल तसाच पुढे पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठविला. आणि जानेवारी महिन्यात आयुक्तांनी सरपंच पुष्पा पाटील, उपसरपंच धनाजी जाधव यांच्यासह सर्व सदस्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला.मात्र, हा निर्णय मान्य नसल्याने सरपंच पाटील यांनी ग्रामविकास मंंत्रालयाकडे अपील केले. हे अपील अंशतहा मान्य झाल्यानंतर हे प्रकरण पुन्हा पुन:सुनावणीसाठी पुणे आयुक्तांकडे पाठविण्यात आले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, पुणे आयुक्त याबाबत काय निर्णय घेणार याबाबत धाकधुक होतीच. याबाबत १६ मार्च रोजी आयुक्त चोकलिंगम यांनी पुन:चौकशी करून निकाल दिला असून, यामध्ये सरपंच, उपसरंपचासह सर्व सदस्यांना पदावरून काढून टाकण्यात येत आहे. हा निर्णय कायम ठेवल्याने सत्ताधाऱ्यांना चपराक बसली आहे. (प्रतिनिधी)कोणतीही लढाई बारकी किंवा मोठी नसते. रेठरेमधील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी आम्ही केलेली लढाई आमच्यासाठी खूप मोठी आहे. अनेकांनी राजकीय हस्तक्षेप करून देखील आमची बाजू सत्याचीच असल्यामुळे निकालावर आक्षेप घेतलेला असताना देखील आम्हाला न्याय मिळाला आहे. ही समाधानाची बाब आहे. सत्याचाच नेहमीच विजय होतो. हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.- अधिकराव पाटील,सामाजिक कार्यकर्ते, रेठरे खुर्दरेठरे खुर्दच्या ग्रामपंचायत बॉडी बरखास्त करण्याबाबतचे प्रकरण बरेच दिवस सुरू होते. आयुक्तांनी यापूर्वी ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सत्ताधारी गटाने मंत्री समितीकडे अपील केले होते. त्यानंतर आयुक्तांकडे पुन:सुनावणी झाली. या सुनावणीत एकूण सरपंच, उपसरपंचांसह अकरापैकी नऊ सदस्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.- अविनाश फडतरेगटविकास अधिकारी, पंचायत समिती कऱ्हाड