शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

रेठरे खुर्द ग्रामपंचायत बरखास्तच!

By admin | Updated: March 22, 2017 22:36 IST

विभागीय आयुक्तांचा निकाल : सत्ताधाऱ्यांना चपराक; विरोधकांचा जल्लोष

कऱ्हाड : नियमबाह्य बांधकाम परवाना दिल्याचा ठपका ठेवून रेठरे खुर्द ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा निर्णय पुणे आयुक्तांनी जानेवारी महिन्यात घेतला होता. मात्र, आयुक्तांच्या या निर्णयाविरोधात सरपंच व पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्रालयाकडे दाद मागितली होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना दिलासा मिळेल, असे वाटत होते. मात्र, ग्रामविकास मंत्रालयाने हे प्रकरण फेरचौकशीसाठी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे पाठविले. मात्र, विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांनी पहिला निर्णय कायम ठेवल्याने रेठरे खुर्द ग्रामपंचायत बरखास्तीवर शिक्कामोर्फब झाले आहे.अतिक्रमण हटविण्याबाबत गेल्या पंचवीस वर्षांपासून रेठरे खुर्द येथे काही ग्रामस्थ पाठपुरावा करीत होते. तक्रारदार संतोष जाधव व इतरांनी यासाठी पाठपुरावा केला. गावातील दिनकर जाधव यांच्याकडूून सार्वजनिक जागेत भिंत बांधून अतिक्रमण करण्यात आले होते. याविरोधात १९९१ पासून या गावातील ग्रामस्थ अतिक्रमण हटविण्याबाबत लढा देत आहेत. याबाबत २००६ मध्ये ग्रामपंचायतीच्या बाजूने पहिला निकाल लागला. तरीही अतिक्रमण हटविण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली. याबाबत गटविकास अधिकारी कऱ्हाड यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यांनी परिस्थितीचा अभ्यास करून अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या ग्रामपंचायत बॉडीच्या विरोधात कारवाई करावी, असा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा अहवाल तसाच पुढे पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठविला. आणि जानेवारी महिन्यात आयुक्तांनी सरपंच पुष्पा पाटील, उपसरपंच धनाजी जाधव यांच्यासह सर्व सदस्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला.मात्र, हा निर्णय मान्य नसल्याने सरपंच पाटील यांनी ग्रामविकास मंंत्रालयाकडे अपील केले. हे अपील अंशतहा मान्य झाल्यानंतर हे प्रकरण पुन्हा पुन:सुनावणीसाठी पुणे आयुक्तांकडे पाठविण्यात आले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, पुणे आयुक्त याबाबत काय निर्णय घेणार याबाबत धाकधुक होतीच. याबाबत १६ मार्च रोजी आयुक्त चोकलिंगम यांनी पुन:चौकशी करून निकाल दिला असून, यामध्ये सरपंच, उपसरंपचासह सर्व सदस्यांना पदावरून काढून टाकण्यात येत आहे. हा निर्णय कायम ठेवल्याने सत्ताधाऱ्यांना चपराक बसली आहे. (प्रतिनिधी)कोणतीही लढाई बारकी किंवा मोठी नसते. रेठरेमधील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी आम्ही केलेली लढाई आमच्यासाठी खूप मोठी आहे. अनेकांनी राजकीय हस्तक्षेप करून देखील आमची बाजू सत्याचीच असल्यामुळे निकालावर आक्षेप घेतलेला असताना देखील आम्हाला न्याय मिळाला आहे. ही समाधानाची बाब आहे. सत्याचाच नेहमीच विजय होतो. हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.- अधिकराव पाटील,सामाजिक कार्यकर्ते, रेठरे खुर्दरेठरे खुर्दच्या ग्रामपंचायत बॉडी बरखास्त करण्याबाबतचे प्रकरण बरेच दिवस सुरू होते. आयुक्तांनी यापूर्वी ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सत्ताधारी गटाने मंत्री समितीकडे अपील केले होते. त्यानंतर आयुक्तांकडे पुन:सुनावणी झाली. या सुनावणीत एकूण सरपंच, उपसरपंचांसह अकरापैकी नऊ सदस्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.- अविनाश फडतरेगटविकास अधिकारी, पंचायत समिती कऱ्हाड