शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

शिक्षकांची बदली न करण्याचा गावोगावच्या सभेत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 16:50 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या नव्याने आलेल्या बदली धोरणामुळे खंडाळा तालुक्यातील अनेक शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्यातच या शैक्षणिक वर्षातील अर्धा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बदली प्रक्रिया राबत असल्यामुळे प्रत्येक शाळेचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

ठळक मुद्दे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदली धोरणखंडाळा तालुक्यातील अनेक शिक्षकांच्या बदल्या होणार पालकांची चिंता वाढली, प्रत्येक शाळेचे शैक्षणिक नुकसान होणारनव्या निकषावरून शिक्षक संघटना आक्रमक

खंडाळा : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या नव्याने आलेल्या बदली धोरणामुळे खंडाळा तालुक्यातील अनेक शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्यातच या शैक्षणिक वर्षातील अर्धा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बदली प्रक्रिया राबत असल्यामुळे प्रत्येक शाळेचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

आपल्या पाल्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांच्या बदली विरोधात जनक्षोभ उसळला असून, खंडाळा तालुक्यातील गावोगावच्या ग्रामसभेत या वर्षात बदल्या करू नयेत, असे ठराव घेण्यात आले आहेत.

 नव्या निकषावरून होणाºया शिक्षक बदल्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या. याचा परिणाम जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीवरही होण्याची शक्यता आहे. आपल्या शाळेतील शिक्षकांची बदली होणार असल्याचे समजल्याने पालकवर्ग चिंतेत आहे. तर ज्या शिक्षकांची बदली होणार आहे त्यांच्या मुलांच्या पुढील निम्म्या वर्षाच्या शिक्षणाची अडचणही निर्माण होणार असल्याने तेही हवालदिल आहेत.

 वास्तविक नवीन शैक्षणिक धोरणानुसार वर्षभर मुलांचे मूल्यमापन करून त्याच्या प्रगतीच्या नोंदी करावयाच्या असतात. त्यामुळे जून महिन्यापासून आत्तापर्यंत लहान मुलांना ज्या शिक्षकांच्या अध्यापनाची सवय आहे तेच बदलत असल्याने पालकही अस्वस्थ आहेत. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील गावोगावी ग्रामस्थांनीच आपल्या मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांची बदली करू नये, असे ठराव ग्रामसभेतून घेतले आहेत. शिक्षकांवर होणाºया अन्यायाविरोधात संघटनांनी पुढाकार घेतला असताना सर्वसामान्य पालकवर्गातून जनक्षोभ उसळल्याने आता शासन यावर काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आमच्या गावातील शाळेचे कामकाज चांगल्या रीतीने चालू आहे. शाळा प्रगतीपथावर असताना आणि निम्मे शैक्षणिक वर्ष संपले असताना मध्येच शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याने यात मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शासनाने पालकांच्या भावना विचारात घेऊन यावर्षी बदली प्रक्रिया थांबवावी. ग्रामसभेतून लोकांच्या याच भावना उमटल्या आहेत.- स्वाती माळी,सरपंच, म्हावशी