शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

शिक्षकांची बदली न करण्याचा गावोगावच्या सभेत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 16:50 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या नव्याने आलेल्या बदली धोरणामुळे खंडाळा तालुक्यातील अनेक शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्यातच या शैक्षणिक वर्षातील अर्धा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बदली प्रक्रिया राबत असल्यामुळे प्रत्येक शाळेचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

ठळक मुद्दे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदली धोरणखंडाळा तालुक्यातील अनेक शिक्षकांच्या बदल्या होणार पालकांची चिंता वाढली, प्रत्येक शाळेचे शैक्षणिक नुकसान होणारनव्या निकषावरून शिक्षक संघटना आक्रमक

खंडाळा : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या नव्याने आलेल्या बदली धोरणामुळे खंडाळा तालुक्यातील अनेक शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्यातच या शैक्षणिक वर्षातील अर्धा कालावधी पूर्ण झाल्यानंतर बदली प्रक्रिया राबत असल्यामुळे प्रत्येक शाळेचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

आपल्या पाल्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांच्या बदली विरोधात जनक्षोभ उसळला असून, खंडाळा तालुक्यातील गावोगावच्या ग्रामसभेत या वर्षात बदल्या करू नयेत, असे ठराव घेण्यात आले आहेत.

 नव्या निकषावरून होणाºया शिक्षक बदल्या विरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या. याचा परिणाम जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीवरही होण्याची शक्यता आहे. आपल्या शाळेतील शिक्षकांची बदली होणार असल्याचे समजल्याने पालकवर्ग चिंतेत आहे. तर ज्या शिक्षकांची बदली होणार आहे त्यांच्या मुलांच्या पुढील निम्म्या वर्षाच्या शिक्षणाची अडचणही निर्माण होणार असल्याने तेही हवालदिल आहेत.

 वास्तविक नवीन शैक्षणिक धोरणानुसार वर्षभर मुलांचे मूल्यमापन करून त्याच्या प्रगतीच्या नोंदी करावयाच्या असतात. त्यामुळे जून महिन्यापासून आत्तापर्यंत लहान मुलांना ज्या शिक्षकांच्या अध्यापनाची सवय आहे तेच बदलत असल्याने पालकही अस्वस्थ आहेत. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील गावोगावी ग्रामस्थांनीच आपल्या मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांची बदली करू नये, असे ठराव ग्रामसभेतून घेतले आहेत. शिक्षकांवर होणाºया अन्यायाविरोधात संघटनांनी पुढाकार घेतला असताना सर्वसामान्य पालकवर्गातून जनक्षोभ उसळल्याने आता शासन यावर काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आमच्या गावातील शाळेचे कामकाज चांगल्या रीतीने चालू आहे. शाळा प्रगतीपथावर असताना आणि निम्मे शैक्षणिक वर्ष संपले असताना मध्येच शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याने यात मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शासनाने पालकांच्या भावना विचारात घेऊन यावर्षी बदली प्रक्रिया थांबवावी. ग्रामसभेतून लोकांच्या याच भावना उमटल्या आहेत.- स्वाती माळी,सरपंच, म्हावशी