शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

अपंगांसाठीच्या दारात चारचाकींसाठी आरक्षण

By admin | Updated: December 9, 2014 00:29 IST

प्रशासन सुस्त : अपंग सप्ताह साजरा करुनही येईना जाग

सातारा : सातारा जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या समाजकल्याण विभागाकडून अपंगांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून असंख्य अपंग लाभार्थी येत असतात. त्यांना आत येणे सुसह्य व्हावे, म्हणून जिल्हा परिषदेच्या इमारतीत छोटा दरवाजा तयार केला आहे. याठिकाणीच चारचाकी वाहनांसाठी आरक्षण तसेच मोटारसायकली लावलेल्या असतात. त्यामुळे अपंगांना इमारतीत जाताना कसरत करावी लागत आहे.कोणत्याही शासकीय इमारत किंवा सार्वजनिक ठिकाणी अपंगांना सहज वावरत यावे, त्यांची तीनचाकी सायकल, स्कूटर आत आणता यावी यासाठी ठराविक उताराचा सिमेंटपासून उतार देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीतील दोन नंबरला छोटा दरवाजा तयार केला आहे. त्या ठिकाणी उतारही केला आहे. या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर उजव्या बाजूलाच समाजकल्याण विभाग आहे. याठिकाणाहून अपंगांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्या योजनांची माहिती घेण्यासाठी संबंधित लाभार्थी नियमित येत असतात. असे लाभार्थी स्वत:च्या तीन चाकी सायकल किंवा स्कूटर घेऊन येत असतात. या ठिकाणी आल्यानंतर त्यांची वाहने उभी करण्यासाठी आरक्षण केलेले नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी रिकामी जागा असेल तेथेच ते उभे करावे लागतात. रिकाम्या जागेत वाहन उभे केल्यानंतर दरवाजापर्यंत कसरत करत जावे लागते. या दरवाजाच्या जवळच चारचाकी वाहनांसाठी जागा आरक्षित केली आहे. त्यामुळे या ठिकाणी अपंगांसाठीसाठी जागा आरक्षित करावी, अशी मागणी होत आहे. जिल्हा परिषदेतून अपंग सप्ताह साजरा केला गेला. मात्र, अपंगांच्या समस्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या ठिकाणचे अडथळे हटवून अपंगांसाठीचा मार्ग सुसह्य करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)मार्गात उभारले अडथळेजिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांनी मोटारसायकली अस्ताव्यस्त लावू नयेत, म्हणून या गेटच्या दारात बांबूच्या साह्याने अडथळे तयार केले होते. त्यामुळे प्रवेशद्वाराच्या दारात अपंगांना गाडी लावण्यासाठी रिकामी जागा मिळाली तरी त्यांना वाहन लावल्यानंतर लांबून वळसा घालून इमारतीत जावे लागत होते.