शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने पिके भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 14:15 IST

सातारा जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून याचा सर्वाधिक फटका पिकांना बसला आहे. फलटण, खटाव तालुक्यात सोयाबीन, ऊस, बाजरी तर वाई तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

ठळक मुद्दे दुष्काळी तालुक्यांसह बहुतांश ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी नुकसान झाल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट फलटण, खटाव तालुक्यात सोयाबीन, ऊस, बाजरी तर वाई तालुक्यात भात पिकाचे नुकसानभात पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदील

सातारा,11  : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले असून याचा सर्वाधिक फटका पिकांना बसला आहे. फलटण, खटाव तालुक्यात सोयाबीन, ऊस, बाजरी तर वाई तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

दुष्काळी माण, खटाव, फलटण व कोरेगाव तालुक्यात पावसाळा संपत आला तरी मान्सूनने पाठ फिरवली होती. पाऊस पडण्याची आशा धुसर झाली असतानाच गेल्या पंधरा दिवसांपासून दुष्काळी तालुक्यांसह बहुतांश ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली. खटाव व फलटण तालुक्याला गेल्या पाच दिवसांपासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.

या पावसामुळे ओढे, नाले, बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत. दुष्काळी तालुक्यांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, दुसरीकडे पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

हातातोंडाशी आलेली बाजरी, सोयबीन, ऊस या पिकांचे शेतात पाणी साचल्याने नुकसान झाले. तर वाई तालुक्यात भात पिकाला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. भात पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.