शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

आले उत्पादकांना दराची लॉटरी शेतकऱ्यांना दिलासा : क्विंटलला सहा हजार रुपये दर; दोन वर्षांनंतर दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 22:43 IST

पिंपोडे बुद्रुक : गेले जवळपास दोन वर्षे किमान पातळीवर राहिलेल्या आल्याच्या दरात झालेली उच्चांकी वाढ पाहता आल्याच्या दरातील तेजीने शेतकऱ्यांच्या चेहºयावरदेखील तेजी आल्याचे पाहावयास मिळत आहे.

पिंपोडे बुद्रुक : गेले जवळपास दोन वर्षे किमान पातळीवर राहिलेल्या आल्याच्या दरात झालेली उच्चांकी वाढ पाहता आल्याच्या दरातील तेजीने शेतकऱ्यांच्या चेहºयावरदेखील तेजी आल्याचे पाहावयास मिळत आहे.दोन वर्षे आल्याचा दर अगदीच स्थिर होऊन तो शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या पातळीवर रेंगाळत होता. त्यामुळे आले उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. दर व पाण्याच्या अभावामुळे बहुतांशी शेतकºयांनी आल्याची काढणी करून मिळेल त्या भावात विक्री करून समाधान मानल्याने आले लागवडीखालील क्षेत्रात घट झाली होती. त्याचा नेमका परिणाम म्हणून आल्याचा दरात भरघोस वाढ झाली आहे. गेली दोन वर्षे आल्याचा दर प्रति क्विंटल सोळाशे ते दोन हजार रुपये राहिला. दिवसेंदिवस भांडवली खर्चात होणारी वाढ लक्षात घेता आल्याचा हा बाजारभाव शेतकऱ्यांना न परवडणारा असल्याने शेतकºयांनी आल्याच्या उत्पादनाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आल्याच्या उत्पादनात घट होऊन दरात वाढ झाली. एप्रिलमध्ये नवीन लागवडीसाठी बियाणे म्हणून रुपये ३२०० ते ३५०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होणारे आले. सध्या ५२०० ते ६००० प्रति क्विंटल दराने विकले जात आहे. दरम्यान आल्याच्या दरातील उच्चांकी वाढीमुळे आले उत्पादक शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.आल्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकºयांना जास्तीचा आर्थिक फायद्याचा गवगवा केला जात असला तरी आल्याचा मागील बाजारभाव खोडव्यापर्यंतचा उत्पादनाचा खर्च लक्षात घेता आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकºयांनीच आल्याची जोपासणा केल्याने दरवाढीचा फायदा निवडक शेतकऱ्यांनाच होणार आहे.- दयाराम सोळस्कर, नायगावआल्याच्या दरात अचानक तेजी आल्याने बियाणे विकत घेऊन नवीन लागवड करू इच्छिणाºया शेतकºयाची निराशा झाली आहे.- सुदाम पाटणकर, उपसरपंच वाघोली.