शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष, शिकार की मृत याबाबत साशंकता 

By दीपक शिंदे | Updated: December 4, 2023 18:20 IST

सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम भागामध्ये वन्यप्राण्यांच्या शिकारीचा गुंता अजूनही सुटायला तयार नाही. तृणभक्षी प्राण्यांच्या शिकारी सातत्याने होत ...

सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम भागामध्ये वन्यप्राण्यांच्या शिकारीचा गुंता अजूनही सुटायला तयार नाही. तृणभक्षी प्राण्यांच्या शिकारी सातत्याने होत आहेत. नुकतेच कारगाव येथे सांबराचे अवशेष आढळून आले आहेत. यावरून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना अभयारण्य परिसरात आजही राजरोसपणे शिकारी वन्यजीवांच्या हत्या करत असल्याचे स्पष्ट होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी, कोयना शिवसागराच्या पश्चिम भागातील निषिद्ध प्रवेश क्षेत्रात वन कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने शिकारी घुसखोरी करून वन्यजीवांची शिकार करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यातच सांबर या प्राण्याचा मृताचा सांगाडा, केस, पाय, बरगड्या हे अवशेष ताज्या अवस्थेत आढळल्यामुळे वनविभागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वन विभागाने शिकाऱ्यांचा शोध घेऊन कठोर कारवाईची पावले उचलावी, अशी स्थानिक जनतेतून मागणी होत आहे.वन्यजीव संरक्षण व संवर्धन हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उद्दिष्ट असून ही या परिसरात अनेक वन्यजीवांच्या तस्करीसाठी हत्या होत असल्याने वन्यजीव संरक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सजगतेच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्मचारी दक्षतेचा पहारा देत असतील तर वन विभागाच्या हद्दीत शिकारी घुसतात कसे? वन्य प्राण्यांच्या हत्या करतात कसे? असे प्रश्न या परिसरातील स्थानिक जनतेमधून विचारण्यात येत आहे. वरिष्ठ विभागाने सांबर या वन्यप्राण्याची हत्या की मृत याचे प्रयोगशाळेतील नमुने तपासून याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त पर्यावरणप्रेमींतून केली जात आहे.तस्करीसाठी हत्यासह्याद्रीत बिबट्या, खवलेमांजर, सांबर, रानडुक्कर आदी वन्यजीवांची तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात हत्या होत असल्याची माहिती आहे. मात्र, भीतीमुळे नाव न सांगण्याच्या अटीवर कोयना, कांदाटी खोरे परिसरातील काही लोक खासगीत चर्चा करतात.कोट्यावधी रुपयांचा निधीसह्याद्री व्याघ्र संवर्धनावर दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो. मात्र, वन्यजीवांचे संरक्षण होत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा जैवविविधतेने समृद्ध असा प्रकल्प असून वनखात्याच्या दुर्लक्षामुळे वन्यजीवांची हत्या, वाढती शिकार रोखण्यात अपयश येत आहे.

शिकार की मृत्यू याबाबत अद्याप आम्हाला काही कल्पना नाही. घटनास्थळी भेट देऊन संबंधित अवशेष ताब्यात घेऊन तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठवणार आहोत. - विजय बाठे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बामणोली

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग