शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

बांधकाम कामगारांनो नोंदणी करा, कुटुंबाला मिळेल 'इतक्या' लाखाचे आर्थिक संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 13:54 IST

कामगाराच्या अपघाती मृत्यूनंतर कामगाराच्या कुटुंबीयांना शासनामार्फत ५ लाख रुपयांची मदत केली जाते. मात्र असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या या कामगारांना हे ठाऊकच नाही.

सागर गुजर

सातारा : बांधकाम क्षेत्रासह इतर ठिकाणी काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ शासनाने तयार केले आहे. जिल्ह्यातील १० हजार कामगारांनी यासाठी नोंदणी केली आहे. कामगाराच्या अपघाती मृत्यूनंतर कामगाराच्या कुटुंबीयांना शासनामार्फत ५ लाख रुपयांची मदत केली जाते. मात्र असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या या कामगारांना हे ठाऊकच नाही.

बांधकाम क्षेत्र हे असंघटित कामगारांचे क्षेत्र असून त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून संरक्षण दिले जाते. अनेक कामगार या क्षेत्रात काम करत असले तरी बरेच जण नोंदणी करत नाहीत. त्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. आर्थिक सहाय्य योजना ही अत्यंत प्रभावी आणि कामगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी फलदायी ठरणारी योजना आहे.

 १० हजार अर्ज

कामगार आयुक्त कार्यालयाकडे आत्तापर्यंत १० हजार बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे. कार्यालयामार्फत जास्तीत जास्त कामगारांनी नाेंदणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख

नोंदित बांधकाम कामगाराचा कामावर असताना अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला ५ लाख आर्थिक सहाय्य दिले जाते. संबंधित कामगाराच्या पत्नीला सलग पाच वर्षे २४ हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते.

 तीन वर्षात १० हजार प्रस्ताव

कामगार आयुक्त कार्यालयाकडे नोंद असलेल्या १० हजार कामगारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यानुसार त्यांना सुरक्षा दिली जाणार आहे.

 योजना आहे, हेच ठाऊक नाही !

नोंदित बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजना योजना राबवल्या जातात. कामगारांनी या योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांनी तर लवकरात लवकर आपली नोंद कामगार कार्यालयाकडे करावी. - चेतन जगताप, सहायक आयुक्त कामगार कल्याण

कामगारांसाठी कोणत्या योजना आहेत, याची माहितीच नाही. रोज काम करणे आठवड्याला मजुरी मिळवून बाजार करणे यातच आमचं आयुष्य निघून चाललं आहे. आम्हाला ऑनलाईन नोंदणी कशी करायची तेही माहित नाही. - रुपाली गुजर, बांधकाम कामगार

शासकीय योजनांचा लाभ वशिलेबाजी करणारांनाच मिळतो. आमचा वशिला कोण लावणार? आमच्यासाठी कोण वेळ काढणार? आम्हाला रोज काम करुन दिवस काढावा लागतो. कामावर गेलो नाही तर कोण पैसे देणार? - संभाजी खलाटे

टॅग्स :Satara areaसातारा परिसर