शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेल मागणी कमी; दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:39 IST

सातारा : कोरोना विषाणुमुळे लाॅकडाऊन असल्याने खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दर स्थिर राहिला आहे. मात्र, दुसरीकडे पालेभाज्यांचा ...

सातारा : कोरोना विषाणुमुळे लाॅकडाऊन असल्याने खाद्यतेलाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दर स्थिर राहिला आहे. मात्र, दुसरीकडे पालेभाज्यांचा भाव उतरला असून, वाटाण्याचाच फक्त दर वाढला आहे. सातारा बाजार समितीत वाटाण्याला क्विंटलला ८ ते १० हजारांपर्यंत भाव मिळत आहे.

सातारा बाजार समितीत गुरुवार आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक असते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक राहतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यातून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही माल येत असतो. मात्र, कोरोना लाॅकडाऊन असल्याने मागील काही दिवसांत आवक कमी झालेली आहे. सातारा बाजार समितीत रविवारी ६७४ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा १८३, बटाटा १७८, लसूण १२ आणि आल्याची ४ क्विंटल आवक राहिली. आंबा, खरबूज, कलिंगड यांचीही आवक झाली.

सोयाबीन तेल डबा २४००

मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. सध्या लाॅकडाऊन असून, दर स्थिर असला तरी सर्वसामान्यांना महागाईची झळ बसत आहेच. सूर्यफूल तेल डबा २५५० ते २६०० पर्यंत मिळत आहे. शेंगतेल डबा २७०० ते २८००, सोयाबीनचा २४०० रुपयांपर्यंत मिळत आहे, तर पामतेल डबा २१०० रुपयांपर्यंत आहे.

आंब्याची आवक वाढली

सातारा बाजार समितीत आंबा, कलिंगड, खरबूज आवक होत आहे. रविवारी आंब्याची सर्वाधिक ४२ क्विंटलची आवक झाली, तर कलिंगडाची आवक थोडी झाली.

मिरचीला दर...

सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ८० ते १००, फ्लॉवर १०० ते १५०, दोडका २०० ते २५०, मिरचीला २५० ते ३०० रुपये दर १० किलोला मिळाला. कांद्याला क्विंटलला १२००, लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाला.

कोट :

कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. मंडई बंद आहेत. त्यामुळे घरासमोर विक्रेते येतात. त्यांच्याकडून खरेदी करतो. दर अधिक असतो. तसेच सर्व भाज्या मिळत नाहीत.

- रामचंद्र काळे, ग्राहक

मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. दरात तेजी असल्याने सोयाबीन तेलाला मागणी आहे. सध्या लाॅकडाऊनमुळे दुकाने बंद आहेत. दर स्थिर राहिले आहेत.

- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी

कोरोनामुळे लाॅकडाऊन आहे. त्यामुळे भाज्यांना मागणी कमीच आहे. बाजार समितीतही शेतमालाला दर कमी आहे. काही शेतमाल तर विक्रीअभावी कुजून जाऊ लागलाय.

- प्रकाश पाटील, शेतकरी