शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

साताऱ्यात २२ वर्षांनी विद्रोही साहित्य संमेलन 

By नितीन काळेल | Updated: June 10, 2025 21:13 IST

प्रति सरकारला समर्पित : ‘क्रांतिसिंहं’च्या जयंतीचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष; १५ वे संमेलन 

-नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रचे १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन साताऱ्यात होणार आहे. २२ वर्षांनी पुन्हा हे संमेलन साताऱ्यात होत आहे. हे संमेलन क्रांतिसिंह नाना पाटील आणि साताऱ्याच्या प्रतिसरकारला समर्पित करण्यात आलेले आहे, अशी माहिती अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव, सचिव डॉ. जालिंदर घिगे यांनी दिली.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त साताऱ्यात संमेलन घेण्याचे ठरले आहे. सातारा येथे यापूर्वी २००२ मध्ये ४ थे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन झाले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबा आढाव संमेलनाचे अध्यक्ष होते. आता २२ वर्षानंतर पुन्हा एकदा साताऱ्यात संमेलन होणार आहे. साताऱ्याच्या प्रतिसरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संमेलनाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. साताऱ्याचे प्रतिसरकार हे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, महिला यांना सोबत घेऊन जाणारे होते. त्यांच्या उत्कर्षाचं काम करणारे होते. त्यांनी केवळ घोषणा केल्या नाहीत तर गरिबातील गरिबांना न्याय देण्याच्या दृष्टीनं भूमिका घेऊन सातत्यानं कार्य केले. म्हणून विद्रोही सांस्कृतिक चळवळ साताऱ्याच्या प्रतिसरकारला महत्त्व देते. त्यासाठीच साताऱ्याला होणारे नियोजित १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन क्रांतिसिंह नाना पाटील व प्रतिसरकारला समर्पित करत आहे.

या संमेलनात लोकसाहित्य आणि साताऱ्याचे प्रतिसरकार, वारकरी आणि साताऱ्याचे प्रतिसरकार, साहित्यातील महिलांच्या प्रतिमा व विद्रोही साहित्य, स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्र लढ्यात साहित्यिक आणि कलावंतांचे योगदान, आदिवासींचे सशस्त्र लढे व स्वातंत्र्य चळवळ, भारतीय संविधानाची ७५ वर्षे या अनुषंगानं चर्चासत्रे, परिसंवाद तसेच विद्रोही शाहिरी जलसा, कवी संमेलन होणार आहेत, अशी माहितीही प्रवक्ते अविनाश कदम आणि विजय मांडके यांनी दिली.दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू अॅड. सुभाष पाटील, व्ही. वाय पाटील, प्रसेनजीत गायकवाड, कॉ. शिवराम सुकी, कॉ. अशोक जाधव, हभप डॉ. सुहास फडतरे, डॉ. बापू चंदनशिवे, प्रा. दिनकर दळवी, प्रा. सुधीर अनवले, ज्योती आदाटे, ॲड. सरफराज बागवान, ॲड. राजेंद्र गलांडे, प्रा. सीमा मुसळे, शिवराम ठवरे, राहुल गंगावणे, शुभम ढाले आदी संमेलन यशस्वी होण्यासाठी सक्रीय झाले आहेत.

१४ वे संमेलन पुण्यात पार...

- विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे १४ वे साहित्य संस्कृती संमेलन २०२२ मधील डिसेंबर महिन्यात पुणे येथे पार पडले होते. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर होते. तर पहिले संमेलन धारावी (मुंबई) येथे पार पडल्यानंतर कोल्हापूर, औरंगाबाद, सातारा, सावंतवाडी, पंढरपूर, धुळे, सोलापूर, इंदापूर, सांगली, राहुरी, बीड, शहादा, पुणे या ठिकाणी आतापर्यंतची संमेलने झाली आहेत.

टॅग्स :literatureसाहित्य