शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्या : गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST

सातारा : गेल्या दीड वर्षात जिल्हा प्रशासन सज्ज असताना कोरोनामुळे हकनाक बळी गेले आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने पुन्हा ...

सातारा : गेल्या दीड वर्षात जिल्हा प्रशासन सज्ज असताना कोरोनामुळे हकनाक बळी गेले आहेत. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर बोलवावे, अन्यथा आरोग्य यंत्रणा जागेवर आणण्यासाठी रिपाइं मैदानात उतरणार असल्याचा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे.

गायकवाड म्हणाले, जिल्हा आरोग्य यंत्रणेने कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणारे कर्मचारी कमी केले आहेत. हा या कर्मचाऱ्यांवर अन्याय असून, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणादेखील अडचणीत आलेली आहे. तसेच पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. संबंधित ठेकेदाराने यंत्रणा मॅनेज केली असल्याने आवाज उठवूनही कामे केली जात नाहीत. त्यामुळे गुरुवार, दि. ९ सप्टेंबर रोजी आनेवाडी टोल नाक्यावर आंदोलन करत टोल नाका बंद पाडण्याचा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिला.

गायकवाड म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याबाबत वारंवार आंदोलनाचा इशारा दिला असून, ठेकेदार काम करत नसून, जिल्हा प्रशासनाकडून त्यांना पाठीशी घातले जात आहे. सातारा जिल्हा सोडला, तर इतर ठिकाणी ही कामे सुरू आहेत. पुणे जिल्हयातील टोलनाक्यावर स्थानिकांनी टोल माफी देण्यात आली आहे. मग सातारा जिल्हयातील दोन्ही टोलनाक्यांवर (एमएच ११ व एमएच ५०) या दोन्ही पासिंगच्या गाडयांना टोल माफी का नाही. जिल्हा प्रशासनाने रस्त्याचे काम होईपर्यंत टोल बंद करावा, तसेच दोन दिवसात बैठक लावून याबाबत निर्णय घ्यावा. तो जर झाला नाही तर दि. ९ रोजी सकाळी ११ वाजता आनेवाडी टोलनाका आंदोलन होईल. त्यास सर्वस्वी जिल्हाधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.