शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

रांजणी गाव झाले जलश्रीमंत!

By admin | Updated: July 10, 2016 01:39 IST

जलसंधारणाची किमया : पहिल्याच पावसात बंधारे तुडुंब; बळीराजाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

सचिन मंगरुळे -- म्हसवड -रांजणी, ता. माण येथे ‘जलयुक्त शिवार’ योजनेतून काम झाले. त्याचबरोबर डोंबिवली फाउंडेशनने हे गाव दत्तक घेऊन स्वखर्चातून जलसंधारणाची कामे केली. यामुळे या गाव व परिसरात एका पावसातच लाखो लिटर पाणीसाठा झाला आहे. बंधारे तुडुंब भरल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे. आपल्याच गावात एवढा मोठा पाणीसाठा पाहून त्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. नुकतेच रांजणीतील सिमेंट बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माण तालुका म्हटले की दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा. परंतु आता तालुक्याची ही ओळख काहीसी पुसली जाऊ लागली आहे. राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ योजनेतून कामे सुरू केल्याने त्याचा फायदा होताना दिसत आहे. तालुक्यातील रांजणी हे सुमारे १६५० लोकसंख्येचे गाव. येथील बहुतांशी लोक उदरनिर्वाहासाठी रंगकाम, मातीकामाला व इतर उद्योगासाठी बाहेर गेलेले आहेत. येथील शेती पावसाच्या भरवशावर. पाऊस पडला तर ठिक नाहीतर पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागायची. यंदाही काहीशी अशीच परिस्थिती होती, हे चित्र डोंबिवली ( मुंबई ) येथील नानासाहेब दोलताडे यांच्या मित्रांनी पाहिले. एका कार्यक्रमानिमित्त रांजणी येथे आले होते, त्यावेळी त्यांचे याकडे लक्ष गेले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या गावासाठी काम करण्याचे ठरविले. त्यानंतर काही दिवसांनंतर त्यांनी रांजणीला भेट देऊन गाव दत्तक घेऊन प्रत्यक्षात कामालाही सुरुवात केली. डोंबवली फाउंडेशन व कृषी विभागाच्या वतीने गावात शिसव, गुलमोहर, करंज, सीताफळ, वड अशा हजारो रोपे व बियांचे रोपण नुकतेच करण्यात आले आहे. बंधाऱ्यात नुकत्याच झालेल्या पावसाने पाणीसाठा झाला आहे. त्या पाण्याचे पूजन तहसीलदार सुरेखा माने, तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर, डोंबिवली फाउंडेशनचे अध्यक्ष तुकाराम येळवे, श्यामसुंदर सोन्नर, साहेबराव दिघे, प्रवीण सावंत, सुरेश नायक, सुशील गायकवाड, बप्पा डोंगरे, नानासाहेब दोलताडे, व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले. जलसंधारणामुळे ६५० टीसीएम पाणीसाठाशासनाच्या वतीने ‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत पाणलोट विकास, टंचाई निधीतून या गावात दहा बंधारे बांधण्यात आले. तर बांधबंदिस्ती, सलग समतल चर, ४० हेक्टरवर डीपसीसीटीची कामे करण्यात आली. तर डोंबिवली फाउंडेशनच्या माध्यमातून सुमारे साडेसहा किलोमीटर लांबीचे ओढा रुंदीकरण व सरळीकरण केले. त्यामुळे ओढ्यावरील साखळी सिमेंट बंधाऱ्यात लाखो लिटर पाणीसाठा झाला आहे. या सर्व जलसंधारण कामांमुळे सध्या सुमारे ६५० टीसीएम पाणीसाठा झाला आहे. ‘डोंबिवली फाउंडेशनने येथील दुष्काळग्रस्तांसाठी जे काम केले ते निश्तिच आदर्शवत आहे. त्याच्यबरोबर प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार सुरेखा माने, कृषी अधिकारी राजेश जानकर यांनी रांजणी गावाला जलश्रीमंत करण्यासाठी साथ दिली. त्यामुळे गाव दुष्काळमक्त झाला आहे. - नानासाहेब दोलताडे