शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

रांजणी गाव झाले जलश्रीमंत!

By admin | Updated: July 10, 2016 01:39 IST

जलसंधारणाची किमया : पहिल्याच पावसात बंधारे तुडुंब; बळीराजाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

सचिन मंगरुळे -- म्हसवड -रांजणी, ता. माण येथे ‘जलयुक्त शिवार’ योजनेतून काम झाले. त्याचबरोबर डोंबिवली फाउंडेशनने हे गाव दत्तक घेऊन स्वखर्चातून जलसंधारणाची कामे केली. यामुळे या गाव व परिसरात एका पावसातच लाखो लिटर पाणीसाठा झाला आहे. बंधारे तुडुंब भरल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे. आपल्याच गावात एवढा मोठा पाणीसाठा पाहून त्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. नुकतेच रांजणीतील सिमेंट बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माण तालुका म्हटले की दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा. परंतु आता तालुक्याची ही ओळख काहीसी पुसली जाऊ लागली आहे. राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ योजनेतून कामे सुरू केल्याने त्याचा फायदा होताना दिसत आहे. तालुक्यातील रांजणी हे सुमारे १६५० लोकसंख्येचे गाव. येथील बहुतांशी लोक उदरनिर्वाहासाठी रंगकाम, मातीकामाला व इतर उद्योगासाठी बाहेर गेलेले आहेत. येथील शेती पावसाच्या भरवशावर. पाऊस पडला तर ठिक नाहीतर पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागायची. यंदाही काहीशी अशीच परिस्थिती होती, हे चित्र डोंबिवली ( मुंबई ) येथील नानासाहेब दोलताडे यांच्या मित्रांनी पाहिले. एका कार्यक्रमानिमित्त रांजणी येथे आले होते, त्यावेळी त्यांचे याकडे लक्ष गेले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या गावासाठी काम करण्याचे ठरविले. त्यानंतर काही दिवसांनंतर त्यांनी रांजणीला भेट देऊन गाव दत्तक घेऊन प्रत्यक्षात कामालाही सुरुवात केली. डोंबवली फाउंडेशन व कृषी विभागाच्या वतीने गावात शिसव, गुलमोहर, करंज, सीताफळ, वड अशा हजारो रोपे व बियांचे रोपण नुकतेच करण्यात आले आहे. बंधाऱ्यात नुकत्याच झालेल्या पावसाने पाणीसाठा झाला आहे. त्या पाण्याचे पूजन तहसीलदार सुरेखा माने, तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर, डोंबिवली फाउंडेशनचे अध्यक्ष तुकाराम येळवे, श्यामसुंदर सोन्नर, साहेबराव दिघे, प्रवीण सावंत, सुरेश नायक, सुशील गायकवाड, बप्पा डोंगरे, नानासाहेब दोलताडे, व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले. जलसंधारणामुळे ६५० टीसीएम पाणीसाठाशासनाच्या वतीने ‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत पाणलोट विकास, टंचाई निधीतून या गावात दहा बंधारे बांधण्यात आले. तर बांधबंदिस्ती, सलग समतल चर, ४० हेक्टरवर डीपसीसीटीची कामे करण्यात आली. तर डोंबिवली फाउंडेशनच्या माध्यमातून सुमारे साडेसहा किलोमीटर लांबीचे ओढा रुंदीकरण व सरळीकरण केले. त्यामुळे ओढ्यावरील साखळी सिमेंट बंधाऱ्यात लाखो लिटर पाणीसाठा झाला आहे. या सर्व जलसंधारण कामांमुळे सध्या सुमारे ६५० टीसीएम पाणीसाठा झाला आहे. ‘डोंबिवली फाउंडेशनने येथील दुष्काळग्रस्तांसाठी जे काम केले ते निश्तिच आदर्शवत आहे. त्याच्यबरोबर प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार सुरेखा माने, कृषी अधिकारी राजेश जानकर यांनी रांजणी गावाला जलश्रीमंत करण्यासाठी साथ दिली. त्यामुळे गाव दुष्काळमक्त झाला आहे. - नानासाहेब दोलताडे