शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

रांजणी गाव झाले जलश्रीमंत!

By admin | Updated: July 10, 2016 01:39 IST

जलसंधारणाची किमया : पहिल्याच पावसात बंधारे तुडुंब; बळीराजाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

सचिन मंगरुळे -- म्हसवड -रांजणी, ता. माण येथे ‘जलयुक्त शिवार’ योजनेतून काम झाले. त्याचबरोबर डोंबिवली फाउंडेशनने हे गाव दत्तक घेऊन स्वखर्चातून जलसंधारणाची कामे केली. यामुळे या गाव व परिसरात एका पावसातच लाखो लिटर पाणीसाठा झाला आहे. बंधारे तुडुंब भरल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे. आपल्याच गावात एवढा मोठा पाणीसाठा पाहून त्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. नुकतेच रांजणीतील सिमेंट बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. माण तालुका म्हटले की दुष्काळी म्हणून ओळखला जाणारा. परंतु आता तालुक्याची ही ओळख काहीसी पुसली जाऊ लागली आहे. राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ योजनेतून कामे सुरू केल्याने त्याचा फायदा होताना दिसत आहे. तालुक्यातील रांजणी हे सुमारे १६५० लोकसंख्येचे गाव. येथील बहुतांशी लोक उदरनिर्वाहासाठी रंगकाम, मातीकामाला व इतर उद्योगासाठी बाहेर गेलेले आहेत. येथील शेती पावसाच्या भरवशावर. पाऊस पडला तर ठिक नाहीतर पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागायची. यंदाही काहीशी अशीच परिस्थिती होती, हे चित्र डोंबिवली ( मुंबई ) येथील नानासाहेब दोलताडे यांच्या मित्रांनी पाहिले. एका कार्यक्रमानिमित्त रांजणी येथे आले होते, त्यावेळी त्यांचे याकडे लक्ष गेले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या गावासाठी काम करण्याचे ठरविले. त्यानंतर काही दिवसांनंतर त्यांनी रांजणीला भेट देऊन गाव दत्तक घेऊन प्रत्यक्षात कामालाही सुरुवात केली. डोंबवली फाउंडेशन व कृषी विभागाच्या वतीने गावात शिसव, गुलमोहर, करंज, सीताफळ, वड अशा हजारो रोपे व बियांचे रोपण नुकतेच करण्यात आले आहे. बंधाऱ्यात नुकत्याच झालेल्या पावसाने पाणीसाठा झाला आहे. त्या पाण्याचे पूजन तहसीलदार सुरेखा माने, तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर, डोंबिवली फाउंडेशनचे अध्यक्ष तुकाराम येळवे, श्यामसुंदर सोन्नर, साहेबराव दिघे, प्रवीण सावंत, सुरेश नायक, सुशील गायकवाड, बप्पा डोंगरे, नानासाहेब दोलताडे, व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झाले. जलसंधारणामुळे ६५० टीसीएम पाणीसाठाशासनाच्या वतीने ‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत पाणलोट विकास, टंचाई निधीतून या गावात दहा बंधारे बांधण्यात आले. तर बांधबंदिस्ती, सलग समतल चर, ४० हेक्टरवर डीपसीसीटीची कामे करण्यात आली. तर डोंबिवली फाउंडेशनच्या माध्यमातून सुमारे साडेसहा किलोमीटर लांबीचे ओढा रुंदीकरण व सरळीकरण केले. त्यामुळे ओढ्यावरील साखळी सिमेंट बंधाऱ्यात लाखो लिटर पाणीसाठा झाला आहे. या सर्व जलसंधारण कामांमुळे सध्या सुमारे ६५० टीसीएम पाणीसाठा झाला आहे. ‘डोंबिवली फाउंडेशनने येथील दुष्काळग्रस्तांसाठी जे काम केले ते निश्तिच आदर्शवत आहे. त्याच्यबरोबर प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार सुरेखा माने, कृषी अधिकारी राजेश जानकर यांनी रांजणी गावाला जलश्रीमंत करण्यासाठी साथ दिली. त्यामुळे गाव दुष्काळमक्त झाला आहे. - नानासाहेब दोलताडे