शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दारूबंदीसाठी रणरागिणी सरसावल्या

By admin | Updated: December 5, 2014 23:36 IST

वाढलेल्या अवैध दारु विक्री करणाऱ्या व्यवसायावर बंदी आणण्यासाठी रणरागिणी सह ग्रामस्थ सरसावले

खटाव : राज्यात दारुबंदिची चळवळ सर्वात प्रथम यशस्वीपणे करणाऱ्या डिस्कळ गावात सध्या वाढलेल्या अवैध दारु विक्री करणाऱ्या व्यवसायावर बंदी आणण्यासाठी रणरागिणी सह ग्रामस्थ सरसावले आहेत. अवैध धंदे हद्दपार करण्यासाठी स्थानीक पातळीवरुन ग्रामसभेत केलेला ठराव तसेच ग्रामस्थांच्या तक्रारी लिखीत स्वरुपात असलेल्या प्रती संबंधीत पोलीस स्टेशन तसेच वरीष्ठ जिल्हा कार्यालयाशी वारंवार कळवुनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अखेर नुतन मुख्यमंत्र्याकडे गावातील ग्रामस्थ तसेच पदाधिकारी व महिलांनी धाव घेउन निवेदनाव्दारे साकडे घातले आहे. २0 वर्षापुर्वी याच डिस्कळ गावाने पहिल्यांदा दारुबंदीचा निर्णय घेऊन मोठी चळवळ उभी करुन एक आदर्श निर्माण केला होता. रणरागीणी महिलां एकवटुन त्यांनी या अवैध दारु व्यवसाय बंद पाडुन तीला हद्दपार केले होते. येथील परवानाधारक धारुचे दुकान त्यावेळी बंद करण्यात आले होते. याच गावाचा आदर्श घेत जिल्यात तसेच राज्यातही अनेक गावागावातील रणरागीणी महिला वर्ग आपापल्या गावात दारुबंदी करण्यासाठी सरसावल्या. ज्या डिस्कळ गावाने दारुबंदीची मुहुर्त मेढ रोवली त्या दहा हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात आज दारु व्यवसायाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सध्या आठ ते दहा ठिकाणी दारु विक्रीसुरु आहे. स्थानीक पोलीस यंत्रणेमार्फत कोणतेच सहकार्य मिळत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी पोलीस महानिरीक्षक, तसेच पोलीस महासंचालक, यांनाही या निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत. (वार्ताहर)