शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

रामराजे कॉलर उडवित नाहीत... प्रश्न सोडवितातर-घुनाथराजे नाईक-निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:28 IST

‘रामराजे कॉलर उडवत नाहीत तर जनतेचे प्रश्न सोडवितात. रामराजेंबद्दल कोण काय म्हणतंय, याच्याशी आम्हाला देणं-घेणं नाही.

ठळक मुद्देउदयनराजेंचे नाव न घेता टीका, फलटणला शेतकरी व्यथा निवारण कक्षाचे उद्घाटन

फलटण : ‘रामराजे कॉलर उडवत नाहीत तर जनतेचे प्रश्न सोडवितात. रामराजेंबद्दल कोण काय म्हणतंय, याच्याशी आम्हाला देणं-घेणं नाही. रामराजे कॉलर उडवत नसले तरी मातृभूमीची पाण्याची तहान त्यांनी भागविली आहे. आमच्या आजोबांनी जे संस्कार दिलेत व नेहमी दुसऱ्याचे दु:ख ओळखायला शिकण्याचे तत्त्व दिले आहे, त्याचे पालन रामराजेंनी केले आहे.’ असा टोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे यांना नाव न घेता लगावला.

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते रामराजे शेतकरी व्यथा निवारण कक्ष, योजना, आरोग्य विषयक कार्यक्रम आदी योजनांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती भगवानराव होळकर, सचिव शंकरराव सोनवलकर, पंचायत समितीच्या सभापती रेश्मा भोसले, नगराध्यक्षा नीता नेवसे, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, बाजार समितीचे सर्व संचालक उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, ‘फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कल्पकतेने शेतकरी केंद्रबिंदू मानून सुरू असून, जिल्ह्यात आघाडीवर असलेली ही बाजार समिती येत्या दोन वर्षांत महाराष्ट्रातही आघाडीवर असेल. शेतकºयांच्या हिताचा विचार करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बाजार समितीचे चेअरमन व संचालक दिवसरात्र प्रयत्नशील असून, नावीन्यपूर्ण योजना बाजार समितीने राबवित शेतकºयांचा विश्वास संपादन केला आहे. शेतकरी व त्यांच्या मुलांसाठी अनेक योजना सुरू असतानाच त्यांचे आरोग्य, विजेच्या तक्रारी, महसूल विभागाकडील कामे, पोलीस आदी विभागातील प्रलंबित कामे सोडविण्यासाठी बाजार समिती आवर्जून लक्ष देत असल्याने ही बाजार समिती महाराष्ट्रात दोन वर्षांत आघाडीवर असेल.’

या हंगामात ऊस जास्त असला तरी श्रीराम आणि शरयू कारखाना जास्तीत जास्त गाळप करून वेळेवर पेमेंट देईल. मात्र, स्वराज कारखान्याबद्दल आपण सांगू शकत नाही. त्यांचं काय चाललंय, हेच कळत नसल्याची टीका रामराजेंनी केली.रघुनाथराजे म्हणाले, ‘रामराजेंच्या माध्यमातूनच आम्ही बाजार समितीचा कारभार पारदर्शक आणि शेतकरी हिताचा करीत आहे. बाजार समितीमार्फत लवकरच १२५ बेडचे हॉस्पिटल, शेतकºयांच्या मुलांना रोजगार, ८ नवीन पेट्रोल पंप, रुग्णवाहिका सेवा हे उपक्रम तातडीने शेतकºयांसाठी सुरू करणार आहोत. बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न ३ कोटी रुपयांच्या आसपास जाणार आहे.साखरवाडी कारखाना अडचणीतून बाहेर काढूतालुक्यात उसाचे पीक वाढल्याने येत्या हंगामात संपूर्ण गाळपाची समस्या निर्माण होणार आहे. साखरवाडीचा कारखाना अडचणीत आहे. तो कारखाना लवकर अडचणीतून बाहेर यावा, यासाठी राजकारण न आणता आमचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात कारखानदारी टिकली पाहिजे. मात्र कारखानदारांनी ऊस उत्पादकांचे पैसेही वेळच्या वेळी देण्याची खबरदारी घेतली पाहिजे. आज श्रीराम कारखान्याने सर्वात अगोदर एकरकमी ऊस उत्पादकांचे पैसे देऊन आदर्श निर्माण केला आहे, असेही रामराजेंनी स्पष्ट केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण