शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रामराजे कॉलर उडवित नाहीत... प्रश्न सोडवितातर-घुनाथराजे नाईक-निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:28 IST

‘रामराजे कॉलर उडवत नाहीत तर जनतेचे प्रश्न सोडवितात. रामराजेंबद्दल कोण काय म्हणतंय, याच्याशी आम्हाला देणं-घेणं नाही.

ठळक मुद्देउदयनराजेंचे नाव न घेता टीका, फलटणला शेतकरी व्यथा निवारण कक्षाचे उद्घाटन

फलटण : ‘रामराजे कॉलर उडवत नाहीत तर जनतेचे प्रश्न सोडवितात. रामराजेंबद्दल कोण काय म्हणतंय, याच्याशी आम्हाला देणं-घेणं नाही. रामराजे कॉलर उडवत नसले तरी मातृभूमीची पाण्याची तहान त्यांनी भागविली आहे. आमच्या आजोबांनी जे संस्कार दिलेत व नेहमी दुसऱ्याचे दु:ख ओळखायला शिकण्याचे तत्त्व दिले आहे, त्याचे पालन रामराजेंनी केले आहे.’ असा टोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी खासदार उदयनराजे यांना नाव न घेता लगावला.

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते रामराजे शेतकरी व्यथा निवारण कक्ष, योजना, आरोग्य विषयक कार्यक्रम आदी योजनांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती भगवानराव होळकर, सचिव शंकरराव सोनवलकर, पंचायत समितीच्या सभापती रेश्मा भोसले, नगराध्यक्षा नीता नेवसे, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, बाजार समितीचे सर्व संचालक उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, ‘फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत कल्पकतेने शेतकरी केंद्रबिंदू मानून सुरू असून, जिल्ह्यात आघाडीवर असलेली ही बाजार समिती येत्या दोन वर्षांत महाराष्ट्रातही आघाडीवर असेल. शेतकºयांच्या हिताचा विचार करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बाजार समितीचे चेअरमन व संचालक दिवसरात्र प्रयत्नशील असून, नावीन्यपूर्ण योजना बाजार समितीने राबवित शेतकºयांचा विश्वास संपादन केला आहे. शेतकरी व त्यांच्या मुलांसाठी अनेक योजना सुरू असतानाच त्यांचे आरोग्य, विजेच्या तक्रारी, महसूल विभागाकडील कामे, पोलीस आदी विभागातील प्रलंबित कामे सोडविण्यासाठी बाजार समिती आवर्जून लक्ष देत असल्याने ही बाजार समिती महाराष्ट्रात दोन वर्षांत आघाडीवर असेल.’

या हंगामात ऊस जास्त असला तरी श्रीराम आणि शरयू कारखाना जास्तीत जास्त गाळप करून वेळेवर पेमेंट देईल. मात्र, स्वराज कारखान्याबद्दल आपण सांगू शकत नाही. त्यांचं काय चाललंय, हेच कळत नसल्याची टीका रामराजेंनी केली.रघुनाथराजे म्हणाले, ‘रामराजेंच्या माध्यमातूनच आम्ही बाजार समितीचा कारभार पारदर्शक आणि शेतकरी हिताचा करीत आहे. बाजार समितीमार्फत लवकरच १२५ बेडचे हॉस्पिटल, शेतकºयांच्या मुलांना रोजगार, ८ नवीन पेट्रोल पंप, रुग्णवाहिका सेवा हे उपक्रम तातडीने शेतकºयांसाठी सुरू करणार आहोत. बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न ३ कोटी रुपयांच्या आसपास जाणार आहे.साखरवाडी कारखाना अडचणीतून बाहेर काढूतालुक्यात उसाचे पीक वाढल्याने येत्या हंगामात संपूर्ण गाळपाची समस्या निर्माण होणार आहे. साखरवाडीचा कारखाना अडचणीत आहे. तो कारखाना लवकर अडचणीतून बाहेर यावा, यासाठी राजकारण न आणता आमचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात कारखानदारी टिकली पाहिजे. मात्र कारखानदारांनी ऊस उत्पादकांचे पैसेही वेळच्या वेळी देण्याची खबरदारी घेतली पाहिजे. आज श्रीराम कारखान्याने सर्वात अगोदर एकरकमी ऊस उत्पादकांचे पैसे देऊन आदर्श निर्माण केला आहे, असेही रामराजेंनी स्पष्ट केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारण