शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

राजवाडा चौपाटी अखेर बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राजवाडा चौपाटीवरील चार हातगाडीधारकांना कोरोनाची लागण झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव चौपाटी बंद ठेवण्याचे आदेश मुख्याधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राजवाडा चौपाटीवरील चार हातगाडीधारकांना कोरोनाची लागण झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव चौपाटी बंद ठेवण्याचे आदेश मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी शुक्रवारी शहर विकास विभागाला दिले. संबंधित परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झाला असून, हातगाड्यांच्या परिसराला बॅरिकेटिंग केले जाणार आहे.

साताऱ्यातील राजवाडा चौपाटीचा विषय सर्वाधिक चर्चेचा ठरला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही येथील शंभरहून अधिक विक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली नव्हती. यानंतर दोन महिन्यांपूर्वी आळूचा खड्डा येथे पालिका प्रशासनाने हातगाडीधारकांना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, ग्राहक फिरकत नसल्याने विक्रेते आर्थिक संकटात सापडले होते. अखेर हा प्रश्न खा. उदयनराजे भोसले यांच्या कोर्टात गेला आणि त्यांनी तातडीने राजवाडा गांधी मैदानावर चौपाटी सुरू करण्याचे आदेश दिले. तब्बल वर्षभरानंतर चौपाटी सुरू झाली खरी; परंतु हातगाडीधारकांच्या मागे लागलेली समस्यांची शुक्लकाष्ट काही सुटलेली नाही.

खाद्यपदार्थाच्या गाड्या सुरू करण्यापूर्वी येथील ७५ हातगाडीधारकांनी कोरोना चाचणी केली. यापैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून चौपाटीवर आठ ते दहा हातगाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, विक्रेत्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागल्याने मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सुरक्षिततेचा कारणात्सव चौपाटी बंद करण्याचे आदेश शुक्रवारी हर विकास विभागाला दिले.

जोपर्यंत चौपाटीवरील सर्व विक्रेत्यांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त होत नाहीत तोपर्यंत चौपाटी बंद राहणार असल्याचे बापट यांनी सांगितले. ज्या विक्रेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यांच्या हातगाड्यांना बॅरिकेटिंग करणे शिवाय संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत.

(चौकट)

धास्ती कायम...

सातारा पालिकेने कस्तुरबा व गोडोली येथील रुग्णालयाच्या माध्यमातून शहरातील व्यापारी, विक्रेते व दुकानदारांची आरटीपीसीआर चाचणी सुरू केली आहे. आठ दिवसांमध्ये साठ व्यापाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. बाधितांची संख्या वाढू लागल्याने पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.