शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांच्या राजधानीत राजमुद्रेचा दंडक गायब

By admin | Updated: February 26, 2015 00:18 IST

कमानी हौद : इतिहासप्रेमींमध्ये नाराजी; दंडक पूर्ववत करण्याची मागणी

सचिन काकडे -सातारा -- मराठ्यांची राजधानी म्हणून अभिमानाने सर्वत्र मिरविणाऱ्या साताऱ्यात राजमुद्रेचा दंडक गायब झाला आहे. शहरातील ऐतिहासिक कमानी हौदातील भिंतीवर कोरण्यात आलेल्या शिवकालीन षटकोनी राजमुद्रेशेजारी चार दंडक असून, यापैकी एक दंडक अनेक वर्षांपासून गायब आहे. यामुळे इतिहासपे्रमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.कमानी हौदाला ऐतिहासिक महत्त्व आहे. याला सतरा कमानींचा हौद म्हणूनही संबोधले जाते. एकेकाळी हत्तींना पाणी पिण्यासाठी याठिकाणी आणले जात असे. या कमानी हौदाच्या देखभालीची जबाबदारी सध्या पालिका प्रशासनाकडे आहे. या हौदाचे जेव्हा सुशोभीकरण करण्यात आले, तेव्हा हौदाच्या मधोमध असणाऱ्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी षटकोनी आकारातील राजमुद्रा कोरण्यात आली. राजमुद्रेशेजारी चार दंडक ही कोरण्यात आले. मात्र, यामधील एक दंडक गेल्या अनेक वर्षांपासून गायब झाला आहे. त्यामुळे राजमुद्रेची शोभा कमी झाल्याचे दिसून येत आहे.पालिका प्रशासनाकडून गेल्या वर्षी कमानी हौदाला रंगरंगोटीचे काम करण्यात आले. याच्या सुरक्षेची देखील पुरेपूर काळजी घेऊन संपूर्ण हौद लोखंडी रेलिंगने बंदिस्त करण्यात आला. मात्र राजमुद्रेशेजारील दंडकाचा सर्वांनाच विसर पडलेला दिसून येत आहे. राजमुद्रेशेजारील एका दंडकाचे काय झाले? हे कोणालाच माहीत नाही. मात्र, याच्या दुरुस्तीकडेही कोणाचे लक्ष गेले नाही. यामुळे राजमुद्रेची शोभा वाढविण्यासाठी दंडक पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.कमानी हौदाचे सुशोभीकरण केल्यानंतर या परिसराचे सौंदर्य वाढले. हौदाच्या भिंतीवर असणाऱ्या राजमुद्रेचा दंडक नसल्याचे लक्षात आल्यानंतर पालिका प्रशासनाला तशा सूचना केल्या आहेत. दंडक लवकरात लवकर बसविण्याची व्यवस्था करण्यात येईल.- सुजाता राजेमहाडिक, नगरसेविकाबाह्य सुरक्षा रामभरोसेपालिकेच्या वतीने कमानी हौदाच्या सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र नागरिकांचे मुख्य आकर्षण असणारा येथील कारंजा नेहमीच बंद अवस्थेत असतो. लोखंडी रेलिंग बसविल्यामुळे या हौदाची अंतर्गत सुरक्षा जरी मजबुत झाली असली तरी बाह्य सुरक्षेचा प्रश्न मात्र जैसे थे आहे. याठिकाणी देखरेख करण्यासाठी कर्मचारी नसल्यामुळे भटक्या जनावरांची या ठिकाणी सतत वर्दळ असते. याबरोबरच रात्रीच्यावेळी मद्यपीं देखील याठिकाणी ठाण मांडून बसतात. याबाबत पालिकेने ठोस पावले उचलावित असे नागरिकांचे म्हणने आहे.