शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

राजे.. तुम्ही यायला हवं होतं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुंबई मराठा मोर्चाकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठ फिरविल्यानंतर त्यांच्या समर्थकांमधूनच वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत. ‘राजे.. तुम्ही यायलाच हवं होतं!’ अशा भाषेत अनेकांनी मतं व्यक्त केली असून ‘राजकीय नेत्यांना या मोर्चात संतप्त भावनांना सामोरं जावं लागणार, हे माहीत असल्यानंच आमच्या राजेंनी हा निर्णय ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मुंबई मराठा मोर्चाकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठ फिरविल्यानंतर त्यांच्या समर्थकांमधूनच वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत. ‘राजे.. तुम्ही यायलाच हवं होतं!’ अशा भाषेत अनेकांनी मतं व्यक्त केली असून ‘राजकीय नेत्यांना या मोर्चात संतप्त भावनांना सामोरं जावं लागणार, हे माहीत असल्यानंच आमच्या राजेंनी हा निर्णय घेतला,’ असंही समर्थन अनेकांनी केलं.नाशिक येथील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर साताºयाचे उदयनराजे अन् कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती या मोर्चाचं नेतृत्व करतील, अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली होती. उदयनराजे यांच्या वेगळ्या स्टाईलची महाराष्ट्रातील तरुणवर्गाला भलतीच क्रेझ असल्यानं बुधवारच्या मुंबई मराठा मोर्चात त्यांच्या एन्ट्रीकडं साºयांचंच लक्ष लागून राहिलं होतं.उदयनराजे मुंबईतील क्रांती मोर्चाला जाणारच, हे गृहीत धरून बंदोबस्तासाठी खास साताºयावरून पोलिस पथक पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी गेलं होतं. मात्र, ऐनवेळी त्यांनी या पथकाला परत पाठवून देऊन ते स्वत: मात्र पुण्यातच थांबल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, महाराष्ट्रातील बहुतांश नेते या मोर्चात सहभागी झालेले असतानाही केवळ उदयनराजे हेच मोर्चात न दिसल्यानं आपापल्या गावी परत निघालेल्या मोर्चेकºयांमध्ये हा विषय भलताच चर्चेचा ठरला होता.म्हणे मोदींनी केली होती विनंती !उदयनराजे यांचे खास समर्थक असलेल्या साताºयातील राजू गोडसे यांनी बुधवारी रात्री याबाबत एक निवेदनवजा पोस्ट फेसबुकवर टाकली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की, ‘मोर्चाच्या आदल्या रात्रीपर्यंत स्वत: महाराजांनी संयोजकांशी संवाद साधून चर्चा केली होती. मात्र, तरुणांचा उत्साह पाहता शांतता राखली जावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंना मोर्चात न जाण्याची विनंती केल्यामुळेच राजे यात सहभागी झाले नाहीत.’ही पोस्ट फिरू लागताच संमिश्र भावनांच्या प्रतिक्रिया धडाधड व्यक्त होऊ लागल्या. ‘पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांना धन्यवाद. त्यांना जनतेची काळजी आहे वाटतं,’ अशा शब्दात एका जाणकारानं खोचक मत व्यक्त केलं, तर त्यांना मानणाºया बहुतांश समर्थकांनी, ‘कारण काहीही असो... राजे, तुम्ही मोर्चात यायलाच हवं होतं,’ अशी आर्त साद दिल्याचंही सोशल मीडिया दिसलं.काहीजणांनी तर या पोस्टला चक्क ‘जोक’ असं म्हणत, आपली भावना व्यक्त केली. दरम्यान, राजे न येण्याच्या कारणाबाबत अनेक प्रतिक्रिया पडत असतानाच ही पोस्ट अकस्मातपणे गायबही झाली. उदयनराजेंचे खास समर्थक म्हणून ओळखल्या जाणाºया राजू गोडसे यांच्या पत्नी दीपाली गोडसे या उदयनराजे गटाकडून साताºयाच्या उपनगराध्यक्षा होत्या.