शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

सरकारी नोकरीतील प्रवेशाचे वय वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शासकीय नोकरभरती अनेक वर्षे रखडल्याने या सेवेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडून गेली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शासकीय नोकरभरती अनेक वर्षे रखडल्याने या सेवेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडून गेली आहे. त्यामुळे राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन शासकीय नोकरीत प्रवेशाचे वय तीन ते चार वर्षांनी वाढवावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

टीईटी, एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा शासनाने वेळोवेळी रद्द केल्याने त्या गेली तीन ते चार वर्षे झाल्या नसल्याने परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वयाच्या पात्रतेच्या अटीमध्ये चार वर्षांनी वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे.

राज्यातील विविध क्षेत्रांमधील भरती प्रक्रिया ही कोविड-१९ तसेच वेळोवेळी आलेल्या नैसर्गिक आपत्ती तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे सातत्याने वेळोवेळी रद्द करण्यात आल्याने राज्यातील सर्व समाज घटकातील सुशिक्षित तसेच उच्च शिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. त्यांच्यातील काही अपात्र झाल्याने, कायमस्वरूपी वंचित झाल्याने त्यांच्यावर कायम बेरोजगारीची वेळ आली आहे, याचा विचार शासनाने तातडीने करावा, अशी मागणी करण्यात येते.

तसेच विशेष करून शिक्षक भरतीत आणि अधिकारी स्तरावरील एमपीएससी, यूपीएससी व तत्सम स्पर्धा परीक्षा या गेली तीन ते चार वर्षे सतत वरील कारणाने रद्द किंवा पुढे ढकलल्याने सर्वच समाज घटकातील सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी या स्पर्धेपासून वंचित राहिल्याने त्यांना या स्पर्धा परीक्षेस बसण्यासाठी किंवा पात्र होण्यासाठी विविध घटकातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी वयोमर्यादेची अट घातलेली असल्याने अनेक विद्यार्थी आता या स्पर्धा परीक्षेपासून वंचित झाल्याने त्यांच्यावर फार मोठा अन्याय होऊ शकतो.

या स्पर्धा परीक्षेस बसण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना मोठमोठ्या शहरांमध्ये क्लाससाठी व राहण्यासाठी मोठा खर्च हा काहींना कर्जाचा डोंगर उभारून करावा लागत असल्याने फार मोठा आर्थिक फटका बसल्याने त्यांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे याचाही विचार व्हावा, अशी मागणी होत आहे.

या मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कारंडे, विद्वत सभा जिल्हाध्यक्ष आदिनाथ बिराजे, जिल्हा सचिव सुधाकर काकडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.