शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरीतील प्रवेशाचे वय वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शासकीय नोकरभरती अनेक वर्षे रखडल्याने या सेवेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडून गेली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शासकीय नोकरभरती अनेक वर्षे रखडल्याने या सेवेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडून गेली आहे. त्यामुळे राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन शासकीय नोकरीत प्रवेशाचे वय तीन ते चार वर्षांनी वाढवावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

टीईटी, एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा शासनाने वेळोवेळी रद्द केल्याने त्या गेली तीन ते चार वर्षे झाल्या नसल्याने परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना वयाच्या पात्रतेच्या अटीमध्ये चार वर्षांनी वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे.

राज्यातील विविध क्षेत्रांमधील भरती प्रक्रिया ही कोविड-१९ तसेच वेळोवेळी आलेल्या नैसर्गिक आपत्ती तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे सातत्याने वेळोवेळी रद्द करण्यात आल्याने राज्यातील सर्व समाज घटकातील सुशिक्षित तसेच उच्च शिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झालेला आहे. त्यांच्यातील काही अपात्र झाल्याने, कायमस्वरूपी वंचित झाल्याने त्यांच्यावर कायम बेरोजगारीची वेळ आली आहे, याचा विचार शासनाने तातडीने करावा, अशी मागणी करण्यात येते.

तसेच विशेष करून शिक्षक भरतीत आणि अधिकारी स्तरावरील एमपीएससी, यूपीएससी व तत्सम स्पर्धा परीक्षा या गेली तीन ते चार वर्षे सतत वरील कारणाने रद्द किंवा पुढे ढकलल्याने सर्वच समाज घटकातील सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थी या स्पर्धेपासून वंचित राहिल्याने त्यांना या स्पर्धा परीक्षेस बसण्यासाठी किंवा पात्र होण्यासाठी विविध घटकातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी वयोमर्यादेची अट घातलेली असल्याने अनेक विद्यार्थी आता या स्पर्धा परीक्षेपासून वंचित झाल्याने त्यांच्यावर फार मोठा अन्याय होऊ शकतो.

या स्पर्धा परीक्षेस बसण्यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना मोठमोठ्या शहरांमध्ये क्लाससाठी व राहण्यासाठी मोठा खर्च हा काहींना कर्जाचा डोंगर उभारून करावा लागत असल्याने फार मोठा आर्थिक फटका बसल्याने त्यांचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे याचाही विचार व्हावा, अशी मागणी होत आहे.

या मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कारंडे, विद्वत सभा जिल्हाध्यक्ष आदिनाथ बिराजे, जिल्हा सचिव सुधाकर काकडे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.