शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

पावसाच्या दडीने बळीराजा हबकला!

By admin | Updated: September 6, 2015 20:42 IST

दुष्काळ जाहीर करा : विहिरींनी गाठला तळ; पिकेही करपली, पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची तीव्र टंचाई

मसूर : अर्धा पावसाळा संपला तरी पाऊस गायब झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी अपेक्षित वाढ नसलेली खरीप पिके उन्हाच्या तीव्रतेने कोमेजून चालली आहेत. संभाव्य नुकसानाच्या भीतीने बळीराजा पुरता हबकला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावत चालल्याने शिवारातील विहिरींसह पिण्याच्या पाण्याच्या विहिरीसुद्धा तळ गाठू लागल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईचे संभाव्य चित्र उभे आहे. राज्य शासनाने याची दखल घेऊन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. जून महिन्याच्या पूर्वसंध्येला अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्या ओलीचा फायदा घेत शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. पावसाने पुन्हा उघडीप दिली. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी टोकणीसाठी सऱ्या टाकल्या; मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊसच झाला नाही. त्यामुळे ज्यांनी टोकणी केली, ती पिके मातीमोल झाली. तर ३० टक्के टोकणी झालीच नाही. जूनचा दुसरा टप्पा, जुलैमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडल्या. काही प्रमाणात ओल निर्माण झाली, त्यानंतर केव्हा तरी सरी पडू लागल्या. त्यामुळे पिकांना जणू सलाईनसारखे पाणी मिळाले; मात्र अपेक्षित जोरदार पाऊस अद्याप झालाच नाही. काहीशा ओलीवर तग धरून असलेली व पावसाअभावी अपेक्षित वाढ नसलेली पिके मात्र उन्हाच्या तीव्रतेने कोमेजून जाण्याच्या मार्गावर आहेत. सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तरीही पावसाची चिन्हे नाहीत. अनेक नक्षत्र कोरडीच गेली आहेत. तालुक्यात ७० टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी ऐन पावसाळ्यात उन्हाची तीव्रत्ता दिवसेंदिवस वाढू लागल्याने पिके कोमेजू लागल्याचे चित्र पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.मोठा पाऊसच झाला नसल्याने भूगर्भातील पाणीसाठा नष्ट होत चालला आहे. या पावसाळयात एकदाही नदी, ओढे, नाले, पाट भरून वाहिले नाहीत. ओढे, ओघळीही कोरडे पडत आहेत. शिवारातील विहिरींची पाण्याच्या पातळींनेही आता तळ गाठलेला दिसून येऊ लागला आहे. काहींच्या मोटारी दोन-तीन तासच चालतात. पुन्हा पाणी साठ्याअभावी बंद पडत आहेत. पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचीसुध्दा पातळी घटू लागल्याने त्याचा पिण्याच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे. तालुक्यात बहुतांशी गावात सिमेंट बंधारे बांधले आहेत. (वार्ताहर) मेघराजा कधी बरसणार...सध्या भूगर्भातील उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. भूगर्भातील पाणीसाठाही आता गंभीर रूप धारण करू लागल्याने पाण्यासाठी आणीबाणीची वेळ येवून ठेपली आहे. या सर्व वस्तुस्थितीने शेतकरी पुरता हबकला आहे. मेघराजा कधी बरसणार? यासाठी सर्वांचे डोळे आभाळाकडे लागून राहिले आहेत.