शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

पावसाच्या दडीने बळीराजा हबकला!

By admin | Updated: September 6, 2015 20:42 IST

दुष्काळ जाहीर करा : विहिरींनी गाठला तळ; पिकेही करपली, पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची तीव्र टंचाई

मसूर : अर्धा पावसाळा संपला तरी पाऊस गायब झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी अपेक्षित वाढ नसलेली खरीप पिके उन्हाच्या तीव्रतेने कोमेजून चालली आहेत. संभाव्य नुकसानाच्या भीतीने बळीराजा पुरता हबकला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावत चालल्याने शिवारातील विहिरींसह पिण्याच्या पाण्याच्या विहिरीसुद्धा तळ गाठू लागल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईचे संभाव्य चित्र उभे आहे. राज्य शासनाने याची दखल घेऊन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. जून महिन्याच्या पूर्वसंध्येला अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्या ओलीचा फायदा घेत शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. पावसाने पुन्हा उघडीप दिली. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी टोकणीसाठी सऱ्या टाकल्या; मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊसच झाला नाही. त्यामुळे ज्यांनी टोकणी केली, ती पिके मातीमोल झाली. तर ३० टक्के टोकणी झालीच नाही. जूनचा दुसरा टप्पा, जुलैमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडल्या. काही प्रमाणात ओल निर्माण झाली, त्यानंतर केव्हा तरी सरी पडू लागल्या. त्यामुळे पिकांना जणू सलाईनसारखे पाणी मिळाले; मात्र अपेक्षित जोरदार पाऊस अद्याप झालाच नाही. काहीशा ओलीवर तग धरून असलेली व पावसाअभावी अपेक्षित वाढ नसलेली पिके मात्र उन्हाच्या तीव्रतेने कोमेजून जाण्याच्या मार्गावर आहेत. सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तरीही पावसाची चिन्हे नाहीत. अनेक नक्षत्र कोरडीच गेली आहेत. तालुक्यात ७० टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी ऐन पावसाळ्यात उन्हाची तीव्रत्ता दिवसेंदिवस वाढू लागल्याने पिके कोमेजू लागल्याचे चित्र पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.मोठा पाऊसच झाला नसल्याने भूगर्भातील पाणीसाठा नष्ट होत चालला आहे. या पावसाळयात एकदाही नदी, ओढे, नाले, पाट भरून वाहिले नाहीत. ओढे, ओघळीही कोरडे पडत आहेत. शिवारातील विहिरींची पाण्याच्या पातळींनेही आता तळ गाठलेला दिसून येऊ लागला आहे. काहींच्या मोटारी दोन-तीन तासच चालतात. पुन्हा पाणी साठ्याअभावी बंद पडत आहेत. पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचीसुध्दा पातळी घटू लागल्याने त्याचा पिण्याच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे. तालुक्यात बहुतांशी गावात सिमेंट बंधारे बांधले आहेत. (वार्ताहर) मेघराजा कधी बरसणार...सध्या भूगर्भातील उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. भूगर्भातील पाणीसाठाही आता गंभीर रूप धारण करू लागल्याने पाण्यासाठी आणीबाणीची वेळ येवून ठेपली आहे. या सर्व वस्तुस्थितीने शेतकरी पुरता हबकला आहे. मेघराजा कधी बरसणार? यासाठी सर्वांचे डोळे आभाळाकडे लागून राहिले आहेत.