शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

पावसाच्या दडीने बळीराजा हबकला!

By admin | Updated: September 6, 2015 20:42 IST

दुष्काळ जाहीर करा : विहिरींनी गाठला तळ; पिकेही करपली, पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याची तीव्र टंचाई

मसूर : अर्धा पावसाळा संपला तरी पाऊस गायब झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी अपेक्षित वाढ नसलेली खरीप पिके उन्हाच्या तीव्रतेने कोमेजून चालली आहेत. संभाव्य नुकसानाच्या भीतीने बळीराजा पुरता हबकला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावत चालल्याने शिवारातील विहिरींसह पिण्याच्या पाण्याच्या विहिरीसुद्धा तळ गाठू लागल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईचे संभाव्य चित्र उभे आहे. राज्य शासनाने याची दखल घेऊन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. जून महिन्याच्या पूर्वसंध्येला अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्या ओलीचा फायदा घेत शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. पावसाने पुन्हा उघडीप दिली. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी टोकणीसाठी सऱ्या टाकल्या; मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊसच झाला नाही. त्यामुळे ज्यांनी टोकणी केली, ती पिके मातीमोल झाली. तर ३० टक्के टोकणी झालीच नाही. जूनचा दुसरा टप्पा, जुलैमध्ये पावसाच्या हलक्या सरी पडल्या. काही प्रमाणात ओल निर्माण झाली, त्यानंतर केव्हा तरी सरी पडू लागल्या. त्यामुळे पिकांना जणू सलाईनसारखे पाणी मिळाले; मात्र अपेक्षित जोरदार पाऊस अद्याप झालाच नाही. काहीशा ओलीवर तग धरून असलेली व पावसाअभावी अपेक्षित वाढ नसलेली पिके मात्र उन्हाच्या तीव्रतेने कोमेजून जाण्याच्या मार्गावर आहेत. सध्या सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. तरीही पावसाची चिन्हे नाहीत. अनेक नक्षत्र कोरडीच गेली आहेत. तालुक्यात ७० टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी ऐन पावसाळ्यात उन्हाची तीव्रत्ता दिवसेंदिवस वाढू लागल्याने पिके कोमेजू लागल्याचे चित्र पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.मोठा पाऊसच झाला नसल्याने भूगर्भातील पाणीसाठा नष्ट होत चालला आहे. या पावसाळयात एकदाही नदी, ओढे, नाले, पाट भरून वाहिले नाहीत. ओढे, ओघळीही कोरडे पडत आहेत. शिवारातील विहिरींची पाण्याच्या पातळींनेही आता तळ गाठलेला दिसून येऊ लागला आहे. काहींच्या मोटारी दोन-तीन तासच चालतात. पुन्हा पाणी साठ्याअभावी बंद पडत आहेत. पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचीसुध्दा पातळी घटू लागल्याने त्याचा पिण्याच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे. तालुक्यात बहुतांशी गावात सिमेंट बंधारे बांधले आहेत. (वार्ताहर) मेघराजा कधी बरसणार...सध्या भूगर्भातील उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. भूगर्भातील पाणीसाठाही आता गंभीर रूप धारण करू लागल्याने पाण्यासाठी आणीबाणीची वेळ येवून ठेपली आहे. या सर्व वस्तुस्थितीने शेतकरी पुरता हबकला आहे. मेघराजा कधी बरसणार? यासाठी सर्वांचे डोळे आभाळाकडे लागून राहिले आहेत.