शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या दु:खापेक्षाही पावसाचं भय मोठ्ठं !

By admin | Updated: June 6, 2016 00:44 IST

सातारकरांच्या मदतीला पोलिस अधिकारी धावले...

सातारा : रविवारचा दिवस सातारा जिल्ह्यासाठी घातवार ठरला. सकाळी उठल्या-उठल्या सातारकरांना पनवेलच्या अपघाताची बातमी समजली, तेव्हा एकच पळापळ सुरू झाली. ‘सतरा ठार’मध्ये आपलं कोण आहे का, याचा शोध घेण्यासाठी प्रत्येकजण एकमेकांना फोन करु लागला. दिवसभरात एकेकाची माहिती मिळत गेली. रात्री नऊ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मृत्युमुखींपैकी तब्बल १४ जण जिल्ह्यातील असल्याचं स्पष्ट झालं. एकाच गावातील चौघेजण मरण पावलेल्या सोनवडीत मात्र मृतदेह येण्यापूर्वी अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली होती, कारण संध्याकाळचा पाऊस अंत्यविधीसाठी अडथळा तयार करु शकत होता. म्हणूनच की काय... परळी खोऱ्यात मृत्यूच्या दु:खापेक्षाही पावसाचं भय मोठं ठरल होतं.१५ दिवसांपूर्वी नातीचं बारसं झालेलं...अपघातात मृत्युमुखी पडलेली तीन महिन्यांची अनन्या हिचे बारसे १५ दिवसांपूर्वीच मोठ्या थाटात गावामध्ये झाले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर मंडळी पुन्हा मुंबईला निघाली होती. मात्र, पहाटेच्या भीषण अपघातात तिचाही दुर्देवी मृत्यू झाल्याचे कळताच अवघा गाव हळहळला..वडील मात्र अनभिज्ञच..मूळचे सोनवडी गावातच राहणारे प्राध्यापक अविनाश हणमंत कारंडे (वय ३५) हे सुद्धा अपघातात मृत्युमुखी पडले. ते मुंबइला ‘एमडी’ कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. ते दोन दिवस सुटी असल्याने गावी आले होते. त्यांच्या वडिलांना पॅरालिसीस असल्याने गावकऱ्यांनी त्यांच्यापर्यंत बातमीही पोहोचविली नाही. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.शेवटच्या ट्रीपनंतर सोडणार होते नोकरीइकबाल शेख हे गेल्या तीस वर्षांपासून लक्झरी बसवर चालक म्हणून काम करत होते. काही महिन्यांपूर्वीच मालकाने नवीन लक्झरी बस खरेदी केल्याने ते कामावर जात होते. कायमस्वरूपी नोकरी सोडण्याची त्यांची इच्छा होती. तसं घरातल्यांना त्यांनी बोलूनही दाखविले होते. ‘मुंबईला शेवटची ट्रीप मारल्यानंतर मी नोकरी सोडतो,’असेही ते बोलले होते. मात्र नोकरी सोडण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातलासातारकरांच्या मदतीला पोलिस अधिकारी धावले...विश्वास पांढरे-पाटील यांची घटनास्थळी धावपळसुटी संपवून ते निघाले होते गावीसंदीप शिवणकर हे मुंबई येथे माथाडी कामगार म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी ते कुटुंबीयांसमवेत गावी आले होते. सुटी संपल्याने ते मुंबईला निघाले होते. त्यांच्या निधनाने प्रभुचीवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.श्रद्धा आली होती सुटीला महाबळेश्वरलाश्रद्धा काळे ही मूळची महाबळेश्वरची. ती मुंबई येथे महाविद्यालयात शिकत होती. कॉलेजला सुटी लागल्याने ती महाबळेश्वरला आली होती. सुटी संपल्यानंतर तीही सातारमधील नातेवाइकांसोबत मुंबईला निघाली होती. मात्र मुंबईला पोहोचण्यापूर्वीच काळाने तिच्यावर घाला घातला. तिच्या मृत्यूची बातमी महाबळेश्वरमध्ये पसरताच अनेकांनी तिच्या घराकडे धाव घेतली.साताऱ्यातील त्यांचा शेवटचा कार्यक्रम ! पद्मा बलदवा यांचे माहेर सातारा आहे. दोन दिवसांपूर्वी त्या साताऱ्यात आल्या होत्या. शहरातील एका शाळेमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम संपल्यानंतर त्या मुंबईला निघाल्या होत्या. मात्र काळाने त्यांच्यावरही घाला घातला.अख्खा दिवस मृतदेहांची वाट पाहण्यात.. परळी खोऱ्यातील सोनवडी येथील शिवाजी कदम यांच्या घरातील सर्वच पुरूष मिलिटरीत. शिवाजीही निवृत्तीनंतर मुंबईत नोकरीला लागले. त्यांचे धाकटे बंधूसुद्धा मिलिटरीनंतर सध्या गावात असतात. शिवाजी आपली पत्न, सून अन् नातीला घेऊन सोनवडीत उन्हाळी सुटी व गावची यात्रा यानिमित्त आले होते. या सर्वांनी एक महिन्याची सुटी गावातच मजेत घालवली. शनिवारी (दि. ४ ) रोजी रात्री मुंबईला जायचे त्यांनी ठरविले. दुपारपासूनच बॅग भरून तयारी केली. रात्री ८ च्या दरम्यान घरातल्यांसोबत एकत्र जेवण केले. त्यानंतर ते, त्यांची पत्नी, सून व नात हे चौघेजण रात्री सातारा बसस्थानक परिसरातून खासगी बसने मुंबईला जायला निघाले. पहाटे भाऊ तानाजी कदम यांना ही घटना समजताच गावभर शोककळा पसरली. संपूर्ण गाव दिवसभर मृतदेहांची वाट पाहत बसले होते.