शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूच्या दु:खापेक्षाही पावसाचं भय मोठ्ठं !

By admin | Updated: June 6, 2016 00:44 IST

सातारकरांच्या मदतीला पोलिस अधिकारी धावले...

सातारा : रविवारचा दिवस सातारा जिल्ह्यासाठी घातवार ठरला. सकाळी उठल्या-उठल्या सातारकरांना पनवेलच्या अपघाताची बातमी समजली, तेव्हा एकच पळापळ सुरू झाली. ‘सतरा ठार’मध्ये आपलं कोण आहे का, याचा शोध घेण्यासाठी प्रत्येकजण एकमेकांना फोन करु लागला. दिवसभरात एकेकाची माहिती मिळत गेली. रात्री नऊ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार मृत्युमुखींपैकी तब्बल १४ जण जिल्ह्यातील असल्याचं स्पष्ट झालं. एकाच गावातील चौघेजण मरण पावलेल्या सोनवडीत मात्र मृतदेह येण्यापूर्वी अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली होती, कारण संध्याकाळचा पाऊस अंत्यविधीसाठी अडथळा तयार करु शकत होता. म्हणूनच की काय... परळी खोऱ्यात मृत्यूच्या दु:खापेक्षाही पावसाचं भय मोठं ठरल होतं.१५ दिवसांपूर्वी नातीचं बारसं झालेलं...अपघातात मृत्युमुखी पडलेली तीन महिन्यांची अनन्या हिचे बारसे १५ दिवसांपूर्वीच मोठ्या थाटात गावामध्ये झाले होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर मंडळी पुन्हा मुंबईला निघाली होती. मात्र, पहाटेच्या भीषण अपघातात तिचाही दुर्देवी मृत्यू झाल्याचे कळताच अवघा गाव हळहळला..वडील मात्र अनभिज्ञच..मूळचे सोनवडी गावातच राहणारे प्राध्यापक अविनाश हणमंत कारंडे (वय ३५) हे सुद्धा अपघातात मृत्युमुखी पडले. ते मुंबइला ‘एमडी’ कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. ते दोन दिवस सुटी असल्याने गावी आले होते. त्यांच्या वडिलांना पॅरालिसीस असल्याने गावकऱ्यांनी त्यांच्यापर्यंत बातमीही पोहोचविली नाही. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.शेवटच्या ट्रीपनंतर सोडणार होते नोकरीइकबाल शेख हे गेल्या तीस वर्षांपासून लक्झरी बसवर चालक म्हणून काम करत होते. काही महिन्यांपूर्वीच मालकाने नवीन लक्झरी बस खरेदी केल्याने ते कामावर जात होते. कायमस्वरूपी नोकरी सोडण्याची त्यांची इच्छा होती. तसं घरातल्यांना त्यांनी बोलूनही दाखविले होते. ‘मुंबईला शेवटची ट्रीप मारल्यानंतर मी नोकरी सोडतो,’असेही ते बोलले होते. मात्र नोकरी सोडण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातलासातारकरांच्या मदतीला पोलिस अधिकारी धावले...विश्वास पांढरे-पाटील यांची घटनास्थळी धावपळसुटी संपवून ते निघाले होते गावीसंदीप शिवणकर हे मुंबई येथे माथाडी कामगार म्हणून काम करत होते. काही दिवसांपूर्वी ते कुटुंबीयांसमवेत गावी आले होते. सुटी संपल्याने ते मुंबईला निघाले होते. त्यांच्या निधनाने प्रभुचीवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.श्रद्धा आली होती सुटीला महाबळेश्वरलाश्रद्धा काळे ही मूळची महाबळेश्वरची. ती मुंबई येथे महाविद्यालयात शिकत होती. कॉलेजला सुटी लागल्याने ती महाबळेश्वरला आली होती. सुटी संपल्यानंतर तीही सातारमधील नातेवाइकांसोबत मुंबईला निघाली होती. मात्र मुंबईला पोहोचण्यापूर्वीच काळाने तिच्यावर घाला घातला. तिच्या मृत्यूची बातमी महाबळेश्वरमध्ये पसरताच अनेकांनी तिच्या घराकडे धाव घेतली.साताऱ्यातील त्यांचा शेवटचा कार्यक्रम ! पद्मा बलदवा यांचे माहेर सातारा आहे. दोन दिवसांपूर्वी त्या साताऱ्यात आल्या होत्या. शहरातील एका शाळेमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम संपल्यानंतर त्या मुंबईला निघाल्या होत्या. मात्र काळाने त्यांच्यावरही घाला घातला.अख्खा दिवस मृतदेहांची वाट पाहण्यात.. परळी खोऱ्यातील सोनवडी येथील शिवाजी कदम यांच्या घरातील सर्वच पुरूष मिलिटरीत. शिवाजीही निवृत्तीनंतर मुंबईत नोकरीला लागले. त्यांचे धाकटे बंधूसुद्धा मिलिटरीनंतर सध्या गावात असतात. शिवाजी आपली पत्न, सून अन् नातीला घेऊन सोनवडीत उन्हाळी सुटी व गावची यात्रा यानिमित्त आले होते. या सर्वांनी एक महिन्याची सुटी गावातच मजेत घालवली. शनिवारी (दि. ४ ) रोजी रात्री मुंबईला जायचे त्यांनी ठरविले. दुपारपासूनच बॅग भरून तयारी केली. रात्री ८ च्या दरम्यान घरातल्यांसोबत एकत्र जेवण केले. त्यानंतर ते, त्यांची पत्नी, सून व नात हे चौघेजण रात्री सातारा बसस्थानक परिसरातून खासगी बसने मुंबईला जायला निघाले. पहाटे भाऊ तानाजी कदम यांना ही घटना समजताच गावभर शोककळा पसरली. संपूर्ण गाव दिवसभर मृतदेहांची वाट पाहत बसले होते.