शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

कोयना वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 13:29 IST

सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात सतत तीन आठवड्यांहून अधिक काळ कोसळलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. सध्या कोयना धरण परिसर वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. कोयना धरणात ८५.९७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

ठळक मुद्देकोयना वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाची विश्रांतीकोयना धरणात ८५.९७ टीएमसी पाणीसाठा

सातारा : जिल्ह्यातील पश्चिम भागात सतत तीन आठवड्यांहून अधिक काळ कोसळलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. सध्या कोयना धरण परिसर वगळता इतर धरणक्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. कोयना धरणात ८५.९७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सलग २५ दिवसांहून अधिक काळ पाऊस पडत होता. यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. तर कोयना, कण्हेर, तारळी, उरमोडी, धोम, बलकवडी आदी धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग सुरू करण्यात आला.

सध्या पाऊस थांबला असल्याने कोयना धरणातील पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरवाजातून पाणी सोडणे यापूर्वीच बंद करण्यात आले आहे.मंगळवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे फक्त ९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात ५८९९ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. बलकवडी धरणात २३६, कण्हेर ३८९, उरमोडी ६४५, तारळी धरणात ८२० क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. तर कण्हेरमधून ५००, बलकवडी ३१५, उरमोडी ४०० आणि तारळी धरणातून ८२० क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम ००  (४८२)कोयना ०९ (३४६१)बलकवडी ०० (१८१२)कण्हेर ०० (७७५)उरमोडी ०० (८७६​​​​​​​)तारळी ०० (१६००​​​​​​​​​​​​​​)

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Satara areaसातारा परिसर