शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

बहरात आलेल्या खरिपाकडे पावसाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:44 IST

कातरखटाव : खटाव तालुक्यातील पूर्व भागात पावसाने ऐनवेळी पाठ फिरवल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. दिवसभर ऊन आणि पहाटेच धुकं ...

कातरखटाव : खटाव तालुक्यातील पूर्व भागात पावसाने ऐनवेळी पाठ फिरवल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. दिवसभर ऊन आणि पहाटेच धुकं या खेळामुळे बहरात आलेली शिवारातील पिकं कोमेजू लागली आहेत. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला असून, बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

सध्या कातरखटाव परिसरात खरीप हंगामातील बाजरी, मूग, मटकी, घेवडा, सोयाबीन, उडीद, वाटाणा ही पिके हातातोंडाला आली असली तरी निसर्गाच्यापुढे शेतकऱ्यांनी हात टेकले आहेत. दिवसभर कडाक्याचं ऊन त्यात अधूनमधून पडणारं धुकं यामुळे मूग, उडीद, घेवडा या पिकांनी माना टाकल्या आहेत. काही दिवसांपासून हवामानात बद्दल झाल्याने या भागात लागोपाठ तीन ते चारवेळा धुकं पडल्यामुळे पिकांच्या शेंगा भरण्याऐवजी जळून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.

ट्रॅक्टर नांगरणी, कोळपणी, भांगलणी, महागलेली बी-बियाणे पेरणी, खते असा मिळून एकरी बारा ते तेरा हजार रुपये खर्च येत असून, या करप्या रोगामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागणार आहे. काही ठिकाणी कडधान्यावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकांवर धुकं पडल्यानंतर तो रोग धुवून जाणे गरजेचं आहे. अशा वातावरणात पावसाचा खंड पडल्याने पिकांच्या शेंगा भरण्याऐवजी आकुंचन पावणे, पानं पिवळंसर पडणे, हळूहळू जळून जाणे असे प्रकार या करप्या रोगामुळे पिकांवर दिसून येत आहेत.

पावसाच्या भरवशावर अवलंबून असणाऱ्या या खरीप हंगामातील पिकं चांगलीच बहरात आलेली दिसत आहेत. क्विंटलमागे दरडोई पाच ते सहा हजार रुपये उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता मात्र दीड ते दोन हजारांवर समाधान मानावं लागणार आहे.

कोट :

शेतकरी सावरतोय तोच संकट

गेली दीड ते दोन वर्षापासून शेतकऱ्यांना सतत आर्थिक संकटाचा फटका बसत आहे. अशातच नेसर्गिक आपत्तीमुळे पिकांचा नाश होत असल्याने शेतकरी कंगाल होत चालला आहे. शेतीची मशागत करण्यापासून पेरणीपर्यंत एकरी बारा ते तेरा हजार रुपये खर्च आला असून, निसर्गाच्या लपंडावामुळे आमचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे प्रशासनाने पाहणी करून नुकसानभरपाई दयावी.

- रामभाऊ बागल, शेतकरी, कातरखटाव

फोटो : १६ कातरखटाव

कातरखटाव परिसरातील हातातोंडाला आलेली घेवडा, मूग ही पिके करपा रोग पडल्याने कोमेजू लागली आहेत.