शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम भागात पाऊस वाढला; नवजाला ६१ मिलिमीटरची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 15:56 IST

पावसाचा जोर आणखी वाढल्यास कोयनेतून पुन्हा पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालला असून, गुरुवारी सकाळपर्यंत कोयनेला ५०, तर नवजा येथे ६१ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे कोयनेत पाण्याची आवक होत असून, धरणात १०३.३० टीएमसी पाणीसाठा झाला होता. पावसाचा जोर आणखी वाढल्यास कोयनेतून पुन्हा पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. कधी दमदार पाऊस झाला, तर काहीवेळा तुरळक स्वरुपात हजेरी लावली. तरीही या पावसामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्वेकडील दुष्काळी भागातही पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले. बाजरी, मूग, मटकी, मका आदी पिके चांगली आली आहेत. ही पिके काढणीच्या टप्प्यात आली आहेत. तसेच काही भागात काढणी आणि मोडणीही सुरू झाली आहे.

पश्चिमेकडेही पावसाची चांगली बरसात झाली. कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली आणि तापोळा भागात सतत १५ दिवस पाऊस होता. त्यानंतर काही दिवस तुरळक हजेरी लावली. पण, दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस वाढू लागला आहे. यामुळे कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी अशा प्रमुख धरणांत पाणीसाठा वाढत चालला आहे. सर्व प्रमुख धरणे भरल्यातच जमा आहेत.

महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोयना धरणातही पाण्याची आवक वाढत गेली. त्यामुळे १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात १०३ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. परिणामी मागील आठवड्यापूर्वी धरणाच्या पायथा वीजगृह आणि सर्व सहा दरवाजांतून विसर्ग करावा लागला. त्यावेळी ५० हजार क्युसेक वेगाने पाणी कोयना नदीपात्रात जात होते. त्यानंतर पाऊस कमी झाल्यानंतर दरवाजे व पायथा वीजगृहातील विसर्ग बंद करण्यात आला. पावसाचा जोर वाढल्यास आणखी पाणी सोडावे लागणार आहे.

पूर्व भागात पाऊस कमी...

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत आहे. या पावसाचा जोर वाढत चालला आहे. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ५० मिलिमीटर पाऊस पडला, तर जूनपासून आतापर्यंत ४,२७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला ६१ आणि यावर्षी आतापर्यंत ५,६०८, तर महाबळेश्वरला ४० आणि जूनपासून ५,६७८ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पूर्व भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. आता परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे.

तीन धरणांतून विसर्ग...

मागील काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणात पाणी येत आहे. परिणामी धरण पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात आला. त्यातच आताही पाऊस होत आहे. यामुळे सद्यस्थितीत तीन धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. यामध्ये धोममधून ३७५ क्युसेक, कण्हेर ३२४ आणि बलकवडी धरणातून ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना, तारळी, उरमोडी धरणातून पाणी सोडणे बंद आहे. 

टॅग्स :Rainपाऊस