शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पाऊस लांबला... तलाव आटला !

By admin | Updated: June 20, 2017 16:09 IST

कासचा साठा पाच फुटांवर : पावसाळ्यात पाणीटंचाईचे सावट

आॅनलाईन लोकमतपेट्री (सातारा ) , दि. २0 : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत आहे. अजूनही मान्सून दाखल होण्याचे चिन्हे दिसत नसल्याने पाणीटंचाईची समस्या गडद होऊ लागली आहे. सद्यस्थितीला तलावात केवळ पाच फुट सहा इंच पाणीसाठा शिल्लक आहे. तलावात चार ते साडेचार फुटापर्यंत पाणीसाठा शिल्लक राहिल्यास तलावावर आणखी दोन इंजिन बसवून पाणी उपसून पाटात सोडावे लागणार आहे. कास तलावात किनाऱ्यालगत २५ फुटांपर्यंत पाणीसाठा होतो. गतवर्षी ३ जुलैला तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहत होते. पावसाळ्याला सुरूवात होऊन पावसाचे मृग नक्षत्र संपत आले तरी देखील यंदा मान्सून दाखल होण्याचे संकेत अजुनही दिसत नसल्याने आजमितीला तलावातील पाणी पातळी साडेपाच फुटांवर आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत एका फुटाने पाणीसाठा कमी आहे.आत्तापर्यंत सातारा शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दर दिवसाला एक इंच पाणी पातळी कमी होत होती. परंतु तलावातील पाण्याचे पात्र कमी कमी होत चालल्याने दर दिवशी दीड इंचाने पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. हा पाणीसाठा पाऊस सुरू होईपर्यंत टिकून राहावा यासाठी तलावातून मुरून वाया जाणारे पाणी रात्रंदिवस दोन इंजिनच्या साह्याने उपसा करून पाटात सोडले जात आहे.मागील महिन्यात दोन वेळा मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने तसेच गेल्या दोन दिवसांपासून कास परिसरात तुरळक पाऊस झाल्याने जमिनीत ओलावा निर्माण झाला होता. यामूळे मान्सूनचे लवकर आगमन होण्याची चिन्हे दिसत होती. परंतू सध्या मान्सूनचा जोर दिसत नसल्याने पाणी टंचाईचे सावट निर्माण होणार आहे.सध्या तलावात पाच फुट सहा इंच पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याची टंचाई भासू नये यासाठी नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे. पाऊस वेळेवर न आल्यास सातारकरांना पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागणार आहे- जयराम किर्दत, पाटकरी कास तलाव