शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्याशी भांडण? पंचवीस किलोमीटर पळा!

By admin | Updated: December 10, 2014 23:51 IST

आर्थिक वाद वाढले : शिरवळ परिसरात चार पोलीस चौक्यांची गरज

सुनीता नलवडे - लोहेम -गाव म्हटलं की भांडणतंटा आलाच अन् शेजार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पण अशा शेजाऱ्याशी असणाऱ्या तंट्याचं रुपांतर मोठ्या भांडणात झालं तर पंचवीस किलोमीटरवर असणाऱ्या पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन पळावं लागतं. ही स्थिती आहे खंडाळा तालुक्यातील वाठार कॉलनी, खेड मोर्वे, विंग आणि लोहोम या गावांची.खंडाळा तालुका चारही बाजूंनी विकसित होत असताना तालुक्यातील छोटी-मोठी गावे मात्र भौगोलिक दृष्ट्या मागे पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण खेड्यापाड्यात अजूनही पुरेशा सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे नागरिकांना किरकोळ वादाची तक्रार द्यायची असेल तर खंडाळा, शिरवळ, लोणंद या ठिकाणी जावे लागते. वाठार कॉलनी, खेड-मोर्वे, लोहोम, विंग या गावांमध्ये इतर सुविधा देता येत नसतील तरी प्रशासनाने किमान येथे पोलीस चौक्या तरी द्याव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे.तालुक्यात खंडाळा आणि लोणंद याठिकाणी पोलीस ठाणे आहे. दोन्ही ठिकाणी सुमारे दीडशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आहेत. त्यामुळे तालुक्यात तिसरे पोलीस ठाणे सुरू करण्याऐवजी ज्याठिकाणी गरज आहे, अशा दुर्गम भागात पोलीस चौक्या उभारणे गरजेचे आहे. असे झाल्यास वाढत्या गुन्हेगारीला आळा बसून डोंगरालगतच्या भागातील जनतेची सोय होणार आहे. जागेवरून, शेतीच्या हद्दीवरून भांडणतंटा होत असतो. अशावेळी तक्रार द्यायला पंचवीस ते तीस किलोमीटरची धावाधाव करावी लागते. प्रशासनाने याचा विचार करून पोलीस चौक्या उभारण्याची मागणी होत आहे.कर्मचाऱ्यांचे विभाजन करावेसध्या कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे तसेच नव्याने होऊ घातलेल्या तिसऱ्या पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचे विभाजन केल्यास या गावांमध्ये पोलीस चौक्या होऊ शकतात. खंडाळा तालुका डोंगरदऱ्यांच्या कडेने वसला आहे. वाड्या वस्त्यांवर लोक राहत आहेत. त्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने विचार करावा.