शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाच्या गुणवत्तेची लक्तरं बारदानात!

By admin | Updated: April 29, 2016 00:21 IST

सहापदरीकरणाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह : कामातील ‘चुकांवर पांघरुण’ घालण्याचा महामार्ग प्राधिकरणाचा केविलवाणा प्रयत्न

राहुल तांबोळी -- भुर्इंजगरज नसताना सुरु असलेले महामागाचे सहापदरीकरण. अधिकाऱ्यांची मनमानी. कामातील ठासळलेली गुणवत्ता. नियोजनाचा अभाव अन् वाढते अपघात... यामुळे अगोदरच नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. त्यातच बुधवारी भुर्इंज येथे उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला त्यामुळे पुन्हा एकदा महामार्ग प्राधिकरणाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उड्डाणपूल उभारणीत घडलेल्या या अक्षम्य चुकीवर पांघरुण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत महामार्ग प्राधिकरणाने कोसळलेला पूल चक्क बारदानात गुंडाळून ठेवला.बुधवारी (दि.२७) रात्री आठ वाजता कामगार जेवायला गेले असताना उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला. त्यामुळे जीवितहानी टळली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या घटनेचे गांभीर्य ओळखून गुरुवारी सकाळी लवकर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनस्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेप्रकरणी प्रकल्प व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डॉ. देशमुख यांनी यावेळी सांगितले. अधिकारी म्हणतात, ‘काहीच कल्पना नाही!’भुर्इंज येथील दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बिजेंद्र नावाचे अधिकारी यांनी आपणास काहीच कल्पना नाही, असे सांगून त्यांनी जबाबदारी झटकली. तसेच इतर जबाबदार अधिकारी, सुपरवायझर यांनीही घटनास्थळी थांबण्याचे औदार्य दाखवले नाही. गावातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी या घटनेबाबत संवाद साधला नाही. या दुर्घटनेचे कारण स्पष्ट केले नाही. याबाबतही अनेकांनी संताप व्यक्त केला. यावेळी गजानन भोसले, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश शिंदे, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर भोसले-पाटील, भाऊसाहेब जाधवराव, मधुकर भोसले, किरण शिंदे, नारायण नलवडे, प्रतापराव जाधवराव, भाऊसाहेब शिंदे, शेषा भोसले उपस्थित होते. संयुक्त बैठक बोलावणारया दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स कंपनी, प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ व दर्जा देखरेख समिती यांची संयुक्त बैठक बोलावण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे यावेळी डॉ. अभिनव देशमुख यांनी स्पष्ट केले. महामार्ग सहापदीरकणाचे काम वेळेत पूर्ण होण्याबरोबरच उत्तम दर्जाचे आणि अपघाताविना होणे आवश्यक आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिस विभागाची जी जबाबदारी असेल, ती बजावली जाईल, असा शब्द त्यांनी दिला.