शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

महामार्गाच्या गुणवत्तेची लक्तरं बारदानात!

By admin | Updated: April 29, 2016 00:21 IST

सहापदरीकरणाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह : कामातील ‘चुकांवर पांघरुण’ घालण्याचा महामार्ग प्राधिकरणाचा केविलवाणा प्रयत्न

राहुल तांबोळी -- भुर्इंजगरज नसताना सुरु असलेले महामागाचे सहापदरीकरण. अधिकाऱ्यांची मनमानी. कामातील ठासळलेली गुणवत्ता. नियोजनाचा अभाव अन् वाढते अपघात... यामुळे अगोदरच नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. त्यातच बुधवारी भुर्इंज येथे उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला त्यामुळे पुन्हा एकदा महामार्ग प्राधिकरणाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उड्डाणपूल उभारणीत घडलेल्या या अक्षम्य चुकीवर पांघरुण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करत महामार्ग प्राधिकरणाने कोसळलेला पूल चक्क बारदानात गुंडाळून ठेवला.बुधवारी (दि.२७) रात्री आठ वाजता कामगार जेवायला गेले असताना उड्डाणपुलाचा स्लॅब कोसळला. त्यामुळे जीवितहानी टळली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. या घटनेचे गांभीर्य ओळखून गुरुवारी सकाळी लवकर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनस्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेप्रकरणी प्रकल्प व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे डॉ. देशमुख यांनी यावेळी सांगितले. अधिकारी म्हणतात, ‘काहीच कल्पना नाही!’भुर्इंज येथील दुर्घटनेनंतर ग्रामस्थांनी महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बिजेंद्र नावाचे अधिकारी यांनी आपणास काहीच कल्पना नाही, असे सांगून त्यांनी जबाबदारी झटकली. तसेच इतर जबाबदार अधिकारी, सुपरवायझर यांनीही घटनास्थळी थांबण्याचे औदार्य दाखवले नाही. गावातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी या घटनेबाबत संवाद साधला नाही. या दुर्घटनेचे कारण स्पष्ट केले नाही. याबाबतही अनेकांनी संताप व्यक्त केला. यावेळी गजानन भोसले, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश शिंदे, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर भोसले-पाटील, भाऊसाहेब जाधवराव, मधुकर भोसले, किरण शिंदे, नारायण नलवडे, प्रतापराव जाधवराव, भाऊसाहेब शिंदे, शेषा भोसले उपस्थित होते. संयुक्त बैठक बोलावणारया दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स कंपनी, प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ व दर्जा देखरेख समिती यांची संयुक्त बैठक बोलावण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे यावेळी डॉ. अभिनव देशमुख यांनी स्पष्ट केले. महामार्ग सहापदीरकणाचे काम वेळेत पूर्ण होण्याबरोबरच उत्तम दर्जाचे आणि अपघाताविना होणे आवश्यक आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिस विभागाची जी जबाबदारी असेल, ती बजावली जाईल, असा शब्द त्यांनी दिला.