शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

वटवृक्षांवर घाला... सावली हरपली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 11:45 IST

वृक्षलागवड व संर्वधनासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जात असताना साताºयात मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. रस्त्याकडेला असलेले भले मोठे वृक्ष धोकादायक ठरवून ते तोडले जात आहेत. बुधवार नाका ते मोळाचा ओढा या मार्गावरील अनेक वटवृक्ष आजपर्यंत तोडण्यात आले असून, हक्काची सावली हरपली असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींमधून नाराजीबुधवार नाका-मोळाचा ओढा मार्ग झाला सुनासुना
आॅनलाईन लोकमतसातारा : वृक्षलागवड व संर्वधनासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जात असताना साताºयात मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. रस्त्याकडेला असलेले भले मोठे वृक्ष धोकादायक ठरवून ते तोडले जात आहेत. बुधवार नाका ते मोळाचा ओढा या मार्गावरील अनेक वटवृक्ष आजपर्यंत तोडण्यात आले असून, हक्काची सावली हरपली असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.मध्यवर्ती बसस्थानक ते मोळाचा ओढा या मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. रुंदीकरणाला अडथळा ठरणारे अनेक वृक्ष प्रशासनाच्या वतीने तोडण्यात आले आहेत. मात्र, आजही वृक्षांची कत्तल सुरूच आहे. जुन्या वटवृक्षांना धोकादायक ठरवून त्यांच्यावर घाला घातला जात आहे. आजपर्यंत अनेक वटवृक्ष धोकादायक ठरवून व रुंदीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.एकीकडे वृक्षसंवर्धनासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जात आहेत. नागरिकांमध्ये वृक्षलागवडीबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र, साताºयात रुंदीकरणाच्या नावाखाली व वृक्षांना धोकादायक ठरवून त्यांच्यावर घाला घातला जात आहे. वृक्षलागवड व संवर्धन ही काळाची गरज असून, प्रशासनाच्या वतीने या मार्गावर वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी तसेच नागरिकांमधून होत आहे.रस्त्याचे बदलले रूपदुतर्फा असलेल्या वृक्षांमुळे या मार्गवरून प्रवास करताना प्रवासी व नागरिकांना सुखकर वाटत होते. पादचाºयांनाही वृक्षांमुळे हक्काची सावली मिळत होती. मात्र, वृक्षतोडीमुळे बसस्थानक ते मोळाचा ओढा या मार्गाचे रुपडेच बदलून गेले आहे. पादचाºयांना वर्षानुवर्षे सावली देणारी झाडेच आता नष्ट झाल्याने हक्काची सावली हरपली आहे. अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.