शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वटवृक्षांवर घाला... सावली हरपली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 11:45 IST

वृक्षलागवड व संर्वधनासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जात असताना साताºयात मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. रस्त्याकडेला असलेले भले मोठे वृक्ष धोकादायक ठरवून ते तोडले जात आहेत. बुधवार नाका ते मोळाचा ओढा या मार्गावरील अनेक वटवृक्ष आजपर्यंत तोडण्यात आले असून, हक्काची सावली हरपली असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपर्यावरणप्रेमींमधून नाराजीबुधवार नाका-मोळाचा ओढा मार्ग झाला सुनासुना
आॅनलाईन लोकमतसातारा : वृक्षलागवड व संर्वधनासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जात असताना साताºयात मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. रस्त्याकडेला असलेले भले मोठे वृक्ष धोकादायक ठरवून ते तोडले जात आहेत. बुधवार नाका ते मोळाचा ओढा या मार्गावरील अनेक वटवृक्ष आजपर्यंत तोडण्यात आले असून, हक्काची सावली हरपली असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.मध्यवर्ती बसस्थानक ते मोळाचा ओढा या मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. रुंदीकरणाला अडथळा ठरणारे अनेक वृक्ष प्रशासनाच्या वतीने तोडण्यात आले आहेत. मात्र, आजही वृक्षांची कत्तल सुरूच आहे. जुन्या वटवृक्षांना धोकादायक ठरवून त्यांच्यावर घाला घातला जात आहे. आजपर्यंत अनेक वटवृक्ष धोकादायक ठरवून व रुंदीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.एकीकडे वृक्षसंवर्धनासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविल्या जात आहेत. नागरिकांमध्ये वृक्षलागवडीबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र, साताºयात रुंदीकरणाच्या नावाखाली व वृक्षांना धोकादायक ठरवून त्यांच्यावर घाला घातला जात आहे. वृक्षलागवड व संवर्धन ही काळाची गरज असून, प्रशासनाच्या वतीने या मार्गावर वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी तसेच नागरिकांमधून होत आहे.रस्त्याचे बदलले रूपदुतर्फा असलेल्या वृक्षांमुळे या मार्गवरून प्रवास करताना प्रवासी व नागरिकांना सुखकर वाटत होते. पादचाºयांनाही वृक्षांमुळे हक्काची सावली मिळत होती. मात्र, वृक्षतोडीमुळे बसस्थानक ते मोळाचा ओढा या मार्गाचे रुपडेच बदलून गेले आहे. पादचाºयांना वर्षानुवर्षे सावली देणारी झाडेच आता नष्ट झाल्याने हक्काची सावली हरपली आहे. अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.