शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

आधी लावतायत वणवा.. मग वृक्षांवर घाला ! अजिंक्यतारा होतोय बोडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:56 IST

जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वनसंपदा वणव्यात खाक होत असताना आता या किल्ल्याला वृक्षतोडीचेही ग्रहण लागले आहे. काही नागरिकांकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असून, किल्ल्यावरील वनौषधी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत

ठळक मुद्देवनौषधी नष्ट होण्याच्या मार्गावर; पर्यावरणप्रेमी संतप्त

सातारा : जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वनसंपदा वणव्यात खाक होत असताना आता या किल्ल्याला वृक्षतोडीचेही ग्रहण लागले आहे. काही नागरिकांकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असून, किल्ल्यावरील वनौषधी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.अजिंक्यतारा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. येथील वनसंपदा हीच किल्ल्याची खरी संपत्ती आहे. साग, चंदन, शिवर, धायटी, सुबाभूळ, कडुलिंब, नीलगिरी यासह विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आजही येथे आढळतात. परंतु अलीकडे या वृक्षांची संख्या कमी-कमी होत चालली आहे. त्याला कारणही तसेच आहे.

डोंगराच्या पायथ्याशी रहिवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक नागरिक किल्ल्यावरील वृक्षांचा उपयोग इंधन म्हणून करीत आहे. यासाठी छोट्या-मोठ्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. एकीकडे वणव्यात वृक्षांची होरपळ सुरू असताना आता वृक्षतोडीच्या घटनांतही वाढ होऊ लागल्याने गर्द वनराईने नटलेला अजिंक्यतारा किल्ला बोडका होऊ लागला आहे. किल्ल्यावर आतापर्यंत विविध सामाजिक संस्था व नागरिकांकडून वृक्षारोपण करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या हिमतीने या झाडांचे संवर्धन केले. परंतु वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षतोडीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. किल्ल्यावरील या वनसंपदेचे जतन करण्यासाठी वनविभागाच्या वतीने ठोस पावले उचलण्यात यावीता, अशी मागणी नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.वृक्षतोडीचा नवा फंडा चर्चेचा विषयजे वृक्ष सुकलेले आहेत अथवा पडण्याच्या मार्गावर आहेत, असे वृक्ष नागरिकांकडून तोडले जातात. परंतु हिरव्यागार वृक्षांवरही घाला घातला जातो. हिरव्यागार झाडांच्या फांद्या तोडून त्या जागेवरच टाकल्या जातात. काही दिवसांनंतर त्या सुकल्या की त्याची मोळी बांधून नेली जाते. वृक्षतोडीचा हा नवा फंडा चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

अजिंक्यतारा किल्ल्यावर वृक्षतोडीच्या घटना वाढल्या आहेत. काही वर्षांपूर्वी हिरवागार दिसणारा हा किल्ला आता वृक्षांअभावी ओसाड दिसू लागला आहे. या घटनांवर अंकुश लावण्यासाठी वनविभागाने तातडीने कार्यवाही करावी.- अजित इथापे, नागरिक

टॅग्स :forestजंगलroad safetyरस्ते सुरक्षा