शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

आधी लावतायत वणवा.. मग वृक्षांवर घाला ! अजिंक्यतारा होतोय बोडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 14:56 IST

जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वनसंपदा वणव्यात खाक होत असताना आता या किल्ल्याला वृक्षतोडीचेही ग्रहण लागले आहे. काही नागरिकांकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असून, किल्ल्यावरील वनौषधी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत

ठळक मुद्देवनौषधी नष्ट होण्याच्या मार्गावर; पर्यावरणप्रेमी संतप्त

सातारा : जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरील वनसंपदा वणव्यात खाक होत असताना आता या किल्ल्याला वृक्षतोडीचेही ग्रहण लागले आहे. काही नागरिकांकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असून, किल्ल्यावरील वनौषधी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.अजिंक्यतारा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. येथील वनसंपदा हीच किल्ल्याची खरी संपत्ती आहे. साग, चंदन, शिवर, धायटी, सुबाभूळ, कडुलिंब, नीलगिरी यासह विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आजही येथे आढळतात. परंतु अलीकडे या वृक्षांची संख्या कमी-कमी होत चालली आहे. त्याला कारणही तसेच आहे.

डोंगराच्या पायथ्याशी रहिवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक नागरिक किल्ल्यावरील वृक्षांचा उपयोग इंधन म्हणून करीत आहे. यासाठी छोट्या-मोठ्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. एकीकडे वणव्यात वृक्षांची होरपळ सुरू असताना आता वृक्षतोडीच्या घटनांतही वाढ होऊ लागल्याने गर्द वनराईने नटलेला अजिंक्यतारा किल्ला बोडका होऊ लागला आहे. किल्ल्यावर आतापर्यंत विविध सामाजिक संस्था व नागरिकांकडून वृक्षारोपण करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या हिमतीने या झाडांचे संवर्धन केले. परंतु वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षतोडीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. किल्ल्यावरील या वनसंपदेचे जतन करण्यासाठी वनविभागाच्या वतीने ठोस पावले उचलण्यात यावीता, अशी मागणी नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.वृक्षतोडीचा नवा फंडा चर्चेचा विषयजे वृक्ष सुकलेले आहेत अथवा पडण्याच्या मार्गावर आहेत, असे वृक्ष नागरिकांकडून तोडले जातात. परंतु हिरव्यागार वृक्षांवरही घाला घातला जातो. हिरव्यागार झाडांच्या फांद्या तोडून त्या जागेवरच टाकल्या जातात. काही दिवसांनंतर त्या सुकल्या की त्याची मोळी बांधून नेली जाते. वृक्षतोडीचा हा नवा फंडा चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

अजिंक्यतारा किल्ल्यावर वृक्षतोडीच्या घटना वाढल्या आहेत. काही वर्षांपूर्वी हिरवागार दिसणारा हा किल्ला आता वृक्षांअभावी ओसाड दिसू लागला आहे. या घटनांवर अंकुश लावण्यासाठी वनविभागाने तातडीने कार्यवाही करावी.- अजित इथापे, नागरिक

टॅग्स :forestजंगलroad safetyरस्ते सुरक्षा