शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुसेगावात बिनधास्त ‘संचार’तर ‘बंदी’ केवळ नावाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:38 IST

पुसेगाव : कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी वीकेंडला कडक संचारबंदी असूनही पुसेगावात मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. विनाकारण मोठ्या संख्येने ...

पुसेगाव : कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी वीकेंडला कडक संचारबंदी असूनही पुसेगावात मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. विनाकारण मोठ्या संख्येने नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. दुचाकी, चारचाकी गाडीतून फेरफटका चालूच असून, बऱ्याच बंद दुकानांसमोर घोळक्याने चकाट्या मारणाऱ्यांकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. अशांना कुणीतरी जाब विचारणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

गेल्या वर्षी याच पुसेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतःहून ‘जनता कर्फ्यू’ करून बाजारपेठ बंद ठेवत कडक संचारबंदी पाळणारी पुसेगाव व परिसरातील जनता सध्या अशी का वागत आहे, असा प्रश्न सुजाण नागरिक विचारताना दिसत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संपूर्ण सातारा जिल्ह्यात सुुमारे १५ दिवस कडक निर्बंध लावण्यात आले आहेत तर वीकेंडला सर्वच बंद ठेवून कडक संचारबंदी आहे. मात्र, या अंशतः टाळेबंदीत प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन पुसेगाव (ता. खटाव) येथील काही नागरिक करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. या टाळेबंदीत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे. याचाच फायदा घेत मोठ्या संख्येने नागरिक घराच्या बाहेर पडत असून, सुरक्षित अंतराच्या नियमांकडेही दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. विनाकारण घराच्या बाहेर पडू नका, अशा सूचना महसूल, पोलीस, आरोग्य प्रशासनाकडून वारंवार केल्या जात आहेत. मात्र, विनाकारण रस्त्याने चालत, दुचाकी - चारचाकीतून फिरणाऱ्यांना कुणीतरी जाब विचारणे गरजेचे आहे, यासाठी पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

पुसेगावसह परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाही “डॉक्टरकडे निघालो आहे”, “औषध आणायला जातो आहे”, “शेतीची खते आणायला चाललोय”, “बँकेत चाललोय”, “शेतातून आलोय”, “रेशनिंग आणायला चाललो आहे,” अशी एकापेक्षा एक अत्यावश्यक सेवेतील ‘खोटी’ कारणे देऊन नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. अशा चुकीच्या पद्धतीने बहुतांश नागरिक घराबाहेर पडून स्वत:च्या व इतरांच्या जीवाला धोका निर्माण करीत आहेत. परिणामी, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक भ्रमंती करीत असल्याने प्रशासन टाळेबंदी का करतेय? याचा नागरिकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज दिसून येत आहे.

दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येथील नागरिकांनी आपले कर्तव्य म्हणून शासनाने दिलेले दिशा निर्देश पाळून कोरोना हद्दपार होईपर्यंत स्वतःला ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याची गरज आहे.

चौकट :

प्रशासनाचा ‘कारवाईचा, कार्यवाहीचा’ धाक कमी झाला का?

गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात रस्त्याने पोलीस गाडी दिसली तरी लोक आपोआप पांगत होते. चौकातून ये-जा करताना ठोस कारण असेल तरच परवानगी दिली जात होती. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या व चकाट्या मारत उभ्या असणाऱ्या गावातील व आसपासच्या गावातून पुसेगावात येणाऱ्या नागरिकांना चाप बसत होता. कित्येक दुचाकी गाड्या कारवाईत पोलीस ठाण्यात विसावल्याही होत्या. महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या मदतीने नागरिक सुजाण होऊन कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेत होते. मात्र सध्या प्रशासनाचा ‘कारवाईचा आणि कार्यवाहीचा’ धाक कमी झाला आहे की काय? अशी शंका नागरिकांतून व्यक्त होत आहे.

१७पुसेगाव

फोटो : पुसेगाव (ता. खटाव) काही नागरिक विनाकारण घराबाहेर बाहेर पडत असून, बंद बाजारपेठेत, रस्त्यावर मोकाट संचार करीत आहेत.