शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

पुसेगावात बिनधास्त ‘संचार’तर ‘बंदी’ केवळ नावाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:38 IST

पुसेगाव : कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी वीकेंडला कडक संचारबंदी असूनही पुसेगावात मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. विनाकारण मोठ्या संख्येने ...

पुसेगाव : कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी वीकेंडला कडक संचारबंदी असूनही पुसेगावात मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. विनाकारण मोठ्या संख्येने नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. दुचाकी, चारचाकी गाडीतून फेरफटका चालूच असून, बऱ्याच बंद दुकानांसमोर घोळक्याने चकाट्या मारणाऱ्यांकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. अशांना कुणीतरी जाब विचारणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

गेल्या वर्षी याच पुसेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतःहून ‘जनता कर्फ्यू’ करून बाजारपेठ बंद ठेवत कडक संचारबंदी पाळणारी पुसेगाव व परिसरातील जनता सध्या अशी का वागत आहे, असा प्रश्न सुजाण नागरिक विचारताना दिसत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संपूर्ण सातारा जिल्ह्यात सुुमारे १५ दिवस कडक निर्बंध लावण्यात आले आहेत तर वीकेंडला सर्वच बंद ठेवून कडक संचारबंदी आहे. मात्र, या अंशतः टाळेबंदीत प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन पुसेगाव (ता. खटाव) येथील काही नागरिक करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. या टाळेबंदीत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे. याचाच फायदा घेत मोठ्या संख्येने नागरिक घराच्या बाहेर पडत असून, सुरक्षित अंतराच्या नियमांकडेही दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. विनाकारण घराच्या बाहेर पडू नका, अशा सूचना महसूल, पोलीस, आरोग्य प्रशासनाकडून वारंवार केल्या जात आहेत. मात्र, विनाकारण रस्त्याने चालत, दुचाकी - चारचाकीतून फिरणाऱ्यांना कुणीतरी जाब विचारणे गरजेचे आहे, यासाठी पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची आवश्यकता भासू लागली आहे.

पुसेगावसह परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाही “डॉक्टरकडे निघालो आहे”, “औषध आणायला जातो आहे”, “शेतीची खते आणायला चाललोय”, “बँकेत चाललोय”, “शेतातून आलोय”, “रेशनिंग आणायला चाललो आहे,” अशी एकापेक्षा एक अत्यावश्यक सेवेतील ‘खोटी’ कारणे देऊन नागरिक घराच्या बाहेर पडत आहेत. अशा चुकीच्या पद्धतीने बहुतांश नागरिक घराबाहेर पडून स्वत:च्या व इतरांच्या जीवाला धोका निर्माण करीत आहेत. परिणामी, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक भ्रमंती करीत असल्याने प्रशासन टाळेबंदी का करतेय? याचा नागरिकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज दिसून येत आहे.

दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येथील नागरिकांनी आपले कर्तव्य म्हणून शासनाने दिलेले दिशा निर्देश पाळून कोरोना हद्दपार होईपर्यंत स्वतःला ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याची गरज आहे.

चौकट :

प्रशासनाचा ‘कारवाईचा, कार्यवाहीचा’ धाक कमी झाला का?

गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात रस्त्याने पोलीस गाडी दिसली तरी लोक आपोआप पांगत होते. चौकातून ये-जा करताना ठोस कारण असेल तरच परवानगी दिली जात होती. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या व चकाट्या मारत उभ्या असणाऱ्या गावातील व आसपासच्या गावातून पुसेगावात येणाऱ्या नागरिकांना चाप बसत होता. कित्येक दुचाकी गाड्या कारवाईत पोलीस ठाण्यात विसावल्याही होत्या. महसूल, आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या मदतीने नागरिक सुजाण होऊन कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेत होते. मात्र सध्या प्रशासनाचा ‘कारवाईचा आणि कार्यवाहीचा’ धाक कमी झाला आहे की काय? अशी शंका नागरिकांतून व्यक्त होत आहे.

१७पुसेगाव

फोटो : पुसेगाव (ता. खटाव) काही नागरिक विनाकारण घराबाहेर बाहेर पडत असून, बंद बाजारपेठेत, रस्त्यावर मोकाट संचार करीत आहेत.