शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

सोयाबीनची खरेदी व्यापाºयांकडून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : राज्य शासनाने सोयाबीनसह कडधान्य खरेदीसाठी हमीभावाचा फतवा काढला असून, हमी भाव आणि प्रत्यक्षात खुल्या बाजारातील दरामध्ये मोठी फारकत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून व्यापाºयांनी सोयाबीनची खरेदी पूर्णत: बंद केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येणाºया शेतकºयांमध्ये निराशेचे वातावरण असून, त्यांची दिवाळी यंदा अंधारातच साजरी होण्याची दाट ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : राज्य शासनाने सोयाबीनसह कडधान्य खरेदीसाठी हमीभावाचा फतवा काढला असून, हमी भाव आणि प्रत्यक्षात खुल्या बाजारातील दरामध्ये मोठी फारकत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून व्यापाºयांनी सोयाबीनची खरेदी पूर्णत: बंद केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येणाºया शेतकºयांमध्ये निराशेचे वातावरण असून, त्यांची दिवाळी यंदा अंधारातच साजरी होण्याची दाट शक्यता आहे. शासनाच्या या निर्णयाचा फटका वाहनधारकांबरोबरच हमाल-मापाड्यांना देखील बसला आहे.पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कडधान्यांसाठी हमी भाव जाहीर केले असून, पणन खात्याला त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी सर्व सहायक निबंधकांना सूचना देऊन बाजार समित्यांमार्फत हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यासाठी व्यापाºयांना नोटीस बजावण्याचे आदेश काढले. कोरेगावात बाजार समितीने शनिवारीच या आदेशाचे पालन करत तातडीने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, वस्तूस्थिती वेगळीच निघाली. हमी भावाचा शासनाचा फतवा निघाल्यामुळे व्यापाºयांनीच अगोदरपासून खरेदी अघोषित काळासाठी बंदच केली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दसºयापासून शेतकरीवर्ग सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणतात, बाजारपेठेतील दराप्रमाणे त्याची विक्री केली जाते आणि त्यातून दिवाळीची खरेदी केली जाते. यावर्षी शासनाने हमीभावाचा फतवा काढला, तो काढत असताना बाजारपेठेतील परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास केलेला दिसत नाही. स्थानिक व्यापारी सोयाबीनची खरेदी करून ते मिलमध्ये पाठवतात, तेथे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. विशेषत: सोयाबीन तेलासाठीत्याचा सर्वाधिक वापर होतो.प्रत्यक्षात मिलला आयात केलेले कच्चे सोयाबीन तेल स्वस्तातमिळत असल्याने ते स्थानिकसोयाबीन खरेदीकडे लक्ष देत नाहीत. त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे.गेल्या आठवड्यात २६०० ते २७५० रुपये प्रती क्विंटल सोयाबीनचा स्थानिक बाजारपेठेत दर होता. कोरेगावसह तालुक्यात खरेदी करण्यात येणारे सोयाबीन हे जास्त करून मिल्सला विकले जाते. या मिल्समध्ये असलेल्या आधुनिक मशिनरीच्या माध्यामतून आर्द्रता, माती व बारदान आदींची वजावट करून व्यापाºयांना दर दिला जातो. मिल्सचे आणि स्थानिक बाजारपेठेतील दरात केवळ ३० ते ४० रुपयांचाफरक राहतो, असे असताना शासनाने अचानक २८५० मूळ भाव व त्यावर २०० रुपये बोनस असा ३०५० रुपयांचा हमीभाव जाहीरकेल्याने व्यापाºयांची बोबडीच वळाली आहे. सोयाबीनच नव्हे तर अन्य कडधान्यांसाठी हमीभाव जाहीर केल्याने त्यांची खरेदी करणे व्यापाºयांना दुरापस्त झाले आहे.शेतकरी, बाजार समिती आणि पणन खात्याशी वादविवाद होण्यापेक्षा व्यापाºयांनी तूर्तास सोयाबीन खरेदी पूर्णत बंद केली आहे. व्यापाºयांच्या या पवित्र्यामुळे थेट बाजार समितीच्या उत्पन्नावर देखील परिणाम होत असून, हमाल व मापाड्यांना काम राहिलेले नाही. ग्रामीण भागातून सोयाबीनची वाहतूक करणाºया वाहनधारकांना देखील त्याचा फटका बसला आहे.