शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

सोयाबीनची खरेदी व्यापाºयांकडून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : राज्य शासनाने सोयाबीनसह कडधान्य खरेदीसाठी हमीभावाचा फतवा काढला असून, हमी भाव आणि प्रत्यक्षात खुल्या बाजारातील दरामध्ये मोठी फारकत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून व्यापाºयांनी सोयाबीनची खरेदी पूर्णत: बंद केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येणाºया शेतकºयांमध्ये निराशेचे वातावरण असून, त्यांची दिवाळी यंदा अंधारातच साजरी होण्याची दाट ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : राज्य शासनाने सोयाबीनसह कडधान्य खरेदीसाठी हमीभावाचा फतवा काढला असून, हमी भाव आणि प्रत्यक्षात खुल्या बाजारातील दरामध्ये मोठी फारकत असल्याने गेल्या दोन दिवसांपासून व्यापाºयांनी सोयाबीनची खरेदी पूर्णत: बंद केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन विक्रीसाठी घेऊन येणाºया शेतकºयांमध्ये निराशेचे वातावरण असून, त्यांची दिवाळी यंदा अंधारातच साजरी होण्याची दाट शक्यता आहे. शासनाच्या या निर्णयाचा फटका वाहनधारकांबरोबरच हमाल-मापाड्यांना देखील बसला आहे.पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कडधान्यांसाठी हमी भाव जाहीर केले असून, पणन खात्याला त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी सर्व सहायक निबंधकांना सूचना देऊन बाजार समित्यांमार्फत हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यासाठी व्यापाºयांना नोटीस बजावण्याचे आदेश काढले. कोरेगावात बाजार समितीने शनिवारीच या आदेशाचे पालन करत तातडीने नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, वस्तूस्थिती वेगळीच निघाली. हमी भावाचा शासनाचा फतवा निघाल्यामुळे व्यापाºयांनीच अगोदरपासून खरेदी अघोषित काळासाठी बंदच केली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दसºयापासून शेतकरीवर्ग सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणतात, बाजारपेठेतील दराप्रमाणे त्याची विक्री केली जाते आणि त्यातून दिवाळीची खरेदी केली जाते. यावर्षी शासनाने हमीभावाचा फतवा काढला, तो काढत असताना बाजारपेठेतील परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास केलेला दिसत नाही. स्थानिक व्यापारी सोयाबीनची खरेदी करून ते मिलमध्ये पाठवतात, तेथे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. विशेषत: सोयाबीन तेलासाठीत्याचा सर्वाधिक वापर होतो.प्रत्यक्षात मिलला आयात केलेले कच्चे सोयाबीन तेल स्वस्तातमिळत असल्याने ते स्थानिकसोयाबीन खरेदीकडे लक्ष देत नाहीत. त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे.गेल्या आठवड्यात २६०० ते २७५० रुपये प्रती क्विंटल सोयाबीनचा स्थानिक बाजारपेठेत दर होता. कोरेगावसह तालुक्यात खरेदी करण्यात येणारे सोयाबीन हे जास्त करून मिल्सला विकले जाते. या मिल्समध्ये असलेल्या आधुनिक मशिनरीच्या माध्यामतून आर्द्रता, माती व बारदान आदींची वजावट करून व्यापाºयांना दर दिला जातो. मिल्सचे आणि स्थानिक बाजारपेठेतील दरात केवळ ३० ते ४० रुपयांचाफरक राहतो, असे असताना शासनाने अचानक २८५० मूळ भाव व त्यावर २०० रुपये बोनस असा ३०५० रुपयांचा हमीभाव जाहीरकेल्याने व्यापाºयांची बोबडीच वळाली आहे. सोयाबीनच नव्हे तर अन्य कडधान्यांसाठी हमीभाव जाहीर केल्याने त्यांची खरेदी करणे व्यापाºयांना दुरापस्त झाले आहे.शेतकरी, बाजार समिती आणि पणन खात्याशी वादविवाद होण्यापेक्षा व्यापाºयांनी तूर्तास सोयाबीन खरेदी पूर्णत बंद केली आहे. व्यापाºयांच्या या पवित्र्यामुळे थेट बाजार समितीच्या उत्पन्नावर देखील परिणाम होत असून, हमाल व मापाड्यांना काम राहिलेले नाही. ग्रामीण भागातून सोयाबीनची वाहतूक करणाºया वाहनधारकांना देखील त्याचा फटका बसला आहे.