शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

ताेतया व्यक्ती उभी करुन जमिनीची खरेदी; मेढा पोलिसांकडून चाैघांना अटक 

By नितीन काळेल | Updated: February 17, 2024 00:00 IST

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंधारी, ता. जावळी येथील रामचंद्र विठ्ठल शेलार आणि लक्ष्मण रखमाजी शेलार यांच्या जमिनीचा खरेदी दस्त तोतया व्यक्ती उभा करुन करण्यात आला होता.

सातारा : जावळी तालुक्यातील जमिनीची तोतया व्यक्ती उभी करुन खरेदी केल्याप्रकरणात मेढा पोलिसांनी चाैघांना अटक केली आहे. संबंधितांना न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

            याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंधारी, ता. जावळी येथील रामचंद्र विठ्ठल शेलार आणि लक्ष्मण रखमाजी शेलार यांच्या जमिनीचा खरेदी दस्त तोतया व्यक्ती उभा करुन करण्यात आला होता. मेढा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात हा दस्त झाला होता. याबाबत रामचंद्र शेलार यांनी मेढा पोलिस ठाण्यात जून २०२३ मध्ये दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान संशयितांकडे चाैकशी केल्यावर आणखी १० जणांची नावे निष्पन्न झाली. परंतु, दस्त करतेवेळी उभ्या केलेल्या तोतया व्यक्तींची माहिती मिळत नव्हती. मात्र, १४ फेब्रुवारी रोजी तोतयापैकी संपत हरिबा कदम याचे नाव निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर इतर संशयितांची नावे स्पष्ट झाली. त्यामुळे याप्रकरणात रवींद्र पांडुरंग शेलार (रा. अंधारी) संतोष बंडू सावंत (रा. उंबरेवाडी, ता. जावळी) आणि विजय सदाशिव कदम आणि संपत हरिबा कदम (दोघेही रा. आपटी, ता. जावळी) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर हे तपास करीत आहेत. 

             पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक फाैजदार विकास गंगावणे, हवालदार सनी कांबळे यांनी कारवाईत सहभाग घेतला. 

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी