शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

ताेतया व्यक्ती उभी करुन जमिनीची खरेदी; मेढा पोलिसांकडून चाैघांना अटक 

By नितीन काळेल | Updated: February 17, 2024 00:00 IST

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंधारी, ता. जावळी येथील रामचंद्र विठ्ठल शेलार आणि लक्ष्मण रखमाजी शेलार यांच्या जमिनीचा खरेदी दस्त तोतया व्यक्ती उभा करुन करण्यात आला होता.

सातारा : जावळी तालुक्यातील जमिनीची तोतया व्यक्ती उभी करुन खरेदी केल्याप्रकरणात मेढा पोलिसांनी चाैघांना अटक केली आहे. संबंधितांना न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

            याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंधारी, ता. जावळी येथील रामचंद्र विठ्ठल शेलार आणि लक्ष्मण रखमाजी शेलार यांच्या जमिनीचा खरेदी दस्त तोतया व्यक्ती उभा करुन करण्यात आला होता. मेढा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात हा दस्त झाला होता. याबाबत रामचंद्र शेलार यांनी मेढा पोलिस ठाण्यात जून २०२३ मध्ये दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान संशयितांकडे चाैकशी केल्यावर आणखी १० जणांची नावे निष्पन्न झाली. परंतु, दस्त करतेवेळी उभ्या केलेल्या तोतया व्यक्तींची माहिती मिळत नव्हती. मात्र, १४ फेब्रुवारी रोजी तोतयापैकी संपत हरिबा कदम याचे नाव निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर इतर संशयितांची नावे स्पष्ट झाली. त्यामुळे याप्रकरणात रवींद्र पांडुरंग शेलार (रा. अंधारी) संतोष बंडू सावंत (रा. उंबरेवाडी, ता. जावळी) आणि विजय सदाशिव कदम आणि संपत हरिबा कदम (दोघेही रा. आपटी, ता. जावळी) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर हे तपास करीत आहेत. 

             पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल, पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, सहायक फाैजदार विकास गंगावणे, हवालदार सनी कांबळे यांनी कारवाईत सहभाग घेतला. 

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी