शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

सरकारला एकजुटीतून खाली खेचा : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 02:09 IST

कºहाड : ‘शेतकºयांच्या कर्जमाफीचा घोटाळा आणि त्यातील भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिल्यांदाच पाहतोय. कर्जमाफी, जीएसटीमुळे सरकार पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. शेतकºयांपाठोपाठ व्यापारी व युवकही आत्महत्या करू लागले आहेत. यावर मुख्यमंत्र्यांचे बिलकुल नियंत्रण नाही. एकजुटीने या सरकारला खाली खेचल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त ...

ठळक मुद्देशेतकºयांपाठोपाठ युवक, व्यापाºयांच्याही आत्महत्याआज व्यापारी मंडळी ज्यांनी मोठ्या अपेक्षेने भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी मदत केली तो व्यापारी आज उद्ध्वस्त झाला आहे.’

कºहाड : ‘शेतकºयांच्या कर्जमाफीचा घोटाळा आणि त्यातील भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिल्यांदाच पाहतोय. कर्जमाफी, जीएसटीमुळे सरकार पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. शेतकºयांपाठोपाठ व्यापारी व युवकही आत्महत्या करू लागले आहेत. यावर मुख्यमंत्र्यांचे बिलकुल नियंत्रण नाही. एकजुटीने या सरकारला खाली खेचल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

कºहाड येथे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याची आठवण व्हावी, अशी संकटमय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. आज संबंध महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल आहे. उद्योगाच्या बाबतीत पिछाडीवर आहे. युवकांना दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. रोजगार नाहीत. नवीन उद्योग न निघाल्याने बेरोजगारांची संख्या वाढली आहे व्यापारी जीएसटीच्या आघातामुळे अजूनही सावरले नाहीत.

नोटाबंदीतून सावरत नाही तोच सरकारने जीएसटी लादून दुसरा हल्ला केला. शेतकºयांच्या कर्जमाफीचा घोटाळा आणि त्यातील भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी मी कधीही पाहिलेला नाही.सरकार पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कर्जमाफीची बोगस माहिती दिल्याचा आरोप मुख्यमंत्री राष्ट्रीयकृत बँकांवर करत आहेत. अधिकारी ऐकत नाहीत म्हणून मुख्यमंत्री हताश झालेले दिसत आहेत. या परिस्थितीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना, युवकांना एकजुटीने सरकारला प्रतिकार करून सरकार खाली खेचल्याशिवाय आपली परिस्थिती बदलणार नाही. आज व्यापारी मंडळी ज्यांनी मोठ्या अपेक्षेने भाजपाला सत्तेवर आणण्यासाठी मदत केली तो व्यापारी आज उद्ध्वस्त झाला आहे.’