शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

जनमानसातील एस.टी. ची प्रतिमा उंचावूया!

By admin | Updated: December 1, 2014 00:23 IST

प्रतापसिंह सावंत : वडूज आगाराच्या कर्मचाऱ्यांशी साधला संवाद

वडूज : ‘संस्थेच्या हितासाठी काम करणे माझे कर्तव्य आहे. कारण ही संस्था माझे व माझ्या कुटुंबाचे हीत जोपासते. प्रसंगी निर्माण होणारे प्रश्न समोपचाराने सोडविले तर हा वडूज आगार सुस्थितीत चालेल. तसेच प्रवाशांना चांगली सेवा देऊन जनमानसातील एस.टी. ची. प्रतिमा उंचावूया,’ असे भावनिक आव्हान प्रादेशिक व्यवस्थापक प्रतापसिंह सावंत यांनी केले.येथील आगारामध्ये चालक, वाहक, मेकॅनिक, व कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आगारप्रमुख आलेकरी, के. टी. पाटील, संजय गुजर, सुनील मदने, अप्पासाहेब यादव, शिवाजी देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.सावंत म्हणाले, ‘वर्षातून एकदाच गॅरेजला जाणारी खासगी वाहने व्यवस्थित असतात. मात्र, आपली एस. टी. बस दररोज वर्कशॉपला येऊनही तिची दुरवस्था का? कारण कमतरता काय तर इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो. पैसे देऊन प्रवाशांनी एस. टी. बसमध्ये का बसावे? त्यासाठी आता मला हे बदलावयाचे आहे. या स्वच्छ भावनेतूनच नवीन उभारी घेऊन काम करूया, अशी वास्तव भूमिका मांडली. घराला शिस्त लावताना काही वेळा कटू निर्णय घ्यावे लागतात. पगारापुरते काम करून चालणार नाही. कारण शासनाचे टप्पा वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एस. टी. ची. प्रतिमा उंचाविली तर अप्रत्यक्ष फायदा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये होत असतो.’दरम्यान, प्रादेशिक व्यवस्थापक सावंत यांनी वडूज आगारामध्ये वर्कशॉप व गाड्यांची तपासणी केली. त्यानंतर चालक, वाहक मेकॅनिक व कर्मचाऱ्यांशी त्यांनी सविस्तर चर्चा करून अडीअडचणी समजून घेतल्या. याप्रसंगी मनसे संघटना व कामगार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार केला.चालक अप्पासाहेब यादव यांनी शिस्त, स्वच्छता व काम हा त्रिसूत्री कार्यक्रम राबविला तर हा डेपो निश्चितच नफ्यात येईल, असा मानस व्यक्त केला. तर कामगार संघटनेचे सुनील मदने यांनी बसेसमध्ये साठच्या वेगाला लॉक केल्यामुळे डिझेल बचत करताना अडचणी येत असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी भरत राऊत, राजेंद्र जाधव, डी. टी. जाधव, संदीपान देशमुख आदींसह चालक, वाहक, मेकॅनिक व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)खाऊन माजा; पण टाकून माजू नकाआगारातील प्रत्येक गाडीचे आॅईल गळती पाहून सावंत यांनी प्रापंचिक उदाहरण देताना म्हणाले, ‘घरातील महिला गोडतेलाचा वापर करताना त्या भांड्याला बोट लावून तो तेलाचा थेंब पुन्हा भांड्यात टाकते, कारण तिला प्रपंच करायचा असतो. तसेच आपण ही आपल्यात बदल केला पाहिजे.सद्य:स्थितीतील व प्रापंचिक उदाहरणांचे दाखले देऊन सावंत यांनी वास्तव भूमिकेचे स्पष्टीकरण दिले. यामध्ये त्यांनी चौफेर टोलेबाजी करत उपस्थित कर्मचाऱ्यांची मने जिंकली. तसेच काम करणाऱ्यांची पाठ थोपटा व काम न करणाऱ्याला रपाटा (शाब्दिक) द्या, असे म्हणताच हास्यकल्लोळ झाला.