शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
3
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
4
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
5
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
6
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
7
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
8
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
9
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
10
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
11
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
13
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
14
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
15
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
16
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
17
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
18
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
19
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
20
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...

नीरा-देवघर व जिहे कटापूरसाठी अतिरिक्त निधी द्या : रणजितसिंह नाईक-निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:36 IST

फलटण : ‘महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने ठोस भूमिका घेऊन ...

फलटण : ‘महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने ठोस भूमिका घेऊन सर्वपक्षीय बैठक लावावी तसेच नीरा-देवधर व जिहे कटापूरसाठी अतिरिक्त निधी द्यावा,’ अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अमित शहा यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कुल यांचा समावेश होता.

रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेप्रमाणेच महाराष्ट्रातील नीरा-देवघर व जिहे-कटापूर धरणांची अपूर्ण कामे पूर्ण करावी. नीरा-देवघर धरण पूर्ण होऊन दहा ते बारा वर्षे त्यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी साठा केला जात आहे. कालव्याची कामे अपूर्ण असल्याने या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांऐवजी सुमारे १२ टीएमसी पाणी लाभ क्षेत्राबाहेरच्या शेतकऱ्यांना दरवर्षी दिले जाते. वास्तविक लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी स्वतःच्या जमिनी स्वखुशीने शासनाला दिल्या असताना त्यांना वंचित ठेवले जाते. संबंधित पाणी लाभ क्षेत्राला मिळाले पाहिजे, यासाठी तातडीने कालव्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी.

कोट :

महाराष्ट्राच्यादृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेच्या माध्यमातून राज्यातील बहुतांश भाग ओलिताखाली येणार आहे. यातील बराचसा भाग माढा लोकसभा मतदार संघात येतो, म्हणूनच ही योजनादेखील पूर्ण करणे गरजेचे आहे.

- रणजितसिंह नाईक-निंबाळकर,

खासदार.