शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

अ‍ॅट्रॉसिटी मुद्दा मांडल्यास साताऱ्यात प्रतिमोर्चा...

By admin | Updated: October 1, 2016 00:18 IST

अशोक गायकवाड : मराठा आरक्षणासाठी आम्ही सदैव पाठीशी; मात्र.. अशोक गायकवाड : मराठा आरक्षणासाठी आम्ही सदैव पाठीशी; मात्र..

सातारा : ‘मराठा क्रांती महामोर्चाला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या भूमिकेशी आम्ही आजही ठाम आहोत आणि उद्याही राहणार आहे. परंतु अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचा मुद्दा महामोर्चात उपस्थित केला गेला तर आरपीआय सातारा जिल्ह्यात प्रतिमोर्चा काढणार,’ असे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. शिस्तबद्ध मोर्चा काढून मराठा समाजाने एक वेगळा आदर्श निर्माण केल्याचे गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले असून, मराठा समाजाला सरकारने तत्काळ आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. कित्येक वर्षांपासून ‘आरपीआय’ने मराठा आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी करून आरक्षणाचा विषय उचलून धरला आहे. मंत्री रामदास आठवले तर यासाठी नेहमी आग्रही राहिले आहेत. याची नोंद मराठा समाजाने घेतली पाहिजे, असेही गायकवाड यांनी पत्रकात म्हटले आहे. परंतु सध्या आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी कायदा हे दोन विषय एकत्र आणून मराठा समाजातील काही मंडळी दोन जातींमध्ये तेढ निर्माण करीत आहेत. केवळ मताच्या राजकारणासाठी जातीय दंगली घडविण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.वर्षानुवर्षे अन्याय, अत्याचार सहन करणारा, गाव कुसाबाहेर राहणाऱ्या मागासवर्गीय बांधवांसाठी संरक्षण कवच म्हणून या देशाच्या सर्वोच्च संसदीय कायदे मंडळाने अ‍ॅट्रॉसिटी कायदा संमत केला आहे. कायदा रद्द करून मागासवर्गीयांवर पुन्हा अन्याय, अत्याचार करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे गायकवाड यांनी पत्रकात नमूद केले आहे.आज लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत; परंतु नेमके कोणास आरक्षण मिळाले पाहिजे, हे मोर्चाचे आयोजक का सांगत नाहीत. आरक्षण कोणास हवे आहे. मराठा समाजातील प्रस्तापितांना का विस्थापितांना, बागायतदारांना का भूमिहिनांना गरीब कष्टकऱ्यांना की सावकारांना. याचे अधिविश्लेषण मोर्चा आयोजकांनी करावे, असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)मोर्चाच्या सूत्रधारांनी बुद्धिभेद करू नयेआज देशातील आणि महाराष्ट्रातील शिक्षण मंदिरे ही कोणाच्या ताब्यात आहेत. जर ती मराठा व्यवस्थेच्या ताब्यात असतील तर त्यांचे प्रथम कर्तव्य आहे की, ज्या जातीत आपण जन्माला आलो त्या जातीचा उद्धार करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे म्हणून अशा शिक्षणसम्राटांनी आपल्या जातीचा अभिमान असेल तर आपल्या शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजातील मुला-मुलींना सरकारचे आरक्षण मिळण्याअगोदर शाहू महाराजांचा आदर्श घेत आपल्या शिक्षण संस्थेमध्ये मराठा समाजातील मुला-मुलींना ५० टक्के आरक्षण घोषित करून समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी, तरच या मराठा मोर्चाला अर्थ राहील. आरक्षण व अ‍ॅट्रॉसिटी कायदा या दोन वेगवेगळ्या विषयांवर मोर्चाच्या सूत्रधारांनी बुद्धिभेद करू नये, असे आवाहनही अशोक गायकवाड यांनी केले आहे.