शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

अ‍ॅट्रॉसिटी मुद्दा मांडल्यास साताऱ्यात प्रतिमोर्चा...

By admin | Updated: October 1, 2016 00:18 IST

अशोक गायकवाड : मराठा आरक्षणासाठी आम्ही सदैव पाठीशी; मात्र.. अशोक गायकवाड : मराठा आरक्षणासाठी आम्ही सदैव पाठीशी; मात्र..

सातारा : ‘मराठा क्रांती महामोर्चाला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या भूमिकेशी आम्ही आजही ठाम आहोत आणि उद्याही राहणार आहे. परंतु अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचा मुद्दा महामोर्चात उपस्थित केला गेला तर आरपीआय सातारा जिल्ह्यात प्रतिमोर्चा काढणार,’ असे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. शिस्तबद्ध मोर्चा काढून मराठा समाजाने एक वेगळा आदर्श निर्माण केल्याचे गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले असून, मराठा समाजाला सरकारने तत्काळ आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. कित्येक वर्षांपासून ‘आरपीआय’ने मराठा आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी करून आरक्षणाचा विषय उचलून धरला आहे. मंत्री रामदास आठवले तर यासाठी नेहमी आग्रही राहिले आहेत. याची नोंद मराठा समाजाने घेतली पाहिजे, असेही गायकवाड यांनी पत्रकात म्हटले आहे. परंतु सध्या आरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी कायदा हे दोन विषय एकत्र आणून मराठा समाजातील काही मंडळी दोन जातींमध्ये तेढ निर्माण करीत आहेत. केवळ मताच्या राजकारणासाठी जातीय दंगली घडविण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.वर्षानुवर्षे अन्याय, अत्याचार सहन करणारा, गाव कुसाबाहेर राहणाऱ्या मागासवर्गीय बांधवांसाठी संरक्षण कवच म्हणून या देशाच्या सर्वोच्च संसदीय कायदे मंडळाने अ‍ॅट्रॉसिटी कायदा संमत केला आहे. कायदा रद्द करून मागासवर्गीयांवर पुन्हा अन्याय, अत्याचार करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे गायकवाड यांनी पत्रकात नमूद केले आहे.आज लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत; परंतु नेमके कोणास आरक्षण मिळाले पाहिजे, हे मोर्चाचे आयोजक का सांगत नाहीत. आरक्षण कोणास हवे आहे. मराठा समाजातील प्रस्तापितांना का विस्थापितांना, बागायतदारांना का भूमिहिनांना गरीब कष्टकऱ्यांना की सावकारांना. याचे अधिविश्लेषण मोर्चा आयोजकांनी करावे, असेही पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)मोर्चाच्या सूत्रधारांनी बुद्धिभेद करू नयेआज देशातील आणि महाराष्ट्रातील शिक्षण मंदिरे ही कोणाच्या ताब्यात आहेत. जर ती मराठा व्यवस्थेच्या ताब्यात असतील तर त्यांचे प्रथम कर्तव्य आहे की, ज्या जातीत आपण जन्माला आलो त्या जातीचा उद्धार करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे म्हणून अशा शिक्षणसम्राटांनी आपल्या जातीचा अभिमान असेल तर आपल्या शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजातील मुला-मुलींना सरकारचे आरक्षण मिळण्याअगोदर शाहू महाराजांचा आदर्श घेत आपल्या शिक्षण संस्थेमध्ये मराठा समाजातील मुला-मुलींना ५० टक्के आरक्षण घोषित करून समाजाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी, तरच या मराठा मोर्चाला अर्थ राहील. आरक्षण व अ‍ॅट्रॉसिटी कायदा या दोन वेगवेगळ्या विषयांवर मोर्चाच्या सूत्रधारांनी बुद्धिभेद करू नये, असे आवाहनही अशोक गायकवाड यांनी केले आहे.