शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हिंसेला विरोध करण्यासाठी साताऱ्यात भरपावसात मोर्चा

By admin | Updated: July 17, 2017 00:05 IST

हिंसेला विरोध करण्यासाठीसाताऱ्यात भरपावसात मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जाती, धर्माच्या नावाखाली समाजात हिंसा पसरवली जात आहे. अमरनाथ यात्रेकरूंवरही हल्ला करण्यात आला. वाढत्या हिंसाचाराला विरोध करण्यासाठी साताऱ्यात रविवारी दुपारी भरपावसात मोर्चा काढण्यात आला. यावेळी अनेक घोषणांनी सातारा शहर दुमदुमून गेला.राजवाड्यापासून सुरू झालेला मोर्चा मोती चौक, पोलिस मुख्यालय मार्गे पोवई नाक्यावरील शिवाजी सर्कल परिसरात आला. यावेळी सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, समविचारी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘हिंदू, मुस्लीम, शीख, इसाई हम सब भाई-भाई,’ अशी उद्घोषणा मोर्चाच्या अग्रभागी करण्यात येत होती. ‘नॉट इन माय नेम’ लिहिलेल्या टोप्या आंदोलनकर्त्यांनी डोक्यावर घातल्या होत्या. मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करणारे फलक हातात धरले होते. यामध्ये ‘अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा धिक्कार असो’, ‘लोकशाही हवी, ‘झुंडशाही नको’, ‘मी दुखी आहे, मी असुरक्षित आहे,’ ‘आमचा हिंसेला ठाम विरोध आहे’ आदी फलक हातात धरले होते. मोर्चा शहरातून जात असतानाच असंख्य सातारकर मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीनं सहभागी होत होते. मोर्चात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाबूराव जंगम, पतंगराव फाळके, विविध कॉलेजमधील युवक-युवती, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते, मुक्तिवादी संघटना, सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे, विमा कामगार संघटना, सर्व श्रमिक संघटना, जनवादी महिला सभा, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारिप बहुजन महासंघ, मुस्लीम जागृती अभियान, सातारा एजुकेशन आणि कल्चरल सोसायटी, खिदमतगाह ज्येष्ठ नागरिक संस्था, मुस्लीम मॅरेज ब्युरो कमिटी आदी सामाजिक संघटनांचा सहभाग होता. महिला, तरुणीही सहभागीसाताऱ्यातील शांतताप्रिय नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. साताऱ्यात सकाळी चांगला पाऊस पडत असतानाही असंख्य महिला, तरुणी रेनकोट घालून तर काही छत्री घेऊन या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. हिंसेला विरोध करण्याची शपथशेवटी शाहीर शीतल साठे यांनी जमलेल्या सर्व नागरिकांना शपथ दिली. कुठल्याही सामूहिक हिंसाचाराचा मूक साक्षीदार अथवा भागीदार न बनण्याची व हिंसेला विरोध करण्याची ही प्रतिज्ञा होती. यानंतर मोर्चाची सांगता झाली. विजय मांडके यांनी सूत्रसंचालन केले.