शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

जिल्ह्यात बाधित रुग्णांचे प्रमाण ४० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:05 IST

सातारा : जिल्ह्यात मंगळवारी २ हजार ५९ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, ३२ बाधितांचा मृत्यु झाला. दरम्यान, प्रशासनाने नियम ...

सातारा : जिल्ह्यात मंगळवारी २ हजार ५९ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, ३२ बाधितांचा मृत्यु झाला. दरम्यान, प्रशासनाने नियम न पाळणाऱ्या लोकांवर कठोर कारवाया सुरू केल्या आहेत. गेल्या २४ तासात ५ हजार ६६ कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये २०५९ जण बाधित असून हे प्रमाण ४०.६४ टक्के आहे.

जिल्ह्यामध्ये सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोरोना बाधितांची संख्या घटली; मात्र बाधितांचे मृत्यू रोखण्यात प्रशासनाला अजून तरी यश आलेले नाही. सातारा तालुक्यात ४१४ तर कराड तालुक्यात ३१६ रुग्ण मंगळवारी आढळले. सातारा तालुक्यात अकरा जणांचा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झाला. सातारा आणि कराड हे दोन्ही तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट झालेले आहेत.

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या मंगळवारी संध्याकाळपर्यंत १ हजार ८३२ नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

दरम्यान, शासनाने घालून दिलेले निर्बंध झुगारून लोक रस्त्यावर फिरत असल्याने मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. आता जिल्ह्यात लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आल्याने जिल्ह्यातील सर्वच शहरांतील रस्ते तसेच बाजारपेठांमध्ये मंगळवारी गर्दीचे प्रमाण कमी दिसले. किराणा मालाची दुकाने, दूध डेअरी, भाजी विक्री यावर बंदी असताना देखील मंगळवारी सकाळच्या वेळेत अनेक जण वाहने घेऊन रस्त्यावर आले; मात्र पोलिसांनी सकाळपासूनच कठोर कारवाई सुरू केली. नियम मोडणाऱ्या लोकांची वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारवाईची माहिती पसरल्यानंतर रस्त्यावर गर्दी कमी झाली.

कुसुंबीत लग्न समारंभ घेणाऱ्याला ५० हजारांचा दंड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गर्दीचे कार्यक्रम, लग्न समारंभाच्या संख्येवर जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून निर्बंध घातले असताना जावळी तालुक्यातील कुसुंबी या गावात लग्नाला मर्यादेपेक्षा जास्त लोक असल्यामुळे आज त्यांच्यावर ५० हजारांची दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात आली. लग्न समारंभामध्ये १०० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होती.