शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मिळणार योग्य मोबदला

By admin | Updated: September 14, 2014 00:00 IST

शिरवळ-लोणंद चौपदरीकरणाचा तिढा : दुकानदार, व्यावसायिकांनाही भरपाई देण्याची प्रशासनाची भूमिका

शिरवळ : शिरवळ-लोणंद चौपदरीकरण रस्त्याचा गेल्या अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. याबाबत शेतकरी आणि प्रशासन यांच्या नुकतीच समन्वय बैठक पार पडली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना कायद्याच्या चौकटीत राहून जास्तीत जास्त मोबदला देण्याची भूमिका प्रशासनाने घेतल्याने उच्च न्यायालयातील लढा मागे घेण्याची भूमिका शेतकरी कृती समितीने घेतली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे.खंडाळा येथील तहसील कार्यालयात पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कृती समिती व प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार शिवाजी तळपे, रस्ते विकास महामंडळाचे अभियंता आर. वाय. पाटील, पी. आर. गायकवाड, यांची बैठक झाली. यामध्ये या रस्त्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांना योग्य मोबदला देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे.रस्ता दुरुस्तीसाठी शासनाने शेतकऱ्यांचा प्रश्न मिटवून खड्डे मुजविण्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. काही व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक यांचे होणारे नुकसान प्रत्यक्ष पाहणी करून त्याची भरपाई देण्याचे प्रांताधिकारी यांनी सांगितले आहे. व्यावसायिकांना जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे.यावेळी पुरुषोत्तम जाधव, समितीचे दत्तात्रय दगडे, कोंडिबा उम्रटकर, चंद्रकांत यादव, धनाजी जाधव, रमेश गोसावी, भिकू ननावरे, तनाजी चव्हाण, कुंडलिक दगडे, सदस्य उपस्थित होते. अडतीस गावांतील शेतकऱ्यांना लाभगेल्या दोन वर्षांपासून शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी लढा उभारला होता. रस्त्याच्या कामात ३८ गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. योग्य मोबदला न दिलेल्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे रस्त्याचे काम बारगळले होते. (प्रतिनिधी)